शहरं
Join us  
Trending Stories
1
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
2
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
3
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
4
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
5
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
6
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
7
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
8
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
9
गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
10
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
11
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
12
बापरे! हिवाळ्यात 'या' छोट्या चुकांमुळे वेगाने गळू लागतात केस, टक्कल पडण्याची वाटते भीती
13
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
14
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
15
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
16
अबरारची दहशत अन् रहमान डकैतचा स्वॅग! पडद्यावरच्या 'बॅड बॉईज'ने कशी लुटली लाइमलाइट?
17
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
18
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
19
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
20
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमध्ये अहंकार शिरल्याने संवाद बंद झाला, राहुल गांधी यांची कबुली; नवी दृष्टी स्वीकारणे हाच तरणोपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 01:48 IST

सलग दुस-यांदा सत्तेत आल्यानंतर ‘संपुआ-२’च्या २०११-१२च्या सुमारास काँग्रेसमध्ये एक प्रकारचा अहंकार निर्माण झाला आणि पक्षातील चर्चा-संवादाची परंपरा बंद पडली, अशी स्पष्ट कबुली काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली.

वॉशिंग्टन : सलग दुस-यांदा सत्तेत आल्यानंतर ‘संपुआ-२’च्या २०११-१२च्या सुमारास काँग्रेसमध्ये एक प्रकारचा अहंकार निर्माण झाला आणि पक्षातील चर्चा-संवादाची परंपरा बंद पडली, अशी स्पष्ट कबुली काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली.बर्कले येथे कॅलिफोर्निया विद्यापीठात राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांपुढे भाषण केले आणि नंतर त्यांच्या अनेक प्रश्नांना मनमोकळी उत्तरेही दिली. काँग्रेसच्या सद्य:स्थितीवर भाष्य करताना राहुल म्हणाले की, काँग्रेस कोणा एकाच्या मर्जीनुसार चालत नाही. पक्षाची ध्येयधोरणे चर्चेतून संवादातून ठरतात. सन २००४मध्ये सत्तेवर येताना काँग्रेसने जे धोरण डोळ्यांपुढे ठेवले होते ते १० वर्षांचे होते व सन २०१२पर्यंत ते कालबाह्य ठरायला लागले.राहुल गांधी म्हणाले की, सलग १० वर्षे सत्तेवर राहणाºया कोणत्याही राजकीय पक्षापुढे ही समस्या येणे स्वाभाविकही आहे. पण काँग्रेसच्या बाबतीत असे घडले की, ‘संपुआ-२’चे सरकार असताना सन २०१२च्या सुमारास काँग्रेसमध्ये अहंकार शिरून चर्चा-संवाद बंद झाला. हा चर्चा-संवाद पुन्हा सुरू करूनच काँग्रेसला नवसंजीवनी द्यावी लागेल, असे सांगून ते म्हणाले की, भारतात आज ३०-४० कोटी तरुणांची नवी पिढी मोठ्या आशा-आकांक्षा बाळगून आहे. या तरुणांना उज्ज्वल भविष्याची दृष्टी मिळेल, अशी ध्येयधोरणे आखण्याखेरीज एकट्या काँग्रेसलाच नव्हे, तर कोणत्याही राजकीय पक्षाला तरणोपाय नाही. भाजपाने काँग्रेसचीच अनेक धोरणे व योजना नव्याचा मुलामा चढवून स्वीकारली आहेत. पण ती फार काळ चालू शकणार नाहीत, हे मी काँग्रेसच्या अनुभवावरून सांगू शकतो, असेही ते म्हणाले.सगळीकडेच घराणेशाहीकाँग्रेसमधील घराणेशाहीबद्दल विचारलेल्या प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले की, याबद्दल फक्त आम्हालाच दूषणे देऊ नका.भारतात राजकारणातच नव्हे, तर इतरही अनेक क्षेत्रांत घराणेशाही चालत आलेली दिसते. बॉलिवूड व उद्योगक्षेत्रही याला अपवाद नाही. अनेक क्षेत्रांतील कित्येक बडी मंडळी मोठ्या घराण्यांचा वारसा घेऊनच आलेली दिसतात.परंतु काँग्रेसमध्ये फक्त घराणेशाहीच चालते, हे मी मान्य करणार नाही. काँग्रेसमध्ये घराण्याचा वारसा नसलेलेही अनेक नेते आहेत. राज्याराज्यांत मी याची उदाहरणे दाखवू शकेन. त्यामुळे पक्षाचे काम करताना घराण्याहून ती व्यक्ती सक्षम असणे व संवेदनशील असणे महत्त्वाचे असते.पक्षाध्यक्षपदासाठी..पक्षाध्यक्ष या नात्याने काँग्रेस पक्षाची धुरा हाती घ्यायला तयार आहात का, या प्रश्नास राहुल गांधी यांनी सकारात्मक उत्तर दिले.मात्र ते म्हणाले की, मी स्वत:च हे सांगणे बरोबर होणार नाही. कारण पक्षात अध्यक्ष निवडला जातो व पक्षांतर्गत निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यांनी असे बोलून दाखविले असले तरी त्यांच्याकडे लवकरच पक्षाध्यक्षपदाची सूत्रे येण्याची शक्यता आहे.