शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

"काही फक्त खिशात संविधान ठेवतात, पूर्वजांकडून त्यांनी..."; संरक्षण मंत्र्यांची राहुल गांधींवर सडकून टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 14:10 IST

लोकसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

Rajnath Singh takes jibe at Rahul Gandhi : हिवाळी अधिवेशनात अनेक दिवसांच्या सततच्या गदारोळानंतर आज राज्यघटनेवर चर्चा सुरू झाली तेव्हा पहिले भाषण संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे होते. लोकसभेत संविधानावरील चर्चेला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सुरुवात केली. ७५ वर्षांपूर्वी संविधान सभेने संविधानाचा मसुदा तयार करण्याचे काम पूर्ण केले होते. संविधान सभेने तयार केलेली राज्यघटना केवळ कायदेशीर दस्तऐवज नसून ती लोकांच्या आकांक्षांचे प्रतिबिंब असल्याचे यावेळी मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी काँग्रेसवर संविधानाची अवहेलना करून त्यावर सत्ता निवडल्याचा आरोप केला आहे. यावेळी राजनाथ सिंह यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. एक नेता संविधानाची प्रत खिशात ठेवून फिरत असतो, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं.

"संविधानाच्या माध्यमातून देशात खऱ्या अर्थाने लोकशाही लागू झाली आहे. आपली राज्यघटना सार्वत्रिक आहे, त्यात राज्याच्या जबाबदाऱ्यांची यादी तर आहेच, शिवाय त्यात नागरिकांच्या हक्कांचाही उल्लेख आहे. आपली राज्यघटना सहकारी लोकशाहीची खात्री देते आणि राष्ट्राची एकात्मताही सुनिश्चित करते. भारतीय राज्यघटना हा देशाचा अभिमान प्रस्थापित करण्याचा रोडमॅप देखील आहे, " असं राजनाथ सिंह म्हणाले. सावरकर आणि भगतसिंग यांसारख्या संविधान सभेचा भाग नसलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या विचारांनीही राज्यघटना मजबूत केल्याचेही राजनाथ सिंह यांनी म्हटलं.

"काही लोक आपली राज्यघटना ही केवळ चांगल्या गोष्टींचा संग्रह मानतात. गेल्या काही वर्षांपासून संविधान ही एकाच पक्षाची देणगी आहे, असे वातावरण देशात निर्माण झाले आहे. संविधान निर्मितीत अनेकांची भूमिका नाकारली गेली आहे. विशिष्ट पक्षाचे एक नेते आपल्या खिशात संविधानाची प्रत घेऊन फिरतात. खरे तर हेच त्यांनी त्यांच्या पूर्वजांकडून शिकलं आहे," असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं.  राजनाथ सिंह यांचा हा टोमणा काँग्रेस नेते राहुल गांधी यांना होता असं म्हटलं जात आहे.

यावेळी राजनाथ सिंह यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचाही किस्सा सांगत राहुल गांधींचा खरपूस समाचार घेतला. "अटलबिहारी वाजपेयी १९९५ मध्ये जिनिव्हाला गेले होते. त्यांनी तत्कालीन सरकारच्या पावलांचे कौतुक करत भारताची बाजू मांडली. इतकंच नाही तर भारतात परतल्यावर त्यांनी इथेही तेच सांगितलं. आज परिस्थिती अशी आहे की विरोधी नेते परदेशात जाऊन भारताविरुद्ध बोलतात," असं राजनाथ सिंह म्हणाले. 

टॅग्स :lok sabhaलोकसभाRajnath Singhराजनाथ सिंहRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस