शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

"लोकांनी चिकन, मटनापेक्षा गोमांस अधिक खायला हवं, कारण..."; भाजप मंत्र्याचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2021 08:51 IST

मेघालय सरकारमध्ये पशुपालन मंत्री असलेल्या सनबोर शुल्लई यांचं वक्तव्य

शिलाँग: अधिकाधिक गोमांस खावं यासाठी मेघालयमधील भारतीय जनता पक्षाचे मंत्री सनबोर शुल्लई यांनी लोकांना प्रोत्साहन दिलं आहे. चिकन, मटण आणि माशांपेक्षा गोमांस जास्त खावं यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्याची आवश्यकता आहे. यामुळे भाजप गोहत्या रोखणारा पक्ष असल्याची अल्पसंख्याक समाजाच्या मनातील धारणा दूर होईल, असं राज्य सरकारमध्ये पशुपालन मंत्री असलेले सनबोर शुल्लई यांनी म्हटलं.

सनबोर शुल्लई यांनी गेल्याच आठवड्यात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. 'चिकन, मटन आणि माशांपेक्षा गोमांस अधिक खावं यासाठी मी लोकांना प्रोत्साहन देतो. त्यासाठी आग्रह धरतो. भाजप गोहत्येला प्रतिबंध करणारा पक्ष आहे असा गैरसमज अल्पसंख्यांकांच्या मनात आहे. तो यामुळे दूर होईल,' असं शुल्लई यांनी म्हटल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे.

भारत लोकशाही मानणारा देश आहे. त्यामुळे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. ज्याला जे खायचं आहे, ती व्यक्ती ते खाऊ शकते, असं शुल्लई म्हणाले. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा यांच्याशी मी संवाद साधेन आणि आसामच्या नव्या गाय कायद्यामुळे गायींची वाहतूक प्रभावित होणार नाही याची काळजी घेईन, असंदेखील त्यांनी पुढे म्हटलं.

सध्या आसाम-मेघालय यांच्यातील सीमा प्रश्न पेटला आहे. गोळीबारात पोलिसांचे जीव गेले आहेत. त्यावरही शुल्लई यांनी भाष्य केलं. 'राज्याच्या सीमांचं आणि आपल्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी पोलीस दलाचा वापर करण्याची हीच योग्य वेळ आहे. आसामचे लोक सीमावर्ती भागांत आमच्या लोकांना त्रास देत असतील, तर आम्ही केवळ चर्चा करू शकत नाही. आम्हाला योग्य वेळा कारवाई करावीच लागेल,' असं शुल्लई म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपा