शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

अर्थव्यवस्थेत श्रावण-भाद्रपद महिन्यात मंदी असतेच - मोदी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 11:18 IST

'राजकीय पक्ष मंदी जास्त असल्याचे सांगत निवडणुकीतील पराभवाचा राग काढत आहेत'

पटना : गेल्या काही दिवसांपासून विविध क्षेत्रात आलेल्या मरगळीमुळे देशावरील मंदीचे सावट गडद होत असतानाचा आर्थिक परिस्थितीही बिकट बनली आहे. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीमध्ये देशाचा जीडीपी घटून पाच टक्क्यांवर आला आहे. गेल्या सहा वर्षांतील जीडीपीच्या वाढीचा हा निचांक आहे. जीडीपीच्या वाढीमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेली घट हा मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांसाठी धक्का मानला जात आहे. याचत बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी देशातील सध्याच्या आर्थिक परिस्थितीवर टिप्पणी केली आहे.

सुशील मोदी यांनी श्रावण आणि भाद्रपद महिन्यात मंदी असल्याचे म्हटले आहे. सुशील मोदी यांनी यासंबंधी एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, सहसा दरवर्षी श्रावण आणि भाद्रपदमध्ये अर्थव्यवस्थेत मंदी असते. मात्र, यावेळी राजकीय पक्ष मंदी जास्त असल्याचे सांगत निवडणुकीतील पराभवाचा राग काढत आहेत.' याचबरोबर, देशातील आर्थिक मंदीवर काही चिंता करण्याची गरज नाही. केंद्र सरकार यावर अनेक उपाय - योजना आखत आहे, असे सुशील मोदी यांनी सांगितले. ते म्हणाले, 'केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेत तेजी आणण्यासाठी 32 सुत्री दिलासा देणाऱ्या निधीची घोषणा केली आहे. दहा सरकारी बँकांचे विलीनीकरण केले आहे. सरकारच्या या निर्णयाचा प्रभाव येत्या तिमाहीत दिसेल.'  

दरम्यान, श्रावण आणि भाद्रपद मराठी दिनदर्शिकेत पाचवा व सहावा महिना असतो. असे मानले जाते की, या महिन्यात नवीन साहित्य खरेदी केले जात नाही किंवा नवीन कामाची सुरुवात केली जात नाही. तसेच, भाद्रपद वद्य प्रतिपदा ते अमावस्या हा पंधरा दिवसांचा कालावधी 'पक्ष पंधरवडा' म्हणून पाळला जातो. त्यामुळे या पंधरवड्यात नवीन खरेदी करू नये, शुभ कार्ये टाळावी, असे बरेचजण मानतात.

(विलीनीकरणाने एकही नोकरी जाणार नाही)

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाNarendra Modiनरेंद्र मोदीBiharबिहारBJPभाजपा