शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादीचे देशव्यापी पुनरावलोकन का गरजेचे? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
3
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
5
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
6
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
7
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
8
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
9
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
10
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
11
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
12
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
13
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
14
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
15
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
16
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
17
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
18
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
19
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
20
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर

"काही फक्त खिशात संविधान ठेवतात, पूर्वजांकडून त्यांनी..."; संरक्षण मंत्र्यांची राहुल गांधींवर सडकून टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 14:10 IST

लोकसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

Rajnath Singh takes jibe at Rahul Gandhi : हिवाळी अधिवेशनात अनेक दिवसांच्या सततच्या गदारोळानंतर आज राज्यघटनेवर चर्चा सुरू झाली तेव्हा पहिले भाषण संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे होते. लोकसभेत संविधानावरील चर्चेला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सुरुवात केली. ७५ वर्षांपूर्वी संविधान सभेने संविधानाचा मसुदा तयार करण्याचे काम पूर्ण केले होते. संविधान सभेने तयार केलेली राज्यघटना केवळ कायदेशीर दस्तऐवज नसून ती लोकांच्या आकांक्षांचे प्रतिबिंब असल्याचे यावेळी मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी काँग्रेसवर संविधानाची अवहेलना करून त्यावर सत्ता निवडल्याचा आरोप केला आहे. यावेळी राजनाथ सिंह यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. एक नेता संविधानाची प्रत खिशात ठेवून फिरत असतो, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं.

"संविधानाच्या माध्यमातून देशात खऱ्या अर्थाने लोकशाही लागू झाली आहे. आपली राज्यघटना सार्वत्रिक आहे, त्यात राज्याच्या जबाबदाऱ्यांची यादी तर आहेच, शिवाय त्यात नागरिकांच्या हक्कांचाही उल्लेख आहे. आपली राज्यघटना सहकारी लोकशाहीची खात्री देते आणि राष्ट्राची एकात्मताही सुनिश्चित करते. भारतीय राज्यघटना हा देशाचा अभिमान प्रस्थापित करण्याचा रोडमॅप देखील आहे, " असं राजनाथ सिंह म्हणाले. सावरकर आणि भगतसिंग यांसारख्या संविधान सभेचा भाग नसलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या विचारांनीही राज्यघटना मजबूत केल्याचेही राजनाथ सिंह यांनी म्हटलं.

"काही लोक आपली राज्यघटना ही केवळ चांगल्या गोष्टींचा संग्रह मानतात. गेल्या काही वर्षांपासून संविधान ही एकाच पक्षाची देणगी आहे, असे वातावरण देशात निर्माण झाले आहे. संविधान निर्मितीत अनेकांची भूमिका नाकारली गेली आहे. विशिष्ट पक्षाचे एक नेते आपल्या खिशात संविधानाची प्रत घेऊन फिरतात. खरे तर हेच त्यांनी त्यांच्या पूर्वजांकडून शिकलं आहे," असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं.  राजनाथ सिंह यांचा हा टोमणा काँग्रेस नेते राहुल गांधी यांना होता असं म्हटलं जात आहे.

यावेळी राजनाथ सिंह यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचाही किस्सा सांगत राहुल गांधींचा खरपूस समाचार घेतला. "अटलबिहारी वाजपेयी १९९५ मध्ये जिनिव्हाला गेले होते. त्यांनी तत्कालीन सरकारच्या पावलांचे कौतुक करत भारताची बाजू मांडली. इतकंच नाही तर भारतात परतल्यावर त्यांनी इथेही तेच सांगितलं. आज परिस्थिती अशी आहे की विरोधी नेते परदेशात जाऊन भारताविरुद्ध बोलतात," असं राजनाथ सिंह म्हणाले. 

टॅग्स :lok sabhaलोकसभाRajnath Singhराजनाथ सिंहRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस