शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
2
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
3
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
4
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
5
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
6
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
7
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
8
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
9
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
10
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
11
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला
12
Pune Crime: विजयने ११व्या मजल्यावरून मारली उडी, ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना
13
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
14
महाराष्ट्रातल्या मनगटात इतका दम आहे म्हणून.., प्रणित मोरेची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकला डीपी
15
"मला स्वातंत्र्य हवंय"; बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा, लोकेशन सांगितलं अन्...
16
TATA Motors ला ₹२,३८,६१,६६,००,००० चं मोठं नुकसान! JLR वर सायबर हल्ला; उत्पादन थांबलं, शेअर्समध्ये मोठी घसरण
17
हृदयद्रावक! नवरात्रीत मोठी दुर्घटना; देवीच्या मंडपात अचानक पसरला करंट; २ मुलांचा मृत्यू
18
मूलबाळ नसलेल्या हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती कुणाला मिळणार?; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
19
३०० पानांमध्ये लिहिलेत बाबाचे काळे कारनामे; इंस्टिट्यूटमध्ये होता टॉर्चर चेंबर! दिल्लीत खळबळ
20
GST मध्ये आणखी कपातीचे पंतप्रधान मोदींचे संकेत; म्हणाले, "आम्ही इकडेच थांबवणार नाही..."

सुलभ जगण्याएवढाच सुलभ न्यायही महत्त्वाचा : पंतप्रधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2022 05:17 IST

‘अखिल भारतीय जिल्हा विधिसेवा प्राधिकरणा’च्या पहिल्या परिषदेला संबोधित करताना मोदी बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : विविध तुरुंगांत खितपत पडलेल्या कच्च्या कैद्यांच्या मुक्ततेची प्रक्रिया अधिक गतिमान करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी भारतीय न्यायव्यवस्थेला केले. भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना सुलभ जगण्याएवढाच सुलभ न्यायही महत्त्वाचा आहे, असेही मोदी यांनी म्हटले. 

‘अखिल भारतीय जिल्हा विधिसेवा प्राधिकरणा’च्या पहिल्या परिषदेला संबोधित करताना मोदी बोलत होते. मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात संस्कृत श्लोकाने केली. त्यांनी सांगितले की, ‘अङ्गेन गात्रं नयनेन वक्त्रं। न्यायेन राज्यं लवणेन भोज्यं ।।’ म्हणजेच, ‘विभिन्न अवयांनी शरीराची, डोळ्यांनी चेहऱ्याची व मीठाने भोजनाची सार्थकता होते, तशीच शासन व्यवस्थेची न्यायाने सार्थकता होते.’ आपल्या देशात सामान्य व्यक्तीला विश्वास आहे की, जेव्हा आपले ऐकणारा कोणीच नसेल, तेव्हा न्यायालयाचे दरवाजे आपल्यासाठी खुले आहेत. देश आपल्या अधिकारांचे रक्षण करीत आहे, ही भावना लोकांच्या मनात न्यायालयांवरील विश्वासामुळेच टिकून आहे.

मोदी यांनी सांगितले की, जिल्हा न्यायालयांत एक कोटीपेक्षा अधिक खटल्यांची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होत आहे. सर्वोच्च व उच्च न्यायालयातही अशाच पद्धतीने ६० लाख खटल्यांची सुनावणी होत आहे. 

थोडेच लोक पोहोचू शकतात न्यायालयात - सरन्यायाधीशदेशातील फारच थोडे लोक न्यायालयात पोहोचतात. मोठ्या संख्येने लोक जागरुकता आणि आवश्यक साधनांच्या अभावामुळे गप्प राहून अन्याय सहन करीत राहतात, अशी खंत सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी याप्रसंगी व्यक्त केली. न्या. रमणा यांनी सांगितले की, लोकांना सक्षम बनविण्यात तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. न्यायदानाची गती वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साधनांचा वापर करायला हवा. न्या. रमणा यांनी म्हटले की, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय, ही भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेतील भूमिका आहे. त्यासाठी न्यायदानाची गती वाढविणे आवश्यक आहे. समाजातील सर्व प्रकारची विषमता दूर करण्याच्या उद्दिष्टाच्या आधारावर आधुनिक भारताची बांधणी झाली आहे. सामाजिक मुक्ततेशिवाय सहभाग शक्य नाही आणि न्यायाची उपलब्धता हे सामाजिक मुक्ततेचे साधन आहे.

मोदी-रमणा प्रथमच एका मंचावर‘अखिल भारतीय जिल्हा विधिसेवा प्राधिकरण’च्या पहिल्या परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा हे प्रथमच एका व्यासपीठावर आले. न्यायव्यवस्था बदलत आहे, त्याचे सर्व श्रेय आपणास जाते, अशा शब्दांत मोदी यांनी न्यायव्यवस्थेची प्रशंसा केली. आपणा सर्वांच्या (न्यायाधीशांच्या) मध्ये येणे ही सुखद बाब आहे. मात्र, अशा वेळी बोलणे कठीण होऊन जाते, असेही मोदी यांनी म्हटले.गरिबांसाठी विधिसाहाय्य व्यवस्था उभारणार : न्या. उदय लळितसर्वोच्च न्यायालयाचे न्या. उदय उमेश लळित यांनी याप्रसंगी सांगितले की, राष्ट्रीय विधिसेवा प्राधिकरणाच्या (नालसा) माध्यमातून देशभरातील सर्व जिल्ह्यांत गरिब व वंचितांसाठी विधि साहाय्य व्यवस्था उभारण्यात येणार आहे. सरकारी वकिलांच्या धर्तीवर ही व्यवस्था काम करील. 

न्याय्य समता प्रस्थापित करण्यास सरकार बांधील - न्या. चंद्रचूडन्या. डी. वाय. चंद्रचूड यांनी याप्रसंगी सांगितले की, न्याय हा केवळ सामाजिक-आर्थिक बलशाली लोकांपुरताच मर्यादित राहता कामा नये. तो सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे. न्याय्य, समतावादी समाजव्यवस्था उभी करण्यास सरकार बांधील आहे.

विधिमंत्री किरण रिजीजू यांनी याप्रसंगी सांगितले की, राष्ट्रीय विधिसेवा प्राधिकरणाने (नालसा) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पात्र कैद्यांच्या मुक्ततेसाठी मोहीम हाती घेतली आहे. पात्र कैद्यांची ओळख पटविणे तसेच त्यांचे खटले आढावा समितीकडे पाठविण्यावर ‘नालसा’ काम करीत आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCourtन्यायालय