शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

दिल्ली, हरयाणा, बंगाल मधील ५९ मतदारसंघांतील प्रचार संपला; उद्या मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 06:55 IST

लोकसभा निवडणुकांच्या सहाव्या टप्प्यासाठी सात राज्यांतील ५९ मतदारसंघात रविवार, १२ मे रोजी मतदान होणार असून, तेथील प्रचार शुक्रवारी संध्याकाळी संपला.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकांच्या सहाव्या टप्प्यासाठी सात राज्यांतील ५९ मतदारसंघात रविवार, १२ मे रोजी मतदान होणार असून, तेथील प्रचार शुक्रवारी संध्याकाळी संपला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी, आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल, तसेच सप-बसप आघाडीचे नेते अखिलेश यादव व मायावती यांनी जाहीर सभा घेतल्या.सहाव्या टप्प्यात उत्तर प्रदेशातील १४, हरयाणातील सर्व १0, बिहार, मध्य प्रदेश व पश्चिम बंगालमधील प्रत्येकी ८, दिल्लीतील ७ व झारखंडमधील ४ जागांसाठी मतदान होणार असून, तेथील सुमारे १0 कोटी १८ लाख मतदार आपला हक्क बजावू शकतील. या ५९ मतदारसंघांमध्ये ९७९ उमेदवार असून, तेथील मतदान केंद्रांची संख्या १ लाख १३ हजार १६७ इतकी आहे.काँग्रेसचे सरचिटणीस ज्योतिरादित्य सिंदिया, दिग्विजय सिंह, कीर्ती आझाद, शीला दीक्षित, अजय माकन, हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर हुडा, विजेंदर सिंह, तसेच भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन, मनेका गांधी, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, गौतम गंभीर, मनोज तिवारी, मीनाक्षी लेखी, गायक हंसराज हंस, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, आपच्या आतिशी, राघव छड्डा आदी उमेदवारांचे भवितव्य रविवारी मतदान यंत्रांमध्ये बंद होणार आहे.लोकसभा निवडणुकीच्या या टप्प्यात हरयाणा व दिल्लीतील सर्व मतदारसंघांत मतदान पूर्ण होईल. या टप्प्यात दिल्लीत आम आदमी पक्ष, भाजप व काँग्रेस यांच्यात कमालीची चुरस असून, हरयाणामध्येही भाजप, काँग्रेस व लोक दलाचे दोन गट यांच्यात प्रामुख्याने लढती पाहायला मिळतील. बिहारमध्ये भाजप-जनता दल (संयुक्त), लोकजनशक्ती पार्टी यांची युती आणि त्या विरोधात काँग्रेस-राष्ट्रीय जनता दल यांच्यात लढत होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल, माकप व भाजप अशा तिरंगी लढती होणार आहेत.या ५९ मतदारसंघांमध्ये २0१४ साली ६४.२१ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला होता. सर्वाधिक मतदान त्यावेळी प. बंगालमध्ये (८५ टक्के) झाले होते, तर सर्वात कमी मतदान उत्तर प्रदेशात (५४.५५ टक्के) झाले होते. त्यामुळे यंदा याजागांसाठी किती मतदान होते, हेपाहायला हवे.भाजपने जिंकल्या होत्या ४४गेल्या निवडणुकीत या ५९ पैकी ४४ जागा भाजपने, तर दोन जागा त्याच्या मित्रपक्षाने जिंकल्या होत्या. काँग्रेसला दोन जागी विजय मिळाला होता, तर तृणमूलने आठ, इंडियन नॅशनल लोक दलाने दोन व समाजवादी पक्षाने एक जागा जिंकली होती. भाजपने गेल्या वेळी ज्या ४४ जागा जिंकल्या, त्यातील १९ खासदारांना भाजपने यंदा उमेदवारी दिलेली नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस