शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

Video: मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात आर्थिक मंदी; डॉ. मनमोहन सिंग यांचा घणाघात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 13:02 IST

नोटबंदी आणि जीएसटीसारख्या निर्णयामुळे देशात आर्थिक मंदी आली आहे.

नवी दिल्ली - माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाचा आर्थिक विकासदर घटल्याने नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढविला आहे. देशातील आर्थिक मंदीला नरेंद्र मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप डॉ. मनमोहन सिंग यांनी केला आहे. मागील तिमाही जीडीपी दर 5 टक्के आहे. यावरूनच देशात मोठी आर्थिक मंदी असल्याचं दिसून येतं असं त्यांनी सांगितले आहे. 

नोटबंदी आणि जीएसटीसारख्या निर्णयामुळे देशात आर्थिक मंदी आली आहे. उत्पादन क्षेत्रात 0.6 टक्के प्रगती आहे. आपली आर्थिक परिस्थिती नोटबंदी निर्णयाच्या एका चुकीमुळे डबघाईला गेली आहे. गुंतवणूकदारांमध्ये उदासिनता आणि गुंतवणुकीची घसरण झाल्याने अनेकांच्या नोकरीवर गदा आली आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत प्रगती करण्याची क्षमता असताना मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्थेत मंदी आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे अशी टीका डॉ. मनमोहन सिंग यांनी केली आहे. 

यावेळी डॉ. मनमोहन सिंग म्हणाले की, मागणी आणि पुरवठा यामधील प्रगती ही गेल्या 18 महिन्याच्या खालच्या स्तरावर गेली आहे. 15 वर्षात जीडीपीच्या दरात इतक्या मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. महसुलातही घट झाली आहे. छोट्या व्यापाऱ्यापासून ते मोठ्या व्यापारापर्यंत सगळेच जण करप्रणालीमुळे चिंतेत आहेत. मंदीचे चित्र असल्याने गुंतवणुकीतही कमालीची घट झाली आहे असं त्यांनी सांगितले. 

लोकांचे रोजगार जाण्याचं प्रमाण वाढत असल्याचं सांगत वाहन क्षेत्रात 3 लाख 50 हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्याचसोबत असंघटित क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात रोजगार जाण्याचे प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे असा आरोप डॉ. मनमोहन सिंग यांनी केला आहे. तसेच ग्रामीण भागातील भारताची स्थिती विदारक आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे योग्य दर मिळत नाही. उत्पन्नात वारंवार घट होत असल्याचं पाहायला मिळालं आहे असं मनमोहन सिंग यांनी सांगितले. 

दरम्यान आरबीआयकडून घेतलेले 1 लाख 76 हजार कोटी रुपये केंद्र सरकार कोणत्या योजनांसाठी वापर करणार आहे याचं उत्तर नरेंद्र मोदींकडे नाही. निर्यातीचा दर घटल्याने जागतिक बाजारात उपलब्ध झालेल्या संधीचा देशाच्या आर्थिक व्यवस्थेसाठी फायदा करुन घेता आला नाही. सरकारची विश्वासार्हता कमी होत चालली असल्याचा दावा डॉ. मनमोहन सिंग यांनी केला आहे. 

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाManmohan Singhमनमोहन सिंगNarendra Modiनरेंद्र मोदीDemonetisationनिश्चलनीकरण