शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

ED अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला... FIR दाखल; बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची काँग्रेसची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 11:11 IST

ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हल्ल्यादरम्यान जमावाने त्यांचा मोबाईल फोन, लॅपटॉप, रोख रक्कम आणि पाकीट हिसकावून घेतले.

अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांवर छापेमारीदरम्यान राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याच्या समर्थकांनी हल्ला केल्यानंतर पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापले आहे. ज्यावेळी ईडीच्या टीमवर हल्ला करण्यात आला आणि त्यांना लक्ष्य करण्यात आले, त्यावेळी ईडी अधिकाऱ्यांसह सीआरपीएफचे फक्त 27 जवान होते. या हल्ल्यात तीन अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत. 

ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हल्ल्यादरम्यान जमावाने त्यांचा मोबाईल फोन, लॅपटॉप, रोख रक्कम आणि पाकीट हिसकावून घेतले. बंगाल पोलिसांनी या प्रकरणी तीन एफआयआर नोंदवले आहेत. दरम्यान, या घटनेनंतर एकीकडे विरोधकांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली असतानाच दुसरीकडे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांनीही सर्व घटनात्मक पर्यायांचा विचार करून योग्य ती कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. 

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करताना काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले, "ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ले होत आहेत. राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी हे योग्य प्रकरण आहे. पश्चिम बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिकट आहे". तर भाजपाने उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील संदेशखली येथील घटनेचा तीव्र निषेध केला आहे. तसेच, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी ममता बॅनर्जी यांची किम जोंगशी तुलना केली.

दरम्यान, सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने हे आरोप फेटाळून लावले आहेत. केंद्रीय एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक लोकांना भडकावल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी तृणमूल काँग्रेसचे नेते शेख शाहजहान यांच्या निवासस्थानावर छापा टाकला. यानंतर शाहजहान यांच्या समर्थकांकडून हल्ले झाले तेव्हा ही घटना घडली. समर्थकांनी अधिकारी आणि त्यांच्या वाहनांची तोडफोड केली. शाहजहान हे राज्यमंत्री ज्योतिप्रिया मल्लिक यांचे निकटवर्तीय मानले जातात. कोट्यवधी रुपयांच्या रेशन वितरण घोटाळ्याप्रकरणी ज्योतिप्रिया मल्लिक यांना अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwest bengalपश्चिम बंगालEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय