शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

...तर पक्षाचं निवडणूक चिन्हं फ्रीज करा, निवडणूक आयोगाचा कोर्टात प्रस्ताव; राष्ट्रवादीचा माफीनामा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 17:28 IST

राजकीय पक्षांच्या उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी निवडणूक आयोगापासून लपवणे व माहिती न देणाऱ्या राजकीय पक्षांचं निवडणूक चिन्ह फ्रीज किंवा रद्द केलं जावं अशी अपील

राजकीय पक्षांच्या उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी निवडणूक आयोगापासून लपवणे व माहिती न देणाऱ्या राजकीय पक्षांचं निवडणूक चिन्ह फ्रीज किंवा रद्द केलं जावं अशी अपील निवडणूक आयोगानं मंगळवारी सुप्रीम कोर्टात केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाच्या उल्लंघनप्रकरणात निवडणूक आयोगानं हा उपाय कोर्टाला सुचवला आहे. या याचिकेवरील निर्णय कोर्टानं राखून ठेवला आहे. (EC appeal to the Supreme Court election symbols of parties should be frozen for not disclosing criminal history of candidates)

सुप्रीम कोर्टानं १३ फेब्रुवारी २०२० रोजी राजकीय निवडणूक उमेदवारांच्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीबाबत खुलासा करण्यासंदर्भात आदेश दिले होते. कोर्टाच्या आदेशांचं पालन न करणाऱ्यांविरोधात अवमान याचिका दाखल करण्यात आली होती. याच याचिकांवर सुनावणीदरम्यान निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टात आपली बाजू मांडली. याचिकेत बिहारच्या २०२० सालच्या विधानसभा निवडणुकीत कोर्टाच्या आदेशांचं पालन झालं नाही असं नमूद करण्यात आलं होतं. 

न्यायाधीश आर.एफ.नरीमन आणि बीआर गवई यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी माकपाचे वरिष्ठ नेते पीव्ही सुरेंद्रनाथ यांनी कोर्टाची बिनशर्त माफी देखील मागितली. राजकारणाचं गुन्हेगारीकरण होता कामा नये असा आम्ही देखील विचार करतो असं सुरेंद्रनाथ म्हणाले. त्यावर कोर्टानं केवळ माफी मागून काही उपयोग होणार नाही. कोर्टाच्या आदेशांचं पालन होणं गरजेचं आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बाजू मांडणाऱ्या वकिलांनीही कोर्टाची बिनशर्त माफी मागितली. 

राष्ट्रवादीनं २६ गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांना रिंगणात उतरवलंराष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं निवडणुकीत एकूण २६ गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, तर माकपनं गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या ४ उमेदवारांना तिकीट दिलं होतं, अशी माहिती निवडणूक आयोगाचे वरीष्ठ अधिवक्ता विकास सिंह यांनी कोर्टात सांगितलं. बहुजन समाज पक्षाचे (BSP) वकिलांनी बसपानं एका गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराला निलंबित केल्याची माहिती यावेळी कोर्टात दिली. गुन्हेगारीचा इतिहास प्रतिज्ञापत्रात नमूद न केल्याचं लक्षात येताच आम्ही उमेदवारावर कारवाई केली, असं बसपाच्या वतीनं सांगण्यात आलं. 

'राजद'चे १०३ उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचेराष्ट्रीय जनता दलाकडून (राजद) या नियमाचं मोठं उल्लंघन झाल्याची माहिती निवडणूक आयोगानं कोर्टात दिली. राजदनं तब्बल १०३ गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना तिकीट दिल्याचं आयोगानं स्पष्ट केलं. तर जनता दल युनायटेडनं (जदयू) ५६ गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. 

निवडणूक आयोगानं याची आता कठोरपणे दखल घेण्याची गरज व्यक्त करत अशापद्धतीनं नियमांचं उल्लंघन करणाऱ्या राजकीय पक्षांची निवडणूक चिन्हं फ्रीज करण्याचा प्रस्ताव कोर्टासमोर ठेवला आहे. 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय