शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जागावाटपात मतभेद टाळण्यासाठी प्रयत्न; ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांची जाहीर वक्तव्ये बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 09:37 IST

अधिक जागा लढविण्यापेक्षा जिंकून आणण्यावर भर देणार

हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागा वाटपावरून इंडिया आघाडीच्या सहकाऱ्यांमध्ये मतभेद असूनही, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने याबाबत जाहीरपणे बोलणे बंद केले आहे.

काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी पक्षांतर्गत चर्चेतून प्रश्न सोडविण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्लीत नमते घेतल्याचे दिसत आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही असेच संकेत दिले आहेत. ते म्हणाले, कोण किती जागा लढवतो हे महत्त्वाचे नाही; सत्ताधाऱ्यांचा पराभव करणे महत्त्वाचे आहे. २३ जागा लढवण्याचा आग्रह शिवसेना धरणार का, असे विचारले असता ते म्हणाले की, संख्येला महत्त्व नाही. थांबा आणि पाहा. आमच्याकडे नवीन सहयोगी असू शकतात.

प्रकाश आंबेडकरही महाविकास आघाडीत?

महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे देखील महाविकास आघाडीत सहभागी होऊ शकतात, अशी माहिती आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने एमआयएमसोबत एकत्र निवडणूक लढली होती. त्यावेळी दोन्ही पक्षांनी सर्व ४८ जागा लढवून ७.६५ टक्के मते मिळविली होती. यावेळी वंचित बहुजन आघाडी इंडिया आघाडीसोबत निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. या बाबत इंडिया आघाडीने मात्र, अजून निर्णय घेतलेला नाही.

२०१९ मध्ये कोणत्या पक्षाला, किती जागा?

  • २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने २३ जागा लढवल्या होत्या आणि १८ जागा जिंकल्या होत्या. त्यांना २३.५ टक्के मते मिळाली होती. तर, भाजपने २५ पैकी २३ जागा जिंकल्या होत्या. 
  • शिवसेनेचे बहुसंख्य खासदार शिंदे यांच्या गटासोबत गेले असले तरी उद्धव ठाकरे यांचा गट २३ जागा लढवण्याचा आग्रह धरत होता. परंतु, अलीकडे त्यांनी या मागणीबाबत नरमाईची भूमिका घेतली आहे आणि केवळ जिंकण्याच्या निकषांवर चर्चा सुरू आहे.
  • २०१९ मध्ये एमआयएम एक शक्ती म्हणून महाराष्ट्रात उदयास आली. त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला हानी पोहोचवली. तर, त्यांचे उमेदवार इम्तियाज जलील हे विजयी झाले.  
  • काँग्रेसने २५ जागा लढवल्या. त्यांना १६.४१ टक्के मते मिळाली. पण, एकच जागा जिंकता आली. राष्ट्रवादीने १९ जागांवर निवडणूक लढवली आणि १५.६६ टक्के मते मिळवत ४ जागा जिंकल्या. राष्ट्रवादीने अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा यांना पाठिंबा दिला. त्यांनी नंतर भाजपशी हातमिळवणी केली.
टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर