शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

काँग्रेसमध्ये अहंकार शिरल्याने संवाद बंद झाला, राहुल गांधी यांची कबुली; नवी दृष्टी स्वीकारणे हाच तरणोपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 01:48 IST

सलग दुस-यांदा सत्तेत आल्यानंतर ‘संपुआ-२’च्या २०११-१२च्या सुमारास काँग्रेसमध्ये एक प्रकारचा अहंकार निर्माण झाला आणि पक्षातील चर्चा-संवादाची परंपरा बंद पडली, अशी स्पष्ट कबुली काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली.

वॉशिंग्टन : सलग दुस-यांदा सत्तेत आल्यानंतर ‘संपुआ-२’च्या २०११-१२च्या सुमारास काँग्रेसमध्ये एक प्रकारचा अहंकार निर्माण झाला आणि पक्षातील चर्चा-संवादाची परंपरा बंद पडली, अशी स्पष्ट कबुली काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली.बर्कले येथे कॅलिफोर्निया विद्यापीठात राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांपुढे भाषण केले आणि नंतर त्यांच्या अनेक प्रश्नांना मनमोकळी उत्तरेही दिली. काँग्रेसच्या सद्य:स्थितीवर भाष्य करताना राहुल म्हणाले की, काँग्रेस कोणा एकाच्या मर्जीनुसार चालत नाही. पक्षाची ध्येयधोरणे चर्चेतून संवादातून ठरतात. सन २००४मध्ये सत्तेवर येताना काँग्रेसने जे धोरण डोळ्यांपुढे ठेवले होते ते १० वर्षांचे होते व सन २०१२पर्यंत ते कालबाह्य ठरायला लागले.राहुल गांधी म्हणाले की, सलग १० वर्षे सत्तेवर राहणाºया कोणत्याही राजकीय पक्षापुढे ही समस्या येणे स्वाभाविकही आहे. पण काँग्रेसच्या बाबतीत असे घडले की, ‘संपुआ-२’चे सरकार असताना सन २०१२च्या सुमारास काँग्रेसमध्ये अहंकार शिरून चर्चा-संवाद बंद झाला. हा चर्चा-संवाद पुन्हा सुरू करूनच काँग्रेसला नवसंजीवनी द्यावी लागेल, असे सांगून ते म्हणाले की, भारतात आज ३०-४० कोटी तरुणांची नवी पिढी मोठ्या आशा-आकांक्षा बाळगून आहे. या तरुणांना उज्ज्वल भविष्याची दृष्टी मिळेल, अशी ध्येयधोरणे आखण्याखेरीज एकट्या काँग्रेसलाच नव्हे, तर कोणत्याही राजकीय पक्षाला तरणोपाय नाही. भाजपाने काँग्रेसचीच अनेक धोरणे व योजना नव्याचा मुलामा चढवून स्वीकारली आहेत. पण ती फार काळ चालू शकणार नाहीत, हे मी काँग्रेसच्या अनुभवावरून सांगू शकतो, असेही ते म्हणाले.सगळीकडेच घराणेशाहीकाँग्रेसमधील घराणेशाहीबद्दल विचारलेल्या प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले की, याबद्दल फक्त आम्हालाच दूषणे देऊ नका.भारतात राजकारणातच नव्हे, तर इतरही अनेक क्षेत्रांत घराणेशाही चालत आलेली दिसते. बॉलिवूड व उद्योगक्षेत्रही याला अपवाद नाही. अनेक क्षेत्रांतील कित्येक बडी मंडळी मोठ्या घराण्यांचा वारसा घेऊनच आलेली दिसतात.परंतु काँग्रेसमध्ये फक्त घराणेशाहीच चालते, हे मी मान्य करणार नाही. काँग्रेसमध्ये घराण्याचा वारसा नसलेलेही अनेक नेते आहेत. राज्याराज्यांत मी याची उदाहरणे दाखवू शकेन. त्यामुळे पक्षाचे काम करताना घराण्याहून ती व्यक्ती सक्षम असणे व संवेदनशील असणे महत्त्वाचे असते.पक्षाध्यक्षपदासाठी..पक्षाध्यक्ष या नात्याने काँग्रेस पक्षाची धुरा हाती घ्यायला तयार आहात का, या प्रश्नास राहुल गांधी यांनी सकारात्मक उत्तर दिले.मात्र ते म्हणाले की, मी स्वत:च हे सांगणे बरोबर होणार नाही. कारण पक्षात अध्यक्ष निवडला जातो व पक्षांतर्गत निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यांनी असे बोलून दाखविले असले तरी त्यांच्याकडे लवकरच पक्षाध्यक्षपदाची सूत्रे येण्याची शक्यता आहे.