शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
3
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
4
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
5
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
6
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
7
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
8
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
9
...तरच महिलांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, महाराष्ट्र सरकारने नियम बदलले
10
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
11
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
12
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
13
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
14
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
15
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
16
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
17
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
18
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
19
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
20
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली

आधी होते १०० कोटी उपाशी, आता झालेत २०० कोटी काैशल्यवान हात- पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 06:24 IST

‘सबका साथ सबका विकास’ जगकल्याणाचे माॅडेल

नवी दिल्ली :  बऱ्याच कालावधीपासून भारत हा १०० कोटी उपाशी पाेट असलेल्या लाेकांचा देश आहे, असे समजले जात हाेते. मात्र, आता ही धारणा बदलली असून, आता १०० कोटींपेक्षा अधिक महत्त्वाकांक्षी बुद्धिवंत लाेक, २०० कोटींपेक्षा अधिक काैशल्यवान हात आणि काेट्यवधी तरुणांचा देश म्हणून आता भारताकडे बघितले जात आहे. वर्ष २०४७ पर्यंतचा काळ आपल्या सर्वांसाठी फार माेठी संधी घेऊन आला आहे. पुढील १ हजार वर्षांपर्यंत स्मरणात राहील, असा विकासाचा पाया रचण्याची संधी या काळात राहणाऱ्या भारतीयांकडे आहे. २०४७ पर्यंत आपला देश विकसित देशांमध्ये सामील हाेईल, असा ठाम विश्वास पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी व्यक्त केला आहे.

भारताच्या अध्यक्षतेखाली जी-२० शिखर परिषदेचे नवी दिल्ली येथे ९ आणि १० सप्टेंबर राेजी आयाेजन हाेणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान माेदी यांनी ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या  मुलाखतीमध्ये जागतिक अर्थव्यवस्थेचे बदलते स्वरूप, भारताचा आर्थिक विकास, जागतिक पातळीवर देशाचे वाढते महत्त्व, सायबर सुरक्षा, कर्जाचा विळखा, जैवइंधनाचे धाेरण इत्यादींबाबत ठाम भूमिका मांडली. आपल्या कल्पनेतला २०४७ मधील भारत कसा असेल, यावरही त्यांनी प्रकाश टाकला. मोदी म्हणाले, दुसऱ्या महायुद्धानंतरच्या जगात नवी रचना अस्तित्वात आली. त्याचप्रमाणे काेराेना महामारीनंतर जगात नवी व्यवस्था आकार घेत आहे. जगाचा जीडीपीकेंद्रित दृष्टिकाेन आता मानवकेंद्रित हाेत आहे. त्यात भारत एका मध्यस्थाची भूमिका पार पाडत आहे. 

माेदी म्हणाले...जगाप्रति आमचे शब्द आणि दृष्टिकाेन केवळ विचारांच्याच स्वरूपामध्ये नव्हे, तर भविष्यातील राेडमॅपच्या रूपानेही स्वीकारले जात आहेत.जीडीपी कितीही असाे, प्रत्येकाचा आवाज महत्त्वाचा आहे. भारताच्या जी-२० अध्यक्षतेमुळे अनेक सकारात्मक परिणाम समाेर येत आहेत.

रेवडी संस्कृतीवर पंतप्रधान म्हणाले...विकसनशील देशांसाठी जागतिक कर्जाचे संकट चिंतेचा विषय आहे. अनेक राज्यांनी माेफतच्या सुविधा, वस्तू वाटण्याचे धाेरण स्वीकारले. याचे क्षणिक राजकीय लाभ मिळतील. मात्र, दीर्घ कालावधीचा विचार केल्यास याचे फार माेठे सामाजिक आणि आर्थिक मूल्य माेजावे लागू शकते. बेजबाबदार आर्थिक धाेरणे आणि लाेकप्रियतावादाचा सर्वाधिक परिणाम सर्वांत गरीब वर्गावर हाेताे.

‘भारत आता केवळ बाजारपेठ नव्हे’

आर्थिक आव्हानांशिवाय मानवतेला प्रभावित करणारी इतर अनेक महत्त्वपूर्ण आणि तात्कालिक आव्हानेदेखील आहेत, याची जाणीव काेराेना महामारीने जगाला करून दिली. भारताने आर्थिक विकास, तंत्रज्ञानातील प्रगती तसेच संस्थागत वितरणासाठी सामाजिक पायाभूत सुविधेत मानवकेंद्रित विकासाचे माॅडेल सादर केले. जगासमाेर ते आज आदर्श बनले आहे. भारताने उचललेल्या माेठ्या पावलांची जगभरात चर्चा हाेत आहे. n ज्या देशाला आतापर्यंत एक बाजारपेठ म्हणून पाहिले जात हाेते, ताे आता जागतिक आव्हानांचे उत्तर म्हणून समाेर येत आहे.

एक लाख प्रतिनिधींनी पाहिला ‘४डी’ भारतदेशभरात २००हून अधिक विभागीय बैठकांच्या माध्यमातून जी-२० देशांच्या एक लाखाहून जास्त प्रतिनिधींनी विविध भागात जाऊन ‘४डी’ भारत पाहिला. ‘४डी’ म्हणजे, भारताची डेमाेग्राफी, डेमाेक्रेसी, डायव्हर्सिटी आणि डेव्हलपमेंट. यामुळे गेल्या दशकात लाेक कसे सक्षम झाले आहेत, हे या प्रतिनिधींनी पाहिले, असे पंतप्रधान म्हणाले.

सारेच झाले चकितजगाला ज्या उपायांची गरज आहे, त्यापैकी अनेक उपाय आपल्या देशात वेगाने आणि माेठ्या प्रमाणावर आधीपासून यशस्वीरीत्या लागू झाले आहेत. हे पाहून प्रतिनिधी चकित झाल्याचे पंतप्रधान म्हणाले.

यूएनमध्ये सर्व पक्षांचे प्रतिनिधित्व हवेजगाच्या बदलत्या स्वरुपानुसार संयुक्त राष्ट्रात सुधारणांचे पंतप्रधानांनी जाेरदार समर्थन केले. २१व्या शतकात २०व्या शतकातील मध्यकालीन वृत्ती चालू शकत नाही. सर्व पक्षांचे संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रतिनिधित्व हवे, हे सुनिश्चित करण्यासाठी अशा प्रकारच्या सुधारणा झाल्या पाहिजे, असे माेदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतBJPभाजपा