शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

अंधारात टॉर्च घेऊन ते धावले...; वृद्ध दाम्पत्यामुळे टळला रेल्वे अपघात, वाचला हजारो लोकांचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 13:38 IST

वृद्ध दाम्पत्य तातडीने रेल्वे ट्रॅकवर पोहोचले आणि अपघात होण्यापासून थांबवला. यामुळे शेकडो लोकांचा जीव वाचला आहे.

तामिळनाडूतील एका वृद्ध दाम्पत्याच्या प्रसंगावधानामुळे एक मोठा रेल्वेअपघात टळला आहे. भगवतीपुरम ते आर्यनकावू रेल्वे ट्रॅकवरील क्रॅश बॅरियरला धडकल्यानंतर ट्रक खाली पडला. काही वेळाने ट्रेन ट्रॅकवरून जाऊ लागते आणि याच दरम्यान शनमुगैया आणि कुरुनथम्मल यांनी ते पाहिलं. त्यानंतर दोघांनी ट्रॅकवरून धावत जाऊन टॉर्च दाखवत ट्रेन थांबवली.

द हिंदूने सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं की, केरळहून प्लायवूड घेऊन जाणारा ट्रक तामिळनाडूतील थूथुकुडीला जात होता, मात्र वाटेत अचानक 12.50 वाजता तो रेल्वे ट्रकच्या वरून जाणाऱ्या रस्त्यावरून खाली पडला. हे पाहून वृद्ध दाम्पत्य तातडीने रेल्वे ट्रॅकवर पोहोचले आणि अपघात होण्यापासून थांबवला. यामुळे हजारो लोकांचा जीव वाचला आहे. या कारणामुळे लोक या वृद्ध जोडप्याचं खूप कौतुक करत आहेत.

'द हिंदू'शी बोलताना अधिकाऱ्याने सांगितलं की, ट्रेन 30 किलोमीटर प्रतितास वेगाने धावत होती. वृद्ध जोडप्याने आम्हाला इशारा केल्यावर आम्ही ट्रेन थांबवण्यात यशस्वी झालो. अपघातामुळे चेन्नई-एग्मोर कोल्लम एक्स्प्रेसला दोन तासांपेक्षा जास्त उशीर झाला. 

हा अपघात अशा वेळी उघडकीस आला आहे जेव्हा रविवारी डिझेल इंजिनवर धावणारी मालगाडी जम्मू-काश्मीरमधील कठुआपासून पंजाबच्या होशियारपूर जिल्ह्यातील एका गावात चालक नसताना 70 किलोमीटरहून अधिक अंतर प्रवास करत होती. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी 7:25 ते 9 च्या दरम्यान घडली, परंतु या काळात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 

टॅग्स :railwayरेल्वेAccidentअपघात