शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलवर EC ची मोठी घोषणा; "संध्याकाळी ६.३० वाजण्यापूर्वी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 16:17 IST

मतदानाच्या शेवटच्या टप्प्यानंतर काही वेळाने एक्झिट पोल प्रसिद्ध केले जाणार आहेत. मात्र आता या एक्झिट पोलबाबत निवडणूक आयोगाने महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

Lok Sabha Exit Poll Result 2024 : एप्रिल महिन्यापासून सुरु असलेल्या लोकसभेच्या निवडणुका आज अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. शनिवारी १ जून रोजी ८ राज्यांमध्ये ५७ जागांवर मतदान पार पडत आहे.  ४४ दिवसांच्या निवडणूक प्रक्रियेनंतर ४ जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहेत. मात्र, त्यापूर्वी देशात सर्वत्र एक्झिट पोलबाबत चर्चा सुरु आहे. एक्झिट पोलचे निकाल येण्यासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून एक्झिट पोल प्रसिद्ध होतील. मात्र त्याआधीच निवडणूक आयोगाने मोठी घोषणा केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर देशातील सर्व ५४३ जागांवर मतदान पूर्ण होणार आहे. त्यानंतर ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत. शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर निवडणूक आयोगाने एक्झिट पोलबाबत मोठा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने माध्यम समूहांना मतदानानंतर वर्तवण्यात येणाऱ्या एक्झिट पोलबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील शेवटच्या दिवशी निवडणूक आयोगाने एक्झिट पोलचे निकाल सायंकाळी साडेसहा वाजण्यापूर्वी दाखवण्यास बंदी घातली आहे. निवडणूक आयोगाने अधिसूचना जारी करून हा आदेश दिला आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास लोकप्रतिनिधी कायदा (१९५१) च्या पोटकलम अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. या कायद्याचे उल्लंघन केल्यास दोन वर्षांचा तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते. निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे की १ जून रोजी संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत एक्झिट पोलवर बंदी असेल. म्हणजेच १ जून रोजी संध्याकाळी ६.३० वाजेनंतरच कोणतेही टीव्ही चॅनल किंवा इतर मीडिया हाऊस एक्झिट पोलचे थेट प्रक्षेपण करू शकतात.

यंदाची लोकसभा निवडणूक ही १९ एप्रिलपासून सुरू झाली होती. गेल्या १० वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार केंद्रात सत्तेत आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही ते सलग तिसऱ्यांदा सत्तेत येतील असा दावा भाजपकडून केला जात आहे. दुसरीकडे काँग्रेस इंडिया आघाडीच्या माध्यमातून विरोधकांसह निवडणुकीत उतरली होती. इंडिया आघाडीनेही ३०० हून अधिक जागा जिंकण्याचा दावा केला होता. त्यामुळे आता थोड्याच वेळात येणाऱ्या एक्झिट पोलवरुन याबाबतचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगlok sabhaलोकसभाexit pollमतदानोत्जतर जनमत चाचणी