शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
4
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
5
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
6
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
7
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
8
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
9
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
10
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
11
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
12
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
13
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
14
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
15
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
16
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
17
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
18
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
19
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
20
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!

दीदींना भेटला 'दादा'; ममता बॅनर्जींच्या खास IPS अधिकाऱ्यांची 'वरून' बदली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 11:23 IST

ममता यांच्यासोबत सावलीसारखे असलेले पोलीस आयुक्त अनुज शर्मा यांच्यावरही निवडणूक आयोगाची वक्रदृष्टी पडली आहे.

ठळक मुद्देममता बॅनर्जी यांचे खास मानले जाणाऱ्या चार आयपीएस अधिकाऱ्यांची आयोगानं शुक्रवारी रात्री तडकाफडकी बदली केली.या कारवाईविरोधात काय पाऊल उचलायचं, यावर राज्य सरकारमध्ये खल सुरू आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या जाहीर सभांनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असताना, निवडणूक आयोगानं दीदींना 'जोर का झटका' दिला आहे. ममता बॅनर्जी यांचे खास मानले जाणाऱ्या चार आयपीएस अधिकाऱ्यांची आयोगानं शुक्रवारी रात्री तडकाफडकी बदली केली. सीबीआयच्या विरोधातील धरणं आदोलंनावेळी ममता यांच्यासोबत सावलीसारखे असलेले पोलीस आयुक्त अनुज शर्मा यांच्यावरही निवडणूक आयोगाची वक्रदृष्टी पडली आहे. त्यामुळे आता या कारवाईविरोधात काय पाऊल उचलायचं, यावर राज्य सरकारमध्ये खल सुरू आहे. 

पश्चिम बंगालचे मुख्य सचिव मलय डे यांना निवडणूक आयोगाने एक पत्रक पाठवलं. त्यात अनुज शर्मा यांच्यासह ममतांची 'माया' असलेल्या चार अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश आहेत. त्याची तातडीने अंमलबजावणी करावी आणि संबंधित अधिकाऱ्यांना निवडणुकीशी संबंधित कुठलंही काम दिलं जाऊ नये, अशी ताकीदच आयोगाने दिली आहे. हा ममतादीदींसाठी मोठा झटकाच मानला जातोय. 

पश्चिम बंगाल सरकार आपल्या अधिकारांचा गैरवापर करत असून निवडणुकीच्या काळात राज्यात हिंसाचार उफाळण्याची शंका केंद्रातील सत्ताधारी भाजपाने व्यक्त केली होती. कोलकात्याचे पोलीस आयुक्त अनुज शर्मा आणि विधाननगरचे आयुक्त श्याम सिंह यांच्याविरोधात मुकुल रॉय यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली होती. या दोघांचीही आयोगाने बदली केली आहे. त्यासोबतच डायमंड हार्बर आणि बीरभूमच्या पोलीस अधीक्षकही बदलण्यात आले आहेत. संपूर्ण पश्चिम बंगाल राज्य अतिसंवेदनशील घोषित करण्याची मागणीही भाजपाने केली होती. त्याची दखल घेऊनच, पश्चिम बंगालच्या 42 जागांसाठी सात टप्प्यांमध्ये मतदान घेतलं जाणार आहे. 

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या आदेशावर ममता बॅनर्जींनी किंवा राज्य सरकारने अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु, दीदींचा स्वभाव पाहता, त्या शांत राहतील असं वाटत नाही. एप्रिल 2016 मध्ये कोलकात्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या बदलीचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यावेळी ममता बॅनर्जींनी जाहीरपणे आपला विरोध प्रकट केला होता. इतकंच नव्हे तर, निवडणूक संपताच त्यांनी राजीव कुमार यांना पुन्हा त्याच पदावर नियुक्त केलं होतं, अशी माहिती तृणमूलच्या एका नेत्यानं 'टाइम्स'ला दिली. आताही निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात कोर्टात दाद मागायची का, यावर राज्य सरकार विचार करत असल्याचं समजतं. परंतु, गेल्याच आठवड्यात आंध्र प्रदेश हायकोर्टानं निवडणूक आयोगाने केलेल्या बदल्या स्थगित करण्यास नकार दिला होता. आयोगाने आंध्र प्रदेशातील तीन आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश दिले होते, त्यात डीजीपींचाही (इंटेलिजन्स) समावेश होता.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMamata Banerjeeममता बॅनर्जीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019