शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलवर EC ची मोठी घोषणा; "संध्याकाळी ६.३० वाजण्यापूर्वी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 16:17 IST

मतदानाच्या शेवटच्या टप्प्यानंतर काही वेळाने एक्झिट पोल प्रसिद्ध केले जाणार आहेत. मात्र आता या एक्झिट पोलबाबत निवडणूक आयोगाने महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

Lok Sabha Exit Poll Result 2024 : एप्रिल महिन्यापासून सुरु असलेल्या लोकसभेच्या निवडणुका आज अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. शनिवारी १ जून रोजी ८ राज्यांमध्ये ५७ जागांवर मतदान पार पडत आहे.  ४४ दिवसांच्या निवडणूक प्रक्रियेनंतर ४ जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहेत. मात्र, त्यापूर्वी देशात सर्वत्र एक्झिट पोलबाबत चर्चा सुरु आहे. एक्झिट पोलचे निकाल येण्यासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून एक्झिट पोल प्रसिद्ध होतील. मात्र त्याआधीच निवडणूक आयोगाने मोठी घोषणा केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर देशातील सर्व ५४३ जागांवर मतदान पूर्ण होणार आहे. त्यानंतर ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत. शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर निवडणूक आयोगाने एक्झिट पोलबाबत मोठा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने माध्यम समूहांना मतदानानंतर वर्तवण्यात येणाऱ्या एक्झिट पोलबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील शेवटच्या दिवशी निवडणूक आयोगाने एक्झिट पोलचे निकाल सायंकाळी साडेसहा वाजण्यापूर्वी दाखवण्यास बंदी घातली आहे. निवडणूक आयोगाने अधिसूचना जारी करून हा आदेश दिला आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास लोकप्रतिनिधी कायदा (१९५१) च्या पोटकलम अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. या कायद्याचे उल्लंघन केल्यास दोन वर्षांचा तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते. निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे की १ जून रोजी संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत एक्झिट पोलवर बंदी असेल. म्हणजेच १ जून रोजी संध्याकाळी ६.३० वाजेनंतरच कोणतेही टीव्ही चॅनल किंवा इतर मीडिया हाऊस एक्झिट पोलचे थेट प्रक्षेपण करू शकतात.

यंदाची लोकसभा निवडणूक ही १९ एप्रिलपासून सुरू झाली होती. गेल्या १० वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार केंद्रात सत्तेत आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही ते सलग तिसऱ्यांदा सत्तेत येतील असा दावा भाजपकडून केला जात आहे. दुसरीकडे काँग्रेस इंडिया आघाडीच्या माध्यमातून विरोधकांसह निवडणुकीत उतरली होती. इंडिया आघाडीनेही ३०० हून अधिक जागा जिंकण्याचा दावा केला होता. त्यामुळे आता थोड्याच वेळात येणाऱ्या एक्झिट पोलवरुन याबाबतचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगlok sabhaलोकसभाexit pollमतदानोत्जतर जनमत चाचणी