शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आतिशी यांना निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस, उद्या संध्याकाळपर्यंत मागितले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 13:05 IST

AAP leader Atishi Singh : भाजपाच्या तक्रारीनंतर आयोगाने ही नोटीस पाठवली आहे. 

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. संजय सिंह यांच्या सुटकेनंतर पक्षाला काहीसा दिलासा मिळाला असतानाच आता निवडणूक आयोगाने दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी यांना नोटीस पाठवली आहे. भाजपाच्या तक्रारीनंतर आयोगाने ही नोटीस पाठवली आहे. 

निवडणूक आयोगाने आतिशी यांना ६ एप्रिलला संध्याकाळी ५ वाजेपर्यंत उत्तर देण्यास सांगितले. दरम्यान, आपल्याला भाजपामध्ये येण्याची ऑफर देण्यात आली होती, असा आरोप आतिशी यांनी केला होता. त्यामुळे निवडणूक आयोगाने  मंत्री आतिशी यांना कथितरित्या भाजपाच्या घोडेबाजारीच्या प्रयत्नाबाबत केलेल्या विधानाबाबत वस्तुस्थिती आयोगासमोर मांडण्यास सांगितले आहे.

याआधी भाजपाच्या दिल्ली युनिटने आतिशी यांना बदनामीची नोटीस पाठवली होती आणि त्यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीद्वारे भाजपामध्ये सामील होण्याच्या दाव्याबद्दल जाहीरपणे माफी मागायला सांगितले होते. या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना आतिशी म्हणाल्या होत्या की, 'आप'च्या नेत्यांवर अशा माध्यमातून हल्ला करण्याऐवजी भाजपाने निवडणुकीत आपल्या पक्षाविरोधात लढावे. 

दरम्यान, दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांनी दावा केला होता की, त्यांच्यासह सौरभ भारद्वाज, राघव चढ्ढा आणि दुर्गेश पाठक यांच्यासह चार वरिष्ठ आप नेत्यांना लवकरच अटक केली जाईल. तसेच, मला एकतर भाजपामध्ये सामील होण्यास सांगितले होते.तसेच महिनाभरात ईडीद्वारे अटक होण्यास तयार राहा, असे सांगितले होते असा दावाही अतिशी यांनी केला होता.  

भाजपाच्या दिल्ली युनिटचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, आतिशी यांना मानहानीची नोटीस पाठवण्यात आली आहे आणि त्यांच्या दाव्याबद्दल त्यांच्याकडून जाहीर माफी मागितली  आहे. "आतिशी यांच्याशी कोणी, कधी आणि कसा संपर्क साधला, याचा पुरावा देण्यात त्या अपयशी ठरल्या. दिल्लीत 'आप' संकटाचा सामना करत आहे, त्यामुळे निराशेतून असे खोटे आणि निराधार आरोप करत आहेत, असे वीरेंद्र सचदेवा म्हणाले. 

टॅग्स :AAPआपElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४