शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

मोदींच्या काळात कृषी क्षेत्राची कर्जवृद्धी नीचांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 00:53 IST

मोबदल्याची शेतकऱ्यांना नाही खात्री; बँकांही देण्यास नाखूश

नवी दिल्ली : मोदी सरकारने शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करून देण्याची घोषणा केली असली तरी अपुºया गुंतवणुकीमुळे ४ वर्षांत कृषी क्षेत्राची अवस्था चिंताजनक बनली आहे. रिझर्व बँकेच्या ताज्या अहवालानुसार मे २0१८ मधे कृषी क्षेत्राच्या कर्जवृद्धीचा दर ३.८ टक्क्यांवर आला आहे. मार्च २0१४ मधे तो १५ टक्के होता.कृषी क्षेत्राला बँकांकडून होणाºया कर्ज पुरवठ्याचे प्रमाण चार पटींनी खाली का आले? याचे उत्तर मोदी सरकारकडे नाही. शेतकºयांच्या बिकट अवस्थेवर विरोधी पक्ष कायमच सरकारवर हल्ले चढवत आहे. तथापि रिझर्व बँकेच्या अहवालाने एक मजबूत शस्त्र विरोधकांना पुरवले आहे.घसरण का? तज्ज्ञांनी दिली दोन कारणेकृषीमालाचा योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी निराश आहे. शेतीत गुंतवणूक करण्यास बँकांकडून कर्ज घेण्याची त्याला भीती वाटते. पुरेसा मोबदला मिळेलच याची खात्री वाटत नाही. शेतीला पूरक दुग्ध व्यवसाय व पोल्ट्री उद्योगाची अवस्थाही बिकटच. भाव पडल्यामुळे नफ्यात लक्षणीय घट झाली आहे. या क्षेत्रात नवी गुंतवणूक फारच कमी असल्याने पूरक उद्योगांसाठी बँकेच्या कर्जाची मागणीही घटली.कर्जमाफी देणारी राज्येदोन भाजपा : उत्तर प्रदेशमध्ये एक लाखांपर्यंतचे, महाराष्ट्रात एकूण ३४ हजार २२ कोटींची कर्जमाफीदोन काँग्रेस : पंजाब सरकारने (रकमेचा अंदाज नाही) आणि कर्नाटकातही एक लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा कुमारस्वामींनी केली.बँका अधिक सावधकर्जमाफीच्या घोषणांमुळे तोट्यातील बँका सावध झाल्या. कर्ज माफ होईलच या आशेने शेतकरी वेळेत परतफेड करतील का, याची बँकांना शंका वाटते. सहकारी बँका अन् मायक्रो फायनान्सिंग संस्था शेतकºयांना कर्ज पुरवठा करतात. माफ केलेल्या कर्जाची भरपाई सरकार कधी व कशी करणार, हे स्पष्ट नाही. कर्जमाफीचा विपरीत प्रभाव ताळेबंदांवर पडू नये, यासाठी बँका सावधपणे कर्जपुरवठा करीत आहेत. अन्य संस्थांमध्येही या घोषणेमुळे चुकीचा संदेश गेलाय. याचा परिणाम कृषी क्षेत्रात कर्जाचे प्रमाण खूपच घटले आहे. मोदी सरकारचे हे मोठे अपयश मानले जात आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा