शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

Video: मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात आर्थिक मंदी; डॉ. मनमोहन सिंग यांचा घणाघात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 13:02 IST

नोटबंदी आणि जीएसटीसारख्या निर्णयामुळे देशात आर्थिक मंदी आली आहे.

नवी दिल्ली - माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाचा आर्थिक विकासदर घटल्याने नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढविला आहे. देशातील आर्थिक मंदीला नरेंद्र मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप डॉ. मनमोहन सिंग यांनी केला आहे. मागील तिमाही जीडीपी दर 5 टक्के आहे. यावरूनच देशात मोठी आर्थिक मंदी असल्याचं दिसून येतं असं त्यांनी सांगितले आहे. 

नोटबंदी आणि जीएसटीसारख्या निर्णयामुळे देशात आर्थिक मंदी आली आहे. उत्पादन क्षेत्रात 0.6 टक्के प्रगती आहे. आपली आर्थिक परिस्थिती नोटबंदी निर्णयाच्या एका चुकीमुळे डबघाईला गेली आहे. गुंतवणूकदारांमध्ये उदासिनता आणि गुंतवणुकीची घसरण झाल्याने अनेकांच्या नोकरीवर गदा आली आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत प्रगती करण्याची क्षमता असताना मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्थेत मंदी आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे अशी टीका डॉ. मनमोहन सिंग यांनी केली आहे. 

यावेळी डॉ. मनमोहन सिंग म्हणाले की, मागणी आणि पुरवठा यामधील प्रगती ही गेल्या 18 महिन्याच्या खालच्या स्तरावर गेली आहे. 15 वर्षात जीडीपीच्या दरात इतक्या मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. महसुलातही घट झाली आहे. छोट्या व्यापाऱ्यापासून ते मोठ्या व्यापारापर्यंत सगळेच जण करप्रणालीमुळे चिंतेत आहेत. मंदीचे चित्र असल्याने गुंतवणुकीतही कमालीची घट झाली आहे असं त्यांनी सांगितले. 

लोकांचे रोजगार जाण्याचं प्रमाण वाढत असल्याचं सांगत वाहन क्षेत्रात 3 लाख 50 हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्याचसोबत असंघटित क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात रोजगार जाण्याचे प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे असा आरोप डॉ. मनमोहन सिंग यांनी केला आहे. तसेच ग्रामीण भागातील भारताची स्थिती विदारक आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे योग्य दर मिळत नाही. उत्पन्नात वारंवार घट होत असल्याचं पाहायला मिळालं आहे असं मनमोहन सिंग यांनी सांगितले. 

दरम्यान आरबीआयकडून घेतलेले 1 लाख 76 हजार कोटी रुपये केंद्र सरकार कोणत्या योजनांसाठी वापर करणार आहे याचं उत्तर नरेंद्र मोदींकडे नाही. निर्यातीचा दर घटल्याने जागतिक बाजारात उपलब्ध झालेल्या संधीचा देशाच्या आर्थिक व्यवस्थेसाठी फायदा करुन घेता आला नाही. सरकारची विश्वासार्हता कमी होत चालली असल्याचा दावा डॉ. मनमोहन सिंग यांनी केला आहे. 

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाManmohan Singhमनमोहन सिंगNarendra Modiनरेंद्र मोदीDemonetisationनिश्चलनीकरण