शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

‘तथ्य असल्यास राहुल गांधींनी प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करावी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 11:50 IST

महाराष्ट्र, कर्नाटक व हरयाणा या राज्यांत मतदानप्रक्रियेत घोळ झाल्याचा दावा गुरुवारी राहुल गांधी यांनी केला.

नवी दिल्ली : निवडणुकी दरम्यान मतचोरी झाल्याचा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडून करण्यात येत आहे. त्यांच्या आरोपात तथ्य असले तर त्यांनी प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करावी किंवा खोटे आरोप केल्याबद्दल देशाच्या जनतेची माफी मागावी, असे निर्देश निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले. मतदानप्रक्रियेत घोळ झाल्याचा आरोप करत गांधींनी निवडणूक आयोगाला लक्ष्य केले होते. त्यामुळे शनिवारी पुन्हा निवडणूक आयोगाने त्यांच्याकडे प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करण्याची मागणी केली आहे. 

महाराष्ट्र, कर्नाटक व हरयाणा या राज्यांत मतदानप्रक्रियेत घोळ झाल्याचा दावा गुरुवारी राहुल गांधी यांनी केला. निवडूक आयोगावर आरोप करताना मतदार याद्यांमध्ये कसा घोळ झाला, याचे पुरावे म्हणून मतदार याद्यांतील माहिती त्यांनी सादरीकरणाद्वारे दिली होती. त्यामुळे मतदार याद्यांमधून नावे वगळलेल्या मतदारांची तसेच चुकीच्या पद्धतीने नावे समावेश केलेल्या लोकांची माहिती देण्याची मागणी या तीन राज्यांमधील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी गांधींना केली आहे. राहुल गांधींनी मात्र प्रतिज्ञापत्र देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. संसद सदस्य म्हणून आपण आधीच संविधानाचे पालन करण्याची शपथ घेतल्याचा दावा गांधींनी केला आहे.

...तर राहुल गांधींनी राजीनामा द्यावा : भाजप

राहुल गांधी यांना निवडणूक आयोगावर विश्वास नसेल तर त्यांनी नैतिकतेच्या आधारावर लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यायला हवा. राहुल गांधींसोबत काँग्रेसच्या संसदीय दलाच्या नेत्या सोनिया गांधी, खासदार प्रियंका गांधी यांनी संसद सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा सल्ला देत भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी विरोधी पक्षावर टीकेची झोड उठवली. तुम्ही माध्यमांसमोर निराधार आरोप करता. जेव्हा एखादी संवैधानिक संस्था पुरावे व स्वाक्षरी केलेले प्रतिज्ञापत्र मागते, तेव्हा तुम्ही ते देण्यास नकार देता, असे म्हणत भाटियांनी राहुल गांधींना लक्ष्य केली. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBJPभाजपा