शहरं
Join us  
Trending Stories
1
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
2
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
ऑलिम्पिक क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, कधीपासून रंगणार 'रन'संग्राम? जाणून घ्या
4
५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत! आयुष्मान कार्ड अंतर्गत नेमके कोणते आजार येतात? लगेच तपासा!
5
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
6
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
7
Astro Tips: सगळं काही चांगलं आहे, तरी लग्न होत नाही; याला कारणीभूत ठरू शकते ग्रहदशा!
8
Olympics 2028: ऑलिंम्पिकचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठं रंगणार क्रिकेट सामने? A टू Z माहिती
9
फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज?
10
"तुमच्यापेक्षा जास्त बोलता येते..."; विधानसभेत ठाकरेंचे आमदार आणि शिंदेसेनेचे मंत्री भिडले
11
"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते
12
"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं
13
४ दिवसांच्या घसरणीनंतर बाजाराची जोरदार मुसंडी! हिरो मोटो ते सन फार्मा... 'या' शेअर्सने केलं मालामाल
14
Pune Porsche Accident Update: दोघांना उडवणाऱ्या आरोपीला दिलासा, पोलिसांना मोठा झटका; न्याय मंडळाचा निर्णय काय?
15
बेडरुमचा दरवाजा वाजवला, आईला संशय आला; दार तोडताच रक्ताच्या थारोळ्यात दिसले पती-पत्नी
16
विकली जाणार ५४ वर्ष जुनी 'ही' कंपनी, तुम्ही नक्कीच नाव ऐकलं असणार; ४५ देशांत आहे ६,४८२ कोटींचा व्यवसाय 
17
सरकार नेमके कोणाला, कशाला 'अर्बन नक्षलवाद' ठरवणार आहे?; जनसुरक्षा कायद्यावरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल
18
'कुठल्या दलित व्यक्तीला का पाठवलं नाही?', शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका!
19
चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली 'प्रोजेक्ट' धर्मांतर सुरू होते, काम करणाऱ्या मुलींना पैसे दिले जात होते
20
डाएटिंग, व्यायाम... सर्व करुन दमलात पण वजन कमीच होईना; रोजच्या 'या' ६ सवयी जबाबदार

अर्थव्यवस्थेत श्रावण-भाद्रपद महिन्यात मंदी असतेच - मोदी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 11:18 IST

'राजकीय पक्ष मंदी जास्त असल्याचे सांगत निवडणुकीतील पराभवाचा राग काढत आहेत'

पटना : गेल्या काही दिवसांपासून विविध क्षेत्रात आलेल्या मरगळीमुळे देशावरील मंदीचे सावट गडद होत असतानाचा आर्थिक परिस्थितीही बिकट बनली आहे. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीमध्ये देशाचा जीडीपी घटून पाच टक्क्यांवर आला आहे. गेल्या सहा वर्षांतील जीडीपीच्या वाढीचा हा निचांक आहे. जीडीपीच्या वाढीमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेली घट हा मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांसाठी धक्का मानला जात आहे. याचत बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी देशातील सध्याच्या आर्थिक परिस्थितीवर टिप्पणी केली आहे.

सुशील मोदी यांनी श्रावण आणि भाद्रपद महिन्यात मंदी असल्याचे म्हटले आहे. सुशील मोदी यांनी यासंबंधी एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, सहसा दरवर्षी श्रावण आणि भाद्रपदमध्ये अर्थव्यवस्थेत मंदी असते. मात्र, यावेळी राजकीय पक्ष मंदी जास्त असल्याचे सांगत निवडणुकीतील पराभवाचा राग काढत आहेत.' याचबरोबर, देशातील आर्थिक मंदीवर काही चिंता करण्याची गरज नाही. केंद्र सरकार यावर अनेक उपाय - योजना आखत आहे, असे सुशील मोदी यांनी सांगितले. ते म्हणाले, 'केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेत तेजी आणण्यासाठी 32 सुत्री दिलासा देणाऱ्या निधीची घोषणा केली आहे. दहा सरकारी बँकांचे विलीनीकरण केले आहे. सरकारच्या या निर्णयाचा प्रभाव येत्या तिमाहीत दिसेल.'  

दरम्यान, श्रावण आणि भाद्रपद मराठी दिनदर्शिकेत पाचवा व सहावा महिना असतो. असे मानले जाते की, या महिन्यात नवीन साहित्य खरेदी केले जात नाही किंवा नवीन कामाची सुरुवात केली जात नाही. तसेच, भाद्रपद वद्य प्रतिपदा ते अमावस्या हा पंधरा दिवसांचा कालावधी 'पक्ष पंधरवडा' म्हणून पाळला जातो. त्यामुळे या पंधरवड्यात नवीन खरेदी करू नये, शुभ कार्ये टाळावी, असे बरेचजण मानतात.

(विलीनीकरणाने एकही नोकरी जाणार नाही)

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाNarendra Modiनरेंद्र मोदीBiharबिहारBJPभाजपा