शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
6
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
7
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
8
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
9
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
10
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
11
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
12
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
13
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
14
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
15
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
16
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
17
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
18
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
19
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
20
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली, हरयाणा, बंगाल मधील ५९ मतदारसंघांतील प्रचार संपला; उद्या मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 06:55 IST

लोकसभा निवडणुकांच्या सहाव्या टप्प्यासाठी सात राज्यांतील ५९ मतदारसंघात रविवार, १२ मे रोजी मतदान होणार असून, तेथील प्रचार शुक्रवारी संध्याकाळी संपला.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकांच्या सहाव्या टप्प्यासाठी सात राज्यांतील ५९ मतदारसंघात रविवार, १२ मे रोजी मतदान होणार असून, तेथील प्रचार शुक्रवारी संध्याकाळी संपला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी, आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल, तसेच सप-बसप आघाडीचे नेते अखिलेश यादव व मायावती यांनी जाहीर सभा घेतल्या.सहाव्या टप्प्यात उत्तर प्रदेशातील १४, हरयाणातील सर्व १0, बिहार, मध्य प्रदेश व पश्चिम बंगालमधील प्रत्येकी ८, दिल्लीतील ७ व झारखंडमधील ४ जागांसाठी मतदान होणार असून, तेथील सुमारे १0 कोटी १८ लाख मतदार आपला हक्क बजावू शकतील. या ५९ मतदारसंघांमध्ये ९७९ उमेदवार असून, तेथील मतदान केंद्रांची संख्या १ लाख १३ हजार १६७ इतकी आहे.काँग्रेसचे सरचिटणीस ज्योतिरादित्य सिंदिया, दिग्विजय सिंह, कीर्ती आझाद, शीला दीक्षित, अजय माकन, हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर हुडा, विजेंदर सिंह, तसेच भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन, मनेका गांधी, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, गौतम गंभीर, मनोज तिवारी, मीनाक्षी लेखी, गायक हंसराज हंस, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, आपच्या आतिशी, राघव छड्डा आदी उमेदवारांचे भवितव्य रविवारी मतदान यंत्रांमध्ये बंद होणार आहे.लोकसभा निवडणुकीच्या या टप्प्यात हरयाणा व दिल्लीतील सर्व मतदारसंघांत मतदान पूर्ण होईल. या टप्प्यात दिल्लीत आम आदमी पक्ष, भाजप व काँग्रेस यांच्यात कमालीची चुरस असून, हरयाणामध्येही भाजप, काँग्रेस व लोक दलाचे दोन गट यांच्यात प्रामुख्याने लढती पाहायला मिळतील. बिहारमध्ये भाजप-जनता दल (संयुक्त), लोकजनशक्ती पार्टी यांची युती आणि त्या विरोधात काँग्रेस-राष्ट्रीय जनता दल यांच्यात लढत होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल, माकप व भाजप अशा तिरंगी लढती होणार आहेत.या ५९ मतदारसंघांमध्ये २0१४ साली ६४.२१ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला होता. सर्वाधिक मतदान त्यावेळी प. बंगालमध्ये (८५ टक्के) झाले होते, तर सर्वात कमी मतदान उत्तर प्रदेशात (५४.५५ टक्के) झाले होते. त्यामुळे यंदा याजागांसाठी किती मतदान होते, हेपाहायला हवे.भाजपने जिंकल्या होत्या ४४गेल्या निवडणुकीत या ५९ पैकी ४४ जागा भाजपने, तर दोन जागा त्याच्या मित्रपक्षाने जिंकल्या होत्या. काँग्रेसला दोन जागी विजय मिळाला होता, तर तृणमूलने आठ, इंडियन नॅशनल लोक दलाने दोन व समाजवादी पक्षाने एक जागा जिंकली होती. भाजपने गेल्या वेळी ज्या ४४ जागा जिंकल्या, त्यातील १९ खासदारांना भाजपने यंदा उमेदवारी दिलेली नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस