शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व भारतातील रेल्वेंना लागेल सगळ्यात आधी जीपीएस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 03:12 IST

डाटात हस्तक्षेपाबद्दल तीन अधिकारी निलंबित

नवी दिल्ली : रेल्वे नालासोपाराच्या बाहेर सिग्नलला उभी आहे आणि रेल्वे दाखवते आहे की ती मुंबई सेंट्रलला पोहोचली. अनेकवेळा अशी परिस्थिती तुम्हालाही तुमच्या शहराच्या स्टेशनवर अनुभवास आली असेल. ही तांत्रिक चूक नव्हे तर अनेक रेल्वे अधिकारी त्यांच्याकडील रेल्वेगाड्या वेळापत्रकानुसार असल्याचे दाखवण्यासाठी रेल्वेच्या लॉगर-डाटा मशीन किंवा त्यातील माहितीत (डाटा) हस्तक्षेप करतात.हा प्रकार पकडल्यानंतर रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी सगळ्या रेल्वेगाड्यांच्या मूळ वेळांवर देखरेख ठेवण्यासाठी जीपीएस लावण्याचा आदेश दिला. याची सुरवात पूर्व भारत, बिहार-उत्तर प्रदेश-पश्चिम बंगाल-ओडिशाकडे जाणाऱ्या व येणाºया रेल्वेगाड्यांपासून होईल. या मार्गांवरील रेल्वे उशिरा धावत असल्याच्या सगळ्यात जास्त तक्रारी होत्या. शिवाय या मार्गांवर प्रवासीही प्रचंड आहेत.गोयल म्हणाले, रेल्वेगाड्या आपल्या झोनमध्ये वेळापत्रकानुसार धावत आहेत हे दाखवण्यासाठी काहीच अधिकारी त्यांच्या येण्या-जाण्याच्या डाटामध्ये हस्तक्षेप करतात हे आमच्या निदर्शनास आले. याची चौकशी केली गेली व तीन जणांवर त्याचा ठपका ठेवला गेला. त्यांच्यावर कारवाई करून तिघांनाही निलंबित केले गेले.आम्ही नियमितपणे वेळापत्रकाचे निरीक्षण करीत असून देशाच्या कोणत्या विभागात रेल्वेगाड्या उशिरा धावतात व त्यांची कारणे काय आहेत यासाठी आम्ही डाटा लॉगर लावले. त्यांचा अभ्यास केला जात आहे. लवकरच जीपीएस सगळ््या रेल्वेगाड्यांना लावले जातील. त्यामुळे कोणतीही व्यक्ती कधीही त्याच्या मोबाईल फोनवर कोणत्याही रेल्वेचे नेमके ठिकाण (लोकेशन) पाहू शकेल. हे काम लवकरच सुरू केले जात आहे. सगळ््यात आधी कोलकाता लाईनवर धावणाºया रेल्वेगाड्यांना लावले जाईल, असे गोयल म्हणाले.गोयल म्हणाले, रेल्वेगाड्या उशिराधावण्याचे कारण म्हणजे मर्यादित मार्गांवर जास्त रेल्वेंची वाहतूक असणे. रेल्वेमार्ग रिकामे असतील अशी पावले उचलली जात आहेत.यात सगळ््यात महत्वाचे म्हणजे विशेष माल वाहतुकीचा मार्ग आहे. दिल्ली-मुंबई आणि लुधियाना-दिल्ली-सोनपूर दरम्यान जेव्हा याची निर्मिती होईल तेव्हा या मार्गावर फक्त रेल्वेची गती वाढेल, असेनाही तर प्रवाशी रेल्वेगाड्याही धावतील. याचा लाभ प्रवाशांना होईल वमालगाड्या या विशेष मार्गावर धावतील. याच प्रमाणे दिल्ली-मुंबई, दिल्ली-कोलकाता, दिल्ली चेन्नई, मुंबई-चेन्नई रेल्वे लाईनला पूर्णपणे इलेक्ट्रीक केले जाईल. यामुळे वेगातही वाढ होईल. याचप्रमाणे अनेक पावले रेल्वेची गती आणि क्षमता वाढवण्यासाठी उचलली जात आहेत, असे ते म्हणाले.

 

टॅग्स :railwayरेल्वे