शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

''रालोआच्या राजवटीत देशात भीतीचे वातावरण''

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 05:07 IST

राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) सरकारच्या राजवटीत देशामध्ये भीती, हिंसाचार व तणावाचे वातावरण आहे, असा आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सोमवारी केला.

कोटा : राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) सरकारच्या राजवटीत देशामध्ये भीती, हिंसाचार व तणावाचे वातावरण आहे, असा आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सोमवारी केला. त्यांनी पत्रकारांना सांगितले की, देशात आर्थिक मंदीमुळे लोक नोकऱ्या गमावत असून, दुसºया बाजूला रोजगाराच्या संधी निर्माण होणे बंद झाले आहे. त्यामुळे भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. रालोआ सरकार सत्तेवर आल्यानंतर देशातील माहोल बिघडला आहे. अशा प्रकारची धोकादायक स्थिती देशात प्रथमच निर्माण झाली आहे.कोटा येथील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी अशोक गेहलोत तिथे आले होते. ते म्हणाले की, देशाला आर्थिक मंदीच्या झळा बसत आहेत. नजीकच्या काळात ही स्थिती आणखी बिघडेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकीर्दीत भारतातील लोकशाही धोक्यात आली आहे. देशातील स्थिती बिघडली असून, त्या परिस्थितीला नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व रालोआ सरकार जबाबदार आहे. समाजातील एकही घटक आज समाधानी नाही, तरीही ते मोदी-मोदीचा गजर करीत आहेत कारण जनता दहशतीखाली आहे. (वृत्तसंस्था)>काश्मीरमध्ये मानवी हक्कांची गळचेपीराजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सांगितले की, काश्मीरमध्ये गेल्या चाळीस दिवसांपासून स्थानिक लोकांना जणू घरात कोंडून ठेवले आहे.मोबाईल, इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी संचारबंदीपासून अन्य निर्बंधही लादण्यात आले. या कारवाईमुळे मानवी हक्कांची गळचेपी झाली आहे. काश्मीरमध्ये सध्या नेमके काय चालले आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला सांगितले पाहिजे, असेही गेहलोत म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा