शिक्षण, आरोग्य, वीजेला प्राधान्य, मोदी सरकारचा अॅक्शन प्लॅन जाहीर
By Admin | Updated: May 29, 2014 13:55 IST2014-05-29T13:44:23+5:302014-05-29T13:55:04+5:30
शिक्षण, आरोग्य आणि वीज सर्वसामान्य जनतेशी निगडीत विषयांना प्राधान्य देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'दहा कलमी' कार्यक्रम सादर केला आहे.

शिक्षण, आरोग्य, वीजेला प्राधान्य, मोदी सरकारचा अॅक्शन प्लॅन जाहीर
>ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २९ - शिक्षण, आरोग्य आणि वीज सर्वसामान्य जनतेशी निगडीत विषयांना प्राधान्य देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'दहा कलमी' कार्यक्रम सादर केला आहे. पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यावर नरेंद्र मोदींनी सरकारच्या कामकाजाला वेग देत केंद्रीय मंत्रिमडळाच्या दुस-या बैठकीत सरकारचा 'दहा कलमी' कार्यक्रम सादर केला आहे. तसेच अर्थव्यवस्थेला चालना देणे, गुंतवणूक वाढवणे असे मुद्देही या दहा कलमी कार्यक्रमात मांडण्यात आले आहेत.
मोदी सरकारची दशसूत्री
१ - शिक्षण, आरोग्य व वीज या सुविधाना प्राधान्य देणे.
२- अर्थव्यवस्थेला चालना देणे, अर्थव्यवस्थेशी निगडीत समस्यांचे निराकरण करणे.
३ - सरकारी कामकाजात नव्या विचारांचे आणि कामाच्या अभिनव पद्धतींचे स्वागत करणे
४ - देशात नोकरदारांचा आत्मविश्वास वाढवण्यास प्राधान्य
५ - गुंतवणूक, पायभूत सुविधांवर भर देणार
६ - जनतेशी थेट संपर्क निर्माण करुन जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणार.
७ - सरकारी कामात पारदर्शकतेसाठी प्रोत्साहन देणार. कामात ई-ऑक्शनला प्राधान्य
८ - सरकारी धोरणांमध्ये स्थिरता व सातत्य राखणे.
९ - सरकारी धोरण, कार्यक्रमांची ठराविक वेळेत अमलबजावणी करणे.
१० - सर्व मंत्रालयांमध्ये समन्वय राखणे.
दरम्यान, हा कार्यक्रम व्यवस्थित राबवला जावा यासाठी सरकारी यंत्रणा सुसज्ज करण्यात येणार आहे, अशी माहिती पंतप्रधानांचे मुख्य सचिव नृपेंद्र मिश्र यांनी दिली.