शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

दीदींना भेटला 'दादा'; ममता बॅनर्जींच्या खास IPS अधिकाऱ्यांची 'वरून' बदली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 11:23 IST

ममता यांच्यासोबत सावलीसारखे असलेले पोलीस आयुक्त अनुज शर्मा यांच्यावरही निवडणूक आयोगाची वक्रदृष्टी पडली आहे.

ठळक मुद्देममता बॅनर्जी यांचे खास मानले जाणाऱ्या चार आयपीएस अधिकाऱ्यांची आयोगानं शुक्रवारी रात्री तडकाफडकी बदली केली.या कारवाईविरोधात काय पाऊल उचलायचं, यावर राज्य सरकारमध्ये खल सुरू आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या जाहीर सभांनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असताना, निवडणूक आयोगानं दीदींना 'जोर का झटका' दिला आहे. ममता बॅनर्जी यांचे खास मानले जाणाऱ्या चार आयपीएस अधिकाऱ्यांची आयोगानं शुक्रवारी रात्री तडकाफडकी बदली केली. सीबीआयच्या विरोधातील धरणं आदोलंनावेळी ममता यांच्यासोबत सावलीसारखे असलेले पोलीस आयुक्त अनुज शर्मा यांच्यावरही निवडणूक आयोगाची वक्रदृष्टी पडली आहे. त्यामुळे आता या कारवाईविरोधात काय पाऊल उचलायचं, यावर राज्य सरकारमध्ये खल सुरू आहे. 

पश्चिम बंगालचे मुख्य सचिव मलय डे यांना निवडणूक आयोगाने एक पत्रक पाठवलं. त्यात अनुज शर्मा यांच्यासह ममतांची 'माया' असलेल्या चार अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश आहेत. त्याची तातडीने अंमलबजावणी करावी आणि संबंधित अधिकाऱ्यांना निवडणुकीशी संबंधित कुठलंही काम दिलं जाऊ नये, अशी ताकीदच आयोगाने दिली आहे. हा ममतादीदींसाठी मोठा झटकाच मानला जातोय. 

पश्चिम बंगाल सरकार आपल्या अधिकारांचा गैरवापर करत असून निवडणुकीच्या काळात राज्यात हिंसाचार उफाळण्याची शंका केंद्रातील सत्ताधारी भाजपाने व्यक्त केली होती. कोलकात्याचे पोलीस आयुक्त अनुज शर्मा आणि विधाननगरचे आयुक्त श्याम सिंह यांच्याविरोधात मुकुल रॉय यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली होती. या दोघांचीही आयोगाने बदली केली आहे. त्यासोबतच डायमंड हार्बर आणि बीरभूमच्या पोलीस अधीक्षकही बदलण्यात आले आहेत. संपूर्ण पश्चिम बंगाल राज्य अतिसंवेदनशील घोषित करण्याची मागणीही भाजपाने केली होती. त्याची दखल घेऊनच, पश्चिम बंगालच्या 42 जागांसाठी सात टप्प्यांमध्ये मतदान घेतलं जाणार आहे. 

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या आदेशावर ममता बॅनर्जींनी किंवा राज्य सरकारने अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु, दीदींचा स्वभाव पाहता, त्या शांत राहतील असं वाटत नाही. एप्रिल 2016 मध्ये कोलकात्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या बदलीचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यावेळी ममता बॅनर्जींनी जाहीरपणे आपला विरोध प्रकट केला होता. इतकंच नव्हे तर, निवडणूक संपताच त्यांनी राजीव कुमार यांना पुन्हा त्याच पदावर नियुक्त केलं होतं, अशी माहिती तृणमूलच्या एका नेत्यानं 'टाइम्स'ला दिली. आताही निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात कोर्टात दाद मागायची का, यावर राज्य सरकार विचार करत असल्याचं समजतं. परंतु, गेल्याच आठवड्यात आंध्र प्रदेश हायकोर्टानं निवडणूक आयोगाने केलेल्या बदल्या स्थगित करण्यास नकार दिला होता. आयोगाने आंध्र प्रदेशातील तीन आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश दिले होते, त्यात डीजीपींचाही (इंटेलिजन्स) समावेश होता.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMamata Banerjeeममता बॅनर्जीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019