शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

फसवणूक झालेल्या ३२ लाख गुंतवणूकदारांना ईडी वाटणार पैसे; आरोपींची ६ हजार कोटींची संपत्ती विकण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 11:33 IST

पॉन्झी घोटाळ्यातील ३२ लाख गुंतवणूकदारांना ईडीने मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे.

Ponzi Scheme: अंमलबजावणी संचालनालय पॉन्झी घोटाळ्यात बळी पडलेल्या लाखो गुंतवणूकदारांना पैसे परत करण्याची तयारी करत आहे. यासाठी ६ हजार कोटींहून अधिक किमतीच्या जप्त संपत्तीची विक्री करण्याची प्रक्रिया ईडीकडून सुरू झाली आहे. सुप्रीम कोर्ट आणि आंध्र प्रदेश हायकोर्टानेही अशा प्रकारच्या फसवणुकीच्या स्किममध्ये अडकलेल्या गरीब गुंतवणूकदारांना गुन्ह्याची रक्कम परत करण्यास अनुकूलता दर्शवली होती. त्यानंतर आता हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ॲग्री गोल्ड पॉन्झी घोटाळ्यातील ३२ लाख गुंतवणूकदारांना पैसे परत करण्यासाठी ६,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता विकली जाणार आहे. गेल्या आठवड्यातच, ईडीने ॲग्री गोल्ड कंपनी आणि तिच्या प्रवर्तकांच्या विरोधात हैदराबादमधील पीएमएलए न्यायालयात धाव घेतली होती. तपास यंत्रणेने आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि ओडिशामधील जप्त केलेल्या मालमत्तांची विक्री करण्याची मागणी केली होती.

दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अशा प्रकारच्या कारवाईबाबत महत्त्वाचे विधान केलं होतं. "आपण कायद्यात बदल करण्याच्या शक्यतांचा शोध घेत आहोत, जेणेकरून फसवणुकीला बळी पडलेल्या गुंतवणूकदारांना घोटाळेबाजांच्या मालमत्तांचा वापर करून त्यांचे पैसे परत मिळू शकतील," असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं होतं.

ईडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ईडीने ज्या मालमत्तांसंदर्भात अर्ज दाखल केला आहे त्यात २३१० निवासी आणि व्यावसायिक भूखंड, अपार्टमेंट, मनोरंजन पार्क यांचा समावेश आहे. या २३१० मालमत्तांपैकी २२५४ आंध्र प्रदेशात, ४३ तेलंगणात, ११ कर्नाटकात आणि दोन ओडिशात आहेत. यापूर्वी, आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने एपीडीएफई कायद्यांतर्गत सीआयडीद्वारे संलग्न केलेल्या मालमत्ता परत करण्याची परवानगी दिली होती.

"एपीडीएफई कायदा आणि पीएमएलएची उद्दिष्टे, जोपर्यंत पीडितांना पैसे परत करण्याचा संबंध आहे तोपर्यंत एकमेकांशी विरोधाभासी नाहीत. आणि एपीडीएफई कायद्याच्या कलम ६(४) नुसार परतफेड करण्याची प्रक्रिया देखील असू शकते. पीएमएलएच्या कलम ८(८) नुसार हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले, ज्याने ठेवीदारांना संलग्न रकमेचे वितरण करण्याच्या बाजूने निकाल दिला,” असं ईडीच्या अधिकाऱ्याने सांगितले.

ॲग्री गोल्ड स्कीमच्या कर्मचाऱ्यांनी ३२ लाख ग्राहकांकडून ६ हजार ४०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम गोळा केली होती. आंध्र प्रदेश सीआयडीने यापूर्वीही याप्रकरणी हायकोर्टात धाव घेत ॲग्री गोल्ड स्कीम मालमत्तांची ईडीने नोंदणी करावी, जेणेकरून पैसे गुंतवणूकदारांमध्ये वाटले जातील अशी मागणी केली होती. ईडीने डिसेंबर २०२० मध्ये ॲग्री गोल्ड ग्रुप आणि त्याचे प्रवर्तक अवा वेंकट रामाराव, त्यांचे कुटुंबीय अवा वेंकट सेशु नारायण आणि अवा हेमा सुंदर वारा प्रसाद यांना अटक केली होती. विशेष न्यायालयाने आतापर्यंत त्यांच्या आणि अन्य २० आरोपींविरुद्ध दाखल केलेल्या दोन आरोपपत्रांची दखल घेतली आहे. 

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयAndhra Pradeshआंध्र प्रदेशCourtन्यायालय