शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जागावाटपात मतभेद टाळण्यासाठी प्रयत्न; ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांची जाहीर वक्तव्ये बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 09:37 IST

अधिक जागा लढविण्यापेक्षा जिंकून आणण्यावर भर देणार

हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागा वाटपावरून इंडिया आघाडीच्या सहकाऱ्यांमध्ये मतभेद असूनही, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने याबाबत जाहीरपणे बोलणे बंद केले आहे.

काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी पक्षांतर्गत चर्चेतून प्रश्न सोडविण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्लीत नमते घेतल्याचे दिसत आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही असेच संकेत दिले आहेत. ते म्हणाले, कोण किती जागा लढवतो हे महत्त्वाचे नाही; सत्ताधाऱ्यांचा पराभव करणे महत्त्वाचे आहे. २३ जागा लढवण्याचा आग्रह शिवसेना धरणार का, असे विचारले असता ते म्हणाले की, संख्येला महत्त्व नाही. थांबा आणि पाहा. आमच्याकडे नवीन सहयोगी असू शकतात.

प्रकाश आंबेडकरही महाविकास आघाडीत?

महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे देखील महाविकास आघाडीत सहभागी होऊ शकतात, अशी माहिती आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने एमआयएमसोबत एकत्र निवडणूक लढली होती. त्यावेळी दोन्ही पक्षांनी सर्व ४८ जागा लढवून ७.६५ टक्के मते मिळविली होती. यावेळी वंचित बहुजन आघाडी इंडिया आघाडीसोबत निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. या बाबत इंडिया आघाडीने मात्र, अजून निर्णय घेतलेला नाही.

२०१९ मध्ये कोणत्या पक्षाला, किती जागा?

  • २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने २३ जागा लढवल्या होत्या आणि १८ जागा जिंकल्या होत्या. त्यांना २३.५ टक्के मते मिळाली होती. तर, भाजपने २५ पैकी २३ जागा जिंकल्या होत्या. 
  • शिवसेनेचे बहुसंख्य खासदार शिंदे यांच्या गटासोबत गेले असले तरी उद्धव ठाकरे यांचा गट २३ जागा लढवण्याचा आग्रह धरत होता. परंतु, अलीकडे त्यांनी या मागणीबाबत नरमाईची भूमिका घेतली आहे आणि केवळ जिंकण्याच्या निकषांवर चर्चा सुरू आहे.
  • २०१९ मध्ये एमआयएम एक शक्ती म्हणून महाराष्ट्रात उदयास आली. त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला हानी पोहोचवली. तर, त्यांचे उमेदवार इम्तियाज जलील हे विजयी झाले.  
  • काँग्रेसने २५ जागा लढवल्या. त्यांना १६.४१ टक्के मते मिळाली. पण, एकच जागा जिंकता आली. राष्ट्रवादीने १९ जागांवर निवडणूक लढवली आणि १५.६६ टक्के मते मिळवत ४ जागा जिंकल्या. राष्ट्रवादीने अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा यांना पाठिंबा दिला. त्यांनी नंतर भाजपशी हातमिळवणी केली.
टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर