शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

अर्थव्यवस्थेत श्रावण-भाद्रपद महिन्यात मंदी असतेच - मोदी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 11:18 IST

'राजकीय पक्ष मंदी जास्त असल्याचे सांगत निवडणुकीतील पराभवाचा राग काढत आहेत'

पटना : गेल्या काही दिवसांपासून विविध क्षेत्रात आलेल्या मरगळीमुळे देशावरील मंदीचे सावट गडद होत असतानाचा आर्थिक परिस्थितीही बिकट बनली आहे. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीमध्ये देशाचा जीडीपी घटून पाच टक्क्यांवर आला आहे. गेल्या सहा वर्षांतील जीडीपीच्या वाढीचा हा निचांक आहे. जीडीपीच्या वाढीमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेली घट हा मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांसाठी धक्का मानला जात आहे. याचत बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी देशातील सध्याच्या आर्थिक परिस्थितीवर टिप्पणी केली आहे.

सुशील मोदी यांनी श्रावण आणि भाद्रपद महिन्यात मंदी असल्याचे म्हटले आहे. सुशील मोदी यांनी यासंबंधी एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, सहसा दरवर्षी श्रावण आणि भाद्रपदमध्ये अर्थव्यवस्थेत मंदी असते. मात्र, यावेळी राजकीय पक्ष मंदी जास्त असल्याचे सांगत निवडणुकीतील पराभवाचा राग काढत आहेत.' याचबरोबर, देशातील आर्थिक मंदीवर काही चिंता करण्याची गरज नाही. केंद्र सरकार यावर अनेक उपाय - योजना आखत आहे, असे सुशील मोदी यांनी सांगितले. ते म्हणाले, 'केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेत तेजी आणण्यासाठी 32 सुत्री दिलासा देणाऱ्या निधीची घोषणा केली आहे. दहा सरकारी बँकांचे विलीनीकरण केले आहे. सरकारच्या या निर्णयाचा प्रभाव येत्या तिमाहीत दिसेल.'  

दरम्यान, श्रावण आणि भाद्रपद मराठी दिनदर्शिकेत पाचवा व सहावा महिना असतो. असे मानले जाते की, या महिन्यात नवीन साहित्य खरेदी केले जात नाही किंवा नवीन कामाची सुरुवात केली जात नाही. तसेच, भाद्रपद वद्य प्रतिपदा ते अमावस्या हा पंधरा दिवसांचा कालावधी 'पक्ष पंधरवडा' म्हणून पाळला जातो. त्यामुळे या पंधरवड्यात नवीन खरेदी करू नये, शुभ कार्ये टाळावी, असे बरेचजण मानतात.

(विलीनीकरणाने एकही नोकरी जाणार नाही)

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाNarendra Modiनरेंद्र मोदीBiharबिहारBJPभाजपा