शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

अर्थव्यवस्था वेगात; रोजगार मात्र जैसे थे!

By admin | Updated: September 3, 2016 02:53 IST

गेल्या दोन वर्षांपासून भारत जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरला आहे. तथापि, रोजगाराच्या बाबतीत त्यामुळे कोणताही फरक पडलेला नाही, तसेच लोकांच्या

नवी दिल्ली : गेल्या दोन वर्षांपासून भारत जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरला आहे. तथापि, रोजगाराच्या बाबतीत त्यामुळे कोणताही फरक पडलेला नाही, तसेच लोकांच्या मिळकतीतही फारशी वाढ झालेली नाही. २५ वर्षीय अशोक कुमार ट्रक ड्रायव्हर आहे. १३ जणांच्या कुटुंबात तो एकटाच कमावता आहे. त्याला महिन्याला १0 हजार रुपये मिळतात. त्यात त्याचे भागत नाही. त्याला हे काम सोडायचेय; पण त्याच्या समोर कोणताही पर्याय नाही. काम मिळत नसल्यामुळे त्याचा भाऊ गेल्या वर्षीच उत्तर प्रदेशातील आपल्या गावी परतला. आपल्यालाही असेच गावी जावे लागेल का, अशी भीती अशोक कुमारला वाटते. बुधवारी जारी झालेल्या आकडेवारीनुसार, जूनमधील भारताचा वृद्धीदर घसरून ७.१ टक्के झाला. हा १५ महिन्यांचा नीचांक आहे. हा दर जगातील अन्य देशांच्या तुलनेत जास्त असला तरी, लक्षावधी लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी अर्थव्यवस्था सक्रिय करण्यास तो पुरेसा नाही. २0१५ च्या तुलनेत रोजगारनिर्मिती दोन तृतियांशने घटली आहे. अर्थव्यवस्थेची वाढ आणि रोजगार निर्मितीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात बिघडत चालले आहे. एचडीएफसी बँकेच्या अभ्यासानुसार, अर्थव्यवस्था १ टक्क्याने वाढल्यास रोजगाराचे प्रमाण फक्त 0.१५ टक्क्यांनीच वाढते. २000 मध्ये हे प्रमाण 0.३९ टक्के होते. याचाच अर्थ रोजगार निर्मिती अध्यापेक्षा जास्त प्रमाणात घटली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी १0 वर्षांत २५0 दशलक्ष नोकऱ्या निर्माण करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे. तथापि, हे उद्दिष्ट सध्या तरी दृष्टीपथात दिसत नाही. अशोक कुमारने सांगितले की, एका नोकरीसाठी २0 जण मुलाखत द्यायला येतात. त्यामुळे घासाघीस करणे परवडत नाही. आकडेवारीनुसार, भारतातील १.३ अब्ज लोक ३५ वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. त्यात वाढच होत आहे. त्यामुळे कामकाजी वयाची लोकसंख्या भारतात सर्वाधिक होईल. ही लोकसंख्या उपयुक्त ठरेल की, ओझे हे रोजगार किती निर्माण होतो, यावरूनच ठरेल. शहरी भागातील बेरोजगारी ११ टक्क्यांवरबीएसई आणि सेंटर फॉर मॉनिटरिंग इकॉनॉमी (सीएमआयई) यांनी संयुक्तरीत्या जारी केलेल्या आकडेवारीनुसार आॅगस्टमध्ये शहरी भागातील बेरोजगारी वाढून ११.२४ टक्क्यांवर गेली आहे. ग्रामीण भागातील बेरोजगारीत प्रमाण ९.१८ टक्के आहे. राष्ट्रीय पातळीवर बेरोजगारीचे प्रमाण ९.८४ टक्के आहे. बीएसई-सीएमआयईने देशातील पहिला हाय फ्रिक्वेंसी डाटा यंदाच एप्रिलमध्ये सुरू केला आहे.