शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Eknath Shinde Ayodhya : 'त्यांनी सत्तेसाठी वडिलांना दिलेलं वचन मोडलं', अयोध्येतून CM एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 17:06 IST

Eknath Shinde Ayodhya : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत रामललाचे दर्शन घेतले.

Eknath Shinde Ayodhya : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज रामललाचे दर्शन घेतले. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते. यानंतर पत्रकार परिषद घेऊन शिंदेंनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर सडकून टीका केली. भाजप आणि शिवसेनेची विचारधारा एकच असल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, सर्व कार्यकर्ते 2 दिवसांपासून अयोध्येत उपस्थित आहेत, त्यांचे आभार. राममंदिर ही आपली श्रद्धा आहे. 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बाळासाहेब ठाकरे आणि करोडो भक्तांचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

'काही लोकांना हिंदुत्वाची अॅलर्जी आहे'शिंदे पुढे म्हणाले की, अयोध्येचा विकास वेगाने होत आहे. हजारो लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटणार आहे. काँग्रेसवर ताशेरे ओढत ते म्हणाले की, काही लोक आहेत, ज्यांना वेदनाही होत आहेत. त्यांना हिंदुत्वाची अॅलर्जी आहे. स्वातंत्र्यानंतर काही लोक हिंदुत्वाबद्दल गैरसमज पसरवत होते, ते आजही करत आहेत. आमचे हिंदुत्व सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहे. हिंदुत्वामुळे राजकीय दुकाने बंद होतील, असे अनेकांना वाटते. मंदिर बांधणार पण तारीख सांगणार नाही, असे बोलणाऱ्या लोकांना पीएम मोदींनी मंदिर बांधून उत्तर दिले, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

'आम्ही जनतेच्या निकालाचे पालन केले'ते पुढे म्हणाले की, अभिमानाने बोला आपण हिंदू आहोत, हा नारा बाळासाहेब ठाकरे यांनी दिला होता. शिवसेना आणि भाजपची विचारसरणी एकच आहे. जाणीवपूर्वक दिशाभूल करणारे मतभेद पसरवले गेले. 2019 मध्ये भाजपने शिवसेनेसोबत सरकार स्थापन करावे, अशी जनतेची इच्छा होती. सत्तेच्या लालसेपोटी त्यांची दिशाभूल झाली, पण आम्ही 8 महिन्यांपूर्वी जनतेचा निर्णय योग्य ठरवला. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात होते असे सरकार आम्ही स्थापन केले. ही विचारधारा पुढे नेण्याण्यासाठी आम्ही अयोध्येत आलो आहोत. 

उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाउद्धव ठाकरेंवर टीका करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, वडिलांना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी प्रभू श्री रामाने 14 वर्षे वनवास भोगला. दुसरीकडे ज्या मुलाने जनता आणि आपल्या वडिलांना शब्द दिला होता, सत्तेसाठी तो शब्द मोडला. गेल्या 8-9 महिन्यांत जे निर्णय झाले, ते अनेक वर्षात घेतले गेले नाहीत. आमचे सरकार सर्वसामान्यांचे, कामगारांचे, विद्यार्थी, महिलांचे, गरीबांचे सरकार आहे. मी घरी बसणारा नाही तर शेतात काम करणारा मुख्यमंत्री आहे. आदेश देऊन एसीत बसणारा मी नाही, तर मी एक कार्यकर्ता आहे आणि जमिनीशी जोडलेला मुख्यमंत्री आहे. बाळासाहेबांनी कारसेवेत चांदीचे आसन मांडले होते, तेव्हापासून अयोध्येशी शिवसैनिकांचे नाते आहे. आमची अयोध्येवर श्रद्धा आहे, म्हणूनच आज आम्ही येथे आहोत, असेही ते म्हणाले

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAyodhyaअयोध्या