शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

"लोकांनी चिकन, मटनापेक्षा गोमांस अधिक खायला हवं, कारण..."; भाजप मंत्र्याचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2021 08:51 IST

मेघालय सरकारमध्ये पशुपालन मंत्री असलेल्या सनबोर शुल्लई यांचं वक्तव्य

शिलाँग: अधिकाधिक गोमांस खावं यासाठी मेघालयमधील भारतीय जनता पक्षाचे मंत्री सनबोर शुल्लई यांनी लोकांना प्रोत्साहन दिलं आहे. चिकन, मटण आणि माशांपेक्षा गोमांस जास्त खावं यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्याची आवश्यकता आहे. यामुळे भाजप गोहत्या रोखणारा पक्ष असल्याची अल्पसंख्याक समाजाच्या मनातील धारणा दूर होईल, असं राज्य सरकारमध्ये पशुपालन मंत्री असलेले सनबोर शुल्लई यांनी म्हटलं.

सनबोर शुल्लई यांनी गेल्याच आठवड्यात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. 'चिकन, मटन आणि माशांपेक्षा गोमांस अधिक खावं यासाठी मी लोकांना प्रोत्साहन देतो. त्यासाठी आग्रह धरतो. भाजप गोहत्येला प्रतिबंध करणारा पक्ष आहे असा गैरसमज अल्पसंख्यांकांच्या मनात आहे. तो यामुळे दूर होईल,' असं शुल्लई यांनी म्हटल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे.

भारत लोकशाही मानणारा देश आहे. त्यामुळे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. ज्याला जे खायचं आहे, ती व्यक्ती ते खाऊ शकते, असं शुल्लई म्हणाले. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा यांच्याशी मी संवाद साधेन आणि आसामच्या नव्या गाय कायद्यामुळे गायींची वाहतूक प्रभावित होणार नाही याची काळजी घेईन, असंदेखील त्यांनी पुढे म्हटलं.

सध्या आसाम-मेघालय यांच्यातील सीमा प्रश्न पेटला आहे. गोळीबारात पोलिसांचे जीव गेले आहेत. त्यावरही शुल्लई यांनी भाष्य केलं. 'राज्याच्या सीमांचं आणि आपल्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी पोलीस दलाचा वापर करण्याची हीच योग्य वेळ आहे. आसामचे लोक सीमावर्ती भागांत आमच्या लोकांना त्रास देत असतील, तर आम्ही केवळ चर्चा करू शकत नाही. आम्हाला योग्य वेळा कारवाई करावीच लागेल,' असं शुल्लई म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपा