शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

ईडीला लाखाचा दंड, नागरिकांचा छळ थांबवा, हायकोर्टाने सुनावले खडे बोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 08:44 IST

Mumbai High Court News:  ईडीसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांनी कायद्याच्या चौकटीत राहून काम करण्याची वेळ आली आहे. कायदा हातात घेऊन नागरिकांची छळवणूक करणे थांबवा, असे खडे बोल सुनावत  उच्च न्यायालयाने ईडीला एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला.

मुंबई - ईडीसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांनी कायद्याच्या चौकटीत राहून काम करण्याची वेळ आली आहे. कायदा हातात घेऊन नागरिकांची छळवणूक करणे थांबवा, असे खडे बोल सुनावत  उच्च न्यायालयाने ईडीला एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला.

नागरिकांची छळवणूक होणार नाही, यासाठी कायद्याचा अंमल करणाऱ्या तपास यंत्रणांना कठोर संदेश देण्याची वेळ आली आहे, असे न्या. मिलिंद जाधव यांच्या एकलपीठाने म्हटले. ‘मला दंड ठोठावण्यास भाग पाडले आहे. तपास यंत्रणांना एक कठोर संदेश जाणे आवश्यक आहे. तुम्ही कायदा हातात घेऊन नागरिकांना त्रास देऊ शकत नाही,’ असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

मनी लाँड्रिंगचे कट गुप्तपणे रचले जातात आणि अंधारात त्यांची अंलबजावणी होते. माझ्यासमोर सध्या असलेले प्रकरण हे पीएमएलएच्या नावाखाली दडपशाहीचे उत्तम उदाहरण आहे, अशी टिप्पणी न्यायालयाने केली. ईडीने दाखल केलेल्या अर्जावर विशेष पीएमएलए न्यायालयाने ८ ऑगस्ट २०१४ रोजी एका विकासकाविरुद्ध जारी केलेली ‘प्रक्रिया’ रद्द करण्याचे आदेश देताना न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदविले.

प्रकरण काय?- हे प्रकरण खरेदीदार आणि विकासकामधील कराराच्या उल्लंघनाचे आहे. मालाडमधील एका इमारतीच्या दोन मजल्यांच्या नूतनीकरणासाठी विकासकाला चार कोटी देण्याचे खरेदीदाराने मान्य केले. - नव्या इमारतीच्या सोसायटीचा अध्यक्ष असलेल्या खरेदीदाराने इमारतीतील दोन माळे खरेदी करून तेथे गेस्ट हाऊस सुरू केले. दोघांत करार झाला. त्यानुसार, विकासक २००७ मध्ये खरेदीदाराला गेस्ट हाऊसचा ताबा देणार होता. - मात्र, विलंब झाल्याने खरेदीदाराने पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी दखल न घेतल्याने दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार विलेपार्ले पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि पुढे ही तक्रार ईडीकडे पाठविली गेली.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय