शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

अर्थव्यवस्था वेगात; रोजगार मात्र जैसे थे!

By admin | Updated: September 3, 2016 02:53 IST

गेल्या दोन वर्षांपासून भारत जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरला आहे. तथापि, रोजगाराच्या बाबतीत त्यामुळे कोणताही फरक पडलेला नाही, तसेच लोकांच्या

नवी दिल्ली : गेल्या दोन वर्षांपासून भारत जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरला आहे. तथापि, रोजगाराच्या बाबतीत त्यामुळे कोणताही फरक पडलेला नाही, तसेच लोकांच्या मिळकतीतही फारशी वाढ झालेली नाही. २५ वर्षीय अशोक कुमार ट्रक ड्रायव्हर आहे. १३ जणांच्या कुटुंबात तो एकटाच कमावता आहे. त्याला महिन्याला १0 हजार रुपये मिळतात. त्यात त्याचे भागत नाही. त्याला हे काम सोडायचेय; पण त्याच्या समोर कोणताही पर्याय नाही. काम मिळत नसल्यामुळे त्याचा भाऊ गेल्या वर्षीच उत्तर प्रदेशातील आपल्या गावी परतला. आपल्यालाही असेच गावी जावे लागेल का, अशी भीती अशोक कुमारला वाटते. बुधवारी जारी झालेल्या आकडेवारीनुसार, जूनमधील भारताचा वृद्धीदर घसरून ७.१ टक्के झाला. हा १५ महिन्यांचा नीचांक आहे. हा दर जगातील अन्य देशांच्या तुलनेत जास्त असला तरी, लक्षावधी लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी अर्थव्यवस्था सक्रिय करण्यास तो पुरेसा नाही. २0१५ च्या तुलनेत रोजगारनिर्मिती दोन तृतियांशने घटली आहे. अर्थव्यवस्थेची वाढ आणि रोजगार निर्मितीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात बिघडत चालले आहे. एचडीएफसी बँकेच्या अभ्यासानुसार, अर्थव्यवस्था १ टक्क्याने वाढल्यास रोजगाराचे प्रमाण फक्त 0.१५ टक्क्यांनीच वाढते. २000 मध्ये हे प्रमाण 0.३९ टक्के होते. याचाच अर्थ रोजगार निर्मिती अध्यापेक्षा जास्त प्रमाणात घटली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी १0 वर्षांत २५0 दशलक्ष नोकऱ्या निर्माण करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे. तथापि, हे उद्दिष्ट सध्या तरी दृष्टीपथात दिसत नाही. अशोक कुमारने सांगितले की, एका नोकरीसाठी २0 जण मुलाखत द्यायला येतात. त्यामुळे घासाघीस करणे परवडत नाही. आकडेवारीनुसार, भारतातील १.३ अब्ज लोक ३५ वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. त्यात वाढच होत आहे. त्यामुळे कामकाजी वयाची लोकसंख्या भारतात सर्वाधिक होईल. ही लोकसंख्या उपयुक्त ठरेल की, ओझे हे रोजगार किती निर्माण होतो, यावरूनच ठरेल. शहरी भागातील बेरोजगारी ११ टक्क्यांवरबीएसई आणि सेंटर फॉर मॉनिटरिंग इकॉनॉमी (सीएमआयई) यांनी संयुक्तरीत्या जारी केलेल्या आकडेवारीनुसार आॅगस्टमध्ये शहरी भागातील बेरोजगारी वाढून ११.२४ टक्क्यांवर गेली आहे. ग्रामीण भागातील बेरोजगारीत प्रमाण ९.१८ टक्के आहे. राष्ट्रीय पातळीवर बेरोजगारीचे प्रमाण ९.८४ टक्के आहे. बीएसई-सीएमआयईने देशातील पहिला हाय फ्रिक्वेंसी डाटा यंदाच एप्रिलमध्ये सुरू केला आहे.