शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

ईडीने जप्त केलेला पैसा जनतेला परत करणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 06:57 IST

कृष्णनगर लोकसभा मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा यांच्या विरोधात पक्षाच्या उमेदवार आणि राजघराण्यातील माजी सदस्य अमृता रॉय यांच्याशी दूरध्वनीवरून झालेल्या संभाषणात मोदींनी ही ग्वाही दिल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले.

नवी दिल्ली / कोलकाता : "पश्चिम बंगालमधील गरिबांकडून लुटलेला आणि अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केलेला पैसा लोकांना परत मिळावा यासाठी आपण काम करीत आहोत," अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदिली.

कृष्णनगर लोकसभा मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा यांच्या विरोधात पक्षाच्या उमेदवार आणि राजघराण्यातील माजी सदस्य अमृता रॉय यांच्याशी दूरध्वनीवरून झालेल्या संभाषणात मोदींनी ही ग्वाही दिल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदींनी राजमाता अमृता रॉय यांना सांगितले की, "भ्रष्टाचाऱ्यांनी सर्वसामान्यांचा पैसा लुटला आहे आणि ईडीने त्या भ्रष्ट लोकांकडून जी काही मालमत्ता आणि पैसा जप्त केला आहे, तो गरीब जनतेला परत केला पाहिजे. त्यासाठी ते कायदेशीर पर्याय शोधत आहेत," असे एका भाजप नेत्याने सांगितले.

एकीकडे सध्याचे केंद्र सरकार देशातून भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि दुसरीकडे सर्व भ्रष्टाचारी एकमेकांना वाचविण्यासाठी एकत्र आले आहेत, असेही ते म्हणाले.

पैसे कसे परत करणार?पंतप्रधान व रॉय यांच्यातील संभाषणाचा तपशील देताना नेत्यांनी सांगितले की, नोकरीसाठी लाच म्हणून दिलेली रक्कम सुमारे ३ हजार कोटी रुपये असल्याचा पंतप्रधानांचा अंदाज आहे. मोदीनी रॉय यांना याबाबत लोकांना सांगण्यास सांगितले. सत्तेत आल्यानंतर जनतेचे पैसे परत देण्याचा मार्ग काढू, गरज पडल्यास कायदेशीर पर्यायही शोधले जातील, असे पंतप्रधान म्हणाले.

३५ जागा मिळविण्याचे कठीण उद्दिष्टपश्चिम बंगाल भाजपने अंतर्गत कलह, संघटनात्मक उणिवा आणि डाव्या-काँग्रेस आघाडीचे स्वतंत्र आव्हान या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या ३५ जागा मिळविण्याचे कठीण उद्दिष्ट ठेवले आहे. सीएए अंमलबजावणीचे लक्ष्य साध्य करणे ही त्याची गुरुकिल्ली आहे. भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या करिष्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.

मागितली माफीभाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप घोष यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली. टीएमसीने त्यांच्या टिप्पणींबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करून आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय