शहरं
Join us  
Trending Stories
1
इवलीशी मुंबई झाली महाकाय ! त्या त्या भागानुसार प्रति स्क्वेअर फुटाचा दर काय... पहाल तर...
2
सोनम वांगचुक यांच्या अटकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, पत्नीने दाखल केली याचिका
3
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
4
Post Office Scheme: दर महिन्याला होईल ₹६१,००० ची कमाई; जबरदस्त आहे ही सरकारी स्कीम, कोट्यधीशही बनवेल
5
Jaipur Hospital Fire: जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
6
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २४,९१० च्या वर; सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी
7
Jaipur Hospital Fire: '२० मिनिटांपूर्वी आगीची माहिती दिली, पण डॉक्टर पळून गेले'; SMS रुग्णालयातील प्रत्यक्षदर्शींचा धक्कादायक दावा
8
Video:...तर भारताच्या 'या' खेळाडूला मारायचंय; पाकिस्तानी स्पिनर अबरार अहमदचं विधान चर्चेत
9
पती अन् दोन मुलांना सोडून शेजाऱ्यासोबत सुरू होतं अफेअर; 'ओयो'मध्ये प्रियकर गर्लफ्रेंडसोबत दिसला अन्...
10
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
11
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
12
उत्खनन क्षेत्रात छत्तीसगडची ऐतिहासिक झेप; खनिज महसूल २५ वर्षांत ३४ पटीने वाढला!
13
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
14
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
15
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
16
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
17
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
18
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
19
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
20
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही

चुकांची दुरुस्ती करायची असल्यास महाराष्ट्रात पूर्वस्थिती बहाल करा! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 08:25 IST

ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद, शिंदे यांचा शपथविधीच घटनाबाह्य असल्याचा दावा

नवी दिल्ली - महाराष्ट्रातील राजकीय गोंधळ दूर करून झालेल्या चुकांची दुरुस्ती करावयाची असल्यास महाराष्ट्रात २१ जून २०२२ पूर्वीची स्थिती बहाल करणे हाच उपाय आहे, असा युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी आज सर्वोच्च न्यायालयात केला.घटनात्मक पदावर असलेल्या विधानसभा उपाध्यक्षांना कर्तव्याचे पालन करण्यापासून रोखणे व कुणीही मागणी केलेली नसताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विश्वासमत संमत करण्याचे निर्देश देण्याची राज्यपालांची कृती व या विश्वासमताच्या आदेशाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार देणे या सर्व निर्णयांनी घटनात्मक तरतुदी व घटनात्मक नैतिकतेचे उल्लंघन झाले आहे, असा युक्तिवाद सिंघवी यांनी केला. पुढील सुनावणी २८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. 

ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल व अभिषेक मनु सिंघवी यांनी आज ३ तास युक्तिवाद केला. सिंघवी युक्तिवाद करीत असताना सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड म्हणाले, यातून मार्ग काढण्याचा काय उपाय आहे? यावर सिंघवी म्हणाले, सर्व बाबतीत घटनात्मक मर्यादांचे उल्लंघन होत आहे.  शिवसेनेच्या प्रतोदांनी व्हीप जारी केलेला असताना ३९ सदस्य उपस्थित राहिले नाही. 

शिंदे गटाची कृतीच पक्षांतर बंदी कायद्याच्या अंतर्गत येते. यावरून १६ सदस्यांना विधानसभा उपाध्यक्षांनी अपात्रतेची बजावलेली नोटीस, तिला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली व दुसऱ्याच दिवशी विश्वासमत सिद्ध करण्याच्या राज्यपालांच्या आदेशाला न्यायालयाचा स्थगनादेश यामुळे पुढील गोंधळ वाढला. यातून बाहेर पडायचे असल्यास पूर्वस्थिती बहाल करणे हाच पर्याय राहिल्याचा जोरदार युक्तिवाद सिंघवी यांनी केला.

ही पूर्वस्थिती बहाल करण्याचे निर्देश यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. अरुणाचल प्रदेशमध्ये या प्रकारचा निर्णय झालेला आहे. यामुळे आता आपण पुढे आलो आहोत. मुळात मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा शपथविधी राज्यघटनेतील तरतुदींचा भंग करणारा आहे. हा युक्तिवाद करताना सिंघवी यांनी राजेंद्र सिंग राणा, नबाम रेबिया, कर्नाटकमधील एस. आर. बोम्मई व श्रीमंत पाटील निकालांचे दाखले दिले.

पुढील सुनावणी २८ फेब्रुवारीला, सिब्बल झाले भावुककपिल सिब्बल यांनी राज्यपालांनी निर्णय घेताना घटनात्मक तरतुदी व पायंडा न पाळल्याचे स्पष्ट केले. शिवसेनेच्या बंडखोर सदस्यांनी पक्षांतर विरोधी कायदा व अनुसूची १० चे उल्लंघन केल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध झालेले आहे. हे स्फटिकासारखे स्वच्छ आहे. या घटनात्मक तरतुदींवर पडदा टाकून संसदीय लोकशाही समृद्ध होऊ शकणार नाही. हा युक्तिवाद मी खटला जिंकण्यासाठी किंवा हरण्यासाठी लढत नाही; परंतु आपल्या पूर्वजांनी जो सार्वभौम लोकशाहीचा समृद्ध वारसा दिला आहे. हा वारसा टिकून राहिला पाहिजे, हीच इच्छा आहे. आपल्याकडून हीच अपेक्षा आहे, असे सांगून सिब्बल यांनी भावूक होत युक्तिवाद संपविला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेSupreme Courtसर्वोच्च न्यायालय