शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

नेहरू-इंदिरांच्या काळात 12 लाखांच्या कमाईवर 10 लाख कर लागायचा; PM मोदींचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 15:30 IST

'भाजप सरकारच्या काळात 12 लाख रुपये कमावणाऱ्या व्यक्तीला एक रुपयाही कर भरावा लागणार नाही.'

PM Narendra Modi on Budget : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी(2 फेब्रुवारी) दिल्लीतील आरके पुरम येथे जाहीर सभेला संबोधित करताना मागील काँग्रेस सरकारांवर निशाणा साधला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाबद्दल बोलताना, पंतप्रधानांनी कर सवलतीचा उल्लेख केला. ते म्हणाले, 'तुम्ही नेहरुजींच्या काळात 12 लाख रुपये कमावले असते, तर तुमच्या पगाराच्या एक चतुर्थांश रक्कम सरकारने परत घेतली असती.'

यावेळी बोलताना पीएम मोदी म्हणतात, 'आज जर पंडीत नेहरुंचा काळ असता, तर 12 लाख रुपयांवर एक चतुर्थांश कर भरावा लागला असता. इंदिरा गांधींचा काळ असता तर 12 लाख रुपयांपैकी 10 लाख रुपये करात गेले असते. 10-12 वर्षांपूर्वी काँग्रेस सरकारच्या काळात 12 लाख रुपयांवर 2 लाख 60 हजार रुपये कर भरावा लागायचा. पण, भाजप सरकारच्या काळात 12 लाख रुपये कमावणाऱ्या व्यक्तीला एक रुपयाही कर भरावा लागणार नाही.'

'12 ते 24 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर प्रतिवर्षी 1 लाख 10 हजार रुपयांची अतिरिक्त बचत होईल. आजचा भारत भाजपसोबत आहे. या अर्थसंकल्पात गरिबांसाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. हा अर्थसंकल्प गरिबांसाठी आहे. मध्यमवर्गीयांसाठी हा सर्वात अनुकूल अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामुळे भारतातील प्रत्येक कुटुंब आनंदी आहे. 12 लाखांच्या उत्पन्नावर शून्य करामुळे मध्यमवर्गीय लोकांचे हजारो रुपयांची बचत होणार आहे. हा अर्थसंकल्प मध्यमवर्गीयांचा खिसा भरणारा अर्थसंकल्प आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आयकरात एवढा मोठा सवलत देण्यात आली आहे,' असा दावाही पीएम मोदींनी यावेळी केला.

'आप'ने दिल्लीची 11 वर्षे उद्ध्वस्त केलीयावेळी पीएम मोदींनी दिल्लीतील आप सरकारवरही निशाणा साधला. 'वसंत पंचमीपासून हवामान बदलण्यास सुरुवात होते. दिल्लीत 5 फेब्रुवारीला विकासाचा नवा झरा वाहणार अन् दिल्लीत भाजपचे सरकार स्थापन होणार. यावेळी संपूर्ण दिल्ली भाजपसोबत आहे. आपने दिल्लीची 11 वर्षे उध्वस्त केली. मला तुमची सेवा करण्याची संधी द्या. तुमच्या प्रत्येक समस्या सोडवण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन.'

'दिल्लीत मतदानापूर्वीच झाडूच्या काढ्या बाहेर पडत आहेत. आपचे नेते पक्षावर आरोप करत राजीनामे देत आहेत. यावरुनच आम आदमी पक्षावर जनता नाराज असल्याचे सिद्ध होते. दिल्लीतील जनतेच्या रोषाला आप एवढी घाबरली आहे की, दर तासाला खोट्या घोषणा करत आहे. पण आपचा मुखवटा आता गळून पडला आहे. यंदा दिल्लीत भाजपाचे सरकार स्थापन होणार आहे,' असा दावाही त्यांनी यावेळी केला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसDelhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025AAPआपBudgetअर्थसंकल्प 2024Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामन