शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दीदींना भेटला 'दादा'; ममता बॅनर्जींच्या खास IPS अधिकाऱ्यांची 'वरून' बदली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 11:23 IST

ममता यांच्यासोबत सावलीसारखे असलेले पोलीस आयुक्त अनुज शर्मा यांच्यावरही निवडणूक आयोगाची वक्रदृष्टी पडली आहे.

ठळक मुद्देममता बॅनर्जी यांचे खास मानले जाणाऱ्या चार आयपीएस अधिकाऱ्यांची आयोगानं शुक्रवारी रात्री तडकाफडकी बदली केली.या कारवाईविरोधात काय पाऊल उचलायचं, यावर राज्य सरकारमध्ये खल सुरू आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या जाहीर सभांनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असताना, निवडणूक आयोगानं दीदींना 'जोर का झटका' दिला आहे. ममता बॅनर्जी यांचे खास मानले जाणाऱ्या चार आयपीएस अधिकाऱ्यांची आयोगानं शुक्रवारी रात्री तडकाफडकी बदली केली. सीबीआयच्या विरोधातील धरणं आदोलंनावेळी ममता यांच्यासोबत सावलीसारखे असलेले पोलीस आयुक्त अनुज शर्मा यांच्यावरही निवडणूक आयोगाची वक्रदृष्टी पडली आहे. त्यामुळे आता या कारवाईविरोधात काय पाऊल उचलायचं, यावर राज्य सरकारमध्ये खल सुरू आहे. 

पश्चिम बंगालचे मुख्य सचिव मलय डे यांना निवडणूक आयोगाने एक पत्रक पाठवलं. त्यात अनुज शर्मा यांच्यासह ममतांची 'माया' असलेल्या चार अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश आहेत. त्याची तातडीने अंमलबजावणी करावी आणि संबंधित अधिकाऱ्यांना निवडणुकीशी संबंधित कुठलंही काम दिलं जाऊ नये, अशी ताकीदच आयोगाने दिली आहे. हा ममतादीदींसाठी मोठा झटकाच मानला जातोय. 

पश्चिम बंगाल सरकार आपल्या अधिकारांचा गैरवापर करत असून निवडणुकीच्या काळात राज्यात हिंसाचार उफाळण्याची शंका केंद्रातील सत्ताधारी भाजपाने व्यक्त केली होती. कोलकात्याचे पोलीस आयुक्त अनुज शर्मा आणि विधाननगरचे आयुक्त श्याम सिंह यांच्याविरोधात मुकुल रॉय यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली होती. या दोघांचीही आयोगाने बदली केली आहे. त्यासोबतच डायमंड हार्बर आणि बीरभूमच्या पोलीस अधीक्षकही बदलण्यात आले आहेत. संपूर्ण पश्चिम बंगाल राज्य अतिसंवेदनशील घोषित करण्याची मागणीही भाजपाने केली होती. त्याची दखल घेऊनच, पश्चिम बंगालच्या 42 जागांसाठी सात टप्प्यांमध्ये मतदान घेतलं जाणार आहे. 

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या आदेशावर ममता बॅनर्जींनी किंवा राज्य सरकारने अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु, दीदींचा स्वभाव पाहता, त्या शांत राहतील असं वाटत नाही. एप्रिल 2016 मध्ये कोलकात्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या बदलीचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यावेळी ममता बॅनर्जींनी जाहीरपणे आपला विरोध प्रकट केला होता. इतकंच नव्हे तर, निवडणूक संपताच त्यांनी राजीव कुमार यांना पुन्हा त्याच पदावर नियुक्त केलं होतं, अशी माहिती तृणमूलच्या एका नेत्यानं 'टाइम्स'ला दिली. आताही निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात कोर्टात दाद मागायची का, यावर राज्य सरकार विचार करत असल्याचं समजतं. परंतु, गेल्याच आठवड्यात आंध्र प्रदेश हायकोर्टानं निवडणूक आयोगाने केलेल्या बदल्या स्थगित करण्यास नकार दिला होता. आयोगाने आंध्र प्रदेशातील तीन आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश दिले होते, त्यात डीजीपींचाही (इंटेलिजन्स) समावेश होता.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMamata Banerjeeममता बॅनर्जीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019