शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
3
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
5
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
6
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
7
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
8
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
9
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
10
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
11
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
12
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
13
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
14
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
15
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
16
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
17
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
18
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
19
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
20
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात

...ताेवर ईडी अटक करु शकणार नाही, सुप्रीम काेर्टाने फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 08:49 IST

झारखंडमधील बेकायदेशीर खनिकर्माच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे सहकारी आरोपी प्रेम प्रकाश यांनी दाखल केलेल्या जामिनाच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदविले.

नवी दिल्ली : खटला चालविण्यास विलंब झाल्यास आरोपीला जामीन देण्याचे संविधानाच्या अनुच्छेद २१ अन्वये न्यायालयाला मिळालेले अधिकार हिरावून घेता येणार नाहीत. पीएमएलए कायद्याखाली अटक करण्यात आलेले आरोपी बेमुदत काळासाठी तुरुंगातच खितपत राहावेत म्हणून वारंवार पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याचे ईडीचे डावपेच हैराण करणारे आहेत, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्या. दीपंकर दत्ता यांच्या पीठाने बुधवारी तीव्र नापसंती व्यक्त केली.

झारखंडमधील बेकायदेशीर खनिकर्माच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे सहकारी आरोपी प्रेम प्रकाश यांनी दाखल केलेल्या जामिनाच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदविले. प्रेम प्रकाश गेल्या दीड वर्षापासून कारावासात आहेत. आरोपींची सुटका केल्यास ते साक्षीपुराव्यांशी छेडछाड करतात, हा ईडीच्या वतीने युक्तिवाद करणारे सॉलिसीटर जनरल एस. व्ही. राजू यांचा दावा न्यायालयाने फेटाळून लावला. आरोपीने तसे केल्यास न्यायालयात दाद मागता येते. आरोपीने गुन्हा केलेला नाही किंवा जामिनावर सुटल्यानंतर तो कायद्याचे उल्लंघन करणार नाही, याची खात्री पटल्यास जामीन देता येतो, असे स्पष्ट केले. 

ईडीच्या क्लृप्त्यांवर रोषचौकशी पूर्ण करुन खटला भरण्याऐवजी आरोपी तुरुंगातच राहावे म्हणून वारंवार पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याच्या ईडीच्या क्लृप्त्यांवर न्यायालयाने रोष व्यक्त केला. तसेच त्यांचे हे डावपेच हैराण करणारे आहेत, अशी टिप्पणी न्या. संजीव खन्ना यांनी केली.

निर्धारित वेळेत आरोपपत्र दाखल करावेचौकशी पूर्ण होईपर्यंत आरोपीला अटक करू नये, असा डिफॉल्ट जामिनाचा अर्थ आहे. चौकशी पूर्ण झाल्याशिवाय खटला चालवता येणार नाही, असे म्हणता येणार नाही. काही प्रकरणांमध्ये आम्ही हा मुद्दा उपस्थित करून त्याची  ईडीला कल्पना देऊ. पीएमएलए कायद्यानुसार चौकशी पूर्ण न झाल्यास तुरुंगात असलेला आरोपी जामिनास पात्र ठरतो. भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहितेने निर्धारित केलेल्या ६० किंवा ९० दिवसांच्या कालावधीत अंतिम आरोपपत्र दाखल करावे, असे न्यायालयाने म्हटले.

अनेक नेते जामिनावर सुटणार? सर्वोच्च न्यायालयाच्या या निरीक्षणांमुळे सध्या खटल्याशिवाय तुरुंगवास भोगत असलेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन, दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया तसेच राज्यसभेतील भाजपचे नेते संजय सिंह यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांची जामिनावर सुटका करण्याची शक्यता बळावणार आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय