शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलवर EC ची मोठी घोषणा; "संध्याकाळी ६.३० वाजण्यापूर्वी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 16:17 IST

मतदानाच्या शेवटच्या टप्प्यानंतर काही वेळाने एक्झिट पोल प्रसिद्ध केले जाणार आहेत. मात्र आता या एक्झिट पोलबाबत निवडणूक आयोगाने महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

Lok Sabha Exit Poll Result 2024 : एप्रिल महिन्यापासून सुरु असलेल्या लोकसभेच्या निवडणुका आज अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. शनिवारी १ जून रोजी ८ राज्यांमध्ये ५७ जागांवर मतदान पार पडत आहे.  ४४ दिवसांच्या निवडणूक प्रक्रियेनंतर ४ जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहेत. मात्र, त्यापूर्वी देशात सर्वत्र एक्झिट पोलबाबत चर्चा सुरु आहे. एक्झिट पोलचे निकाल येण्यासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून एक्झिट पोल प्रसिद्ध होतील. मात्र त्याआधीच निवडणूक आयोगाने मोठी घोषणा केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर देशातील सर्व ५४३ जागांवर मतदान पूर्ण होणार आहे. त्यानंतर ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत. शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर निवडणूक आयोगाने एक्झिट पोलबाबत मोठा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने माध्यम समूहांना मतदानानंतर वर्तवण्यात येणाऱ्या एक्झिट पोलबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील शेवटच्या दिवशी निवडणूक आयोगाने एक्झिट पोलचे निकाल सायंकाळी साडेसहा वाजण्यापूर्वी दाखवण्यास बंदी घातली आहे. निवडणूक आयोगाने अधिसूचना जारी करून हा आदेश दिला आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास लोकप्रतिनिधी कायदा (१९५१) च्या पोटकलम अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. या कायद्याचे उल्लंघन केल्यास दोन वर्षांचा तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते. निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे की १ जून रोजी संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत एक्झिट पोलवर बंदी असेल. म्हणजेच १ जून रोजी संध्याकाळी ६.३० वाजेनंतरच कोणतेही टीव्ही चॅनल किंवा इतर मीडिया हाऊस एक्झिट पोलचे थेट प्रक्षेपण करू शकतात.

यंदाची लोकसभा निवडणूक ही १९ एप्रिलपासून सुरू झाली होती. गेल्या १० वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार केंद्रात सत्तेत आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही ते सलग तिसऱ्यांदा सत्तेत येतील असा दावा भाजपकडून केला जात आहे. दुसरीकडे काँग्रेस इंडिया आघाडीच्या माध्यमातून विरोधकांसह निवडणुकीत उतरली होती. इंडिया आघाडीनेही ३०० हून अधिक जागा जिंकण्याचा दावा केला होता. त्यामुळे आता थोड्याच वेळात येणाऱ्या एक्झिट पोलवरुन याबाबतचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगlok sabhaलोकसभाexit pollमतदानोत्जतर जनमत चाचणी