शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

जागावाटपात मतभेद टाळण्यासाठी प्रयत्न; ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांची जाहीर वक्तव्ये बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 09:37 IST

अधिक जागा लढविण्यापेक्षा जिंकून आणण्यावर भर देणार

हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागा वाटपावरून इंडिया आघाडीच्या सहकाऱ्यांमध्ये मतभेद असूनही, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने याबाबत जाहीरपणे बोलणे बंद केले आहे.

काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी पक्षांतर्गत चर्चेतून प्रश्न सोडविण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्लीत नमते घेतल्याचे दिसत आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही असेच संकेत दिले आहेत. ते म्हणाले, कोण किती जागा लढवतो हे महत्त्वाचे नाही; सत्ताधाऱ्यांचा पराभव करणे महत्त्वाचे आहे. २३ जागा लढवण्याचा आग्रह शिवसेना धरणार का, असे विचारले असता ते म्हणाले की, संख्येला महत्त्व नाही. थांबा आणि पाहा. आमच्याकडे नवीन सहयोगी असू शकतात.

प्रकाश आंबेडकरही महाविकास आघाडीत?

महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे देखील महाविकास आघाडीत सहभागी होऊ शकतात, अशी माहिती आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने एमआयएमसोबत एकत्र निवडणूक लढली होती. त्यावेळी दोन्ही पक्षांनी सर्व ४८ जागा लढवून ७.६५ टक्के मते मिळविली होती. यावेळी वंचित बहुजन आघाडी इंडिया आघाडीसोबत निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. या बाबत इंडिया आघाडीने मात्र, अजून निर्णय घेतलेला नाही.

२०१९ मध्ये कोणत्या पक्षाला, किती जागा?

  • २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने २३ जागा लढवल्या होत्या आणि १८ जागा जिंकल्या होत्या. त्यांना २३.५ टक्के मते मिळाली होती. तर, भाजपने २५ पैकी २३ जागा जिंकल्या होत्या. 
  • शिवसेनेचे बहुसंख्य खासदार शिंदे यांच्या गटासोबत गेले असले तरी उद्धव ठाकरे यांचा गट २३ जागा लढवण्याचा आग्रह धरत होता. परंतु, अलीकडे त्यांनी या मागणीबाबत नरमाईची भूमिका घेतली आहे आणि केवळ जिंकण्याच्या निकषांवर चर्चा सुरू आहे.
  • २०१९ मध्ये एमआयएम एक शक्ती म्हणून महाराष्ट्रात उदयास आली. त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला हानी पोहोचवली. तर, त्यांचे उमेदवार इम्तियाज जलील हे विजयी झाले.  
  • काँग्रेसने २५ जागा लढवल्या. त्यांना १६.४१ टक्के मते मिळाली. पण, एकच जागा जिंकता आली. राष्ट्रवादीने १९ जागांवर निवडणूक लढवली आणि १५.६६ टक्के मते मिळवत ४ जागा जिंकल्या. राष्ट्रवादीने अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा यांना पाठिंबा दिला. त्यांनी नंतर भाजपशी हातमिळवणी केली.
टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर