शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

"काही फक्त खिशात संविधान ठेवतात, पूर्वजांकडून त्यांनी..."; संरक्षण मंत्र्यांची राहुल गांधींवर सडकून टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 14:10 IST

लोकसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

Rajnath Singh takes jibe at Rahul Gandhi : हिवाळी अधिवेशनात अनेक दिवसांच्या सततच्या गदारोळानंतर आज राज्यघटनेवर चर्चा सुरू झाली तेव्हा पहिले भाषण संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे होते. लोकसभेत संविधानावरील चर्चेला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सुरुवात केली. ७५ वर्षांपूर्वी संविधान सभेने संविधानाचा मसुदा तयार करण्याचे काम पूर्ण केले होते. संविधान सभेने तयार केलेली राज्यघटना केवळ कायदेशीर दस्तऐवज नसून ती लोकांच्या आकांक्षांचे प्रतिबिंब असल्याचे यावेळी मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी काँग्रेसवर संविधानाची अवहेलना करून त्यावर सत्ता निवडल्याचा आरोप केला आहे. यावेळी राजनाथ सिंह यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. एक नेता संविधानाची प्रत खिशात ठेवून फिरत असतो, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं.

"संविधानाच्या माध्यमातून देशात खऱ्या अर्थाने लोकशाही लागू झाली आहे. आपली राज्यघटना सार्वत्रिक आहे, त्यात राज्याच्या जबाबदाऱ्यांची यादी तर आहेच, शिवाय त्यात नागरिकांच्या हक्कांचाही उल्लेख आहे. आपली राज्यघटना सहकारी लोकशाहीची खात्री देते आणि राष्ट्राची एकात्मताही सुनिश्चित करते. भारतीय राज्यघटना हा देशाचा अभिमान प्रस्थापित करण्याचा रोडमॅप देखील आहे, " असं राजनाथ सिंह म्हणाले. सावरकर आणि भगतसिंग यांसारख्या संविधान सभेचा भाग नसलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या विचारांनीही राज्यघटना मजबूत केल्याचेही राजनाथ सिंह यांनी म्हटलं.

"काही लोक आपली राज्यघटना ही केवळ चांगल्या गोष्टींचा संग्रह मानतात. गेल्या काही वर्षांपासून संविधान ही एकाच पक्षाची देणगी आहे, असे वातावरण देशात निर्माण झाले आहे. संविधान निर्मितीत अनेकांची भूमिका नाकारली गेली आहे. विशिष्ट पक्षाचे एक नेते आपल्या खिशात संविधानाची प्रत घेऊन फिरतात. खरे तर हेच त्यांनी त्यांच्या पूर्वजांकडून शिकलं आहे," असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं.  राजनाथ सिंह यांचा हा टोमणा काँग्रेस नेते राहुल गांधी यांना होता असं म्हटलं जात आहे.

यावेळी राजनाथ सिंह यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचाही किस्सा सांगत राहुल गांधींचा खरपूस समाचार घेतला. "अटलबिहारी वाजपेयी १९९५ मध्ये जिनिव्हाला गेले होते. त्यांनी तत्कालीन सरकारच्या पावलांचे कौतुक करत भारताची बाजू मांडली. इतकंच नाही तर भारतात परतल्यावर त्यांनी इथेही तेच सांगितलं. आज परिस्थिती अशी आहे की विरोधी नेते परदेशात जाऊन भारताविरुद्ध बोलतात," असं राजनाथ सिंह म्हणाले. 

टॅग्स :lok sabhaलोकसभाRajnath Singhराजनाथ सिंहRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस