शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

कोडगू पूर पाहणीवेळी संरक्षणमंत्री आणि पालकमंत्र्यांमध्ये बाचाबाची; कर्नाटकात राजकीय वातावरण तापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 17:32 IST

बंगळुरु : कर्नाटकमधील कोडगू जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या संरक्षण मंत्री निर्मला सितारामन आणि कोडगूच्या पालकमंत्र्यांमध्ये बाचाबाची झाल्याचे वृत्त आहे. मंत्री एस. आर. महेश यांनी सितारामन यांच्यावर वैयक्तीक टीका केल्याने हा प्रकार घडल्याचे समजते.   कर्नाटकमधून राज्यसभेवर निवडून गेलेल्या निर्मला सितारामन या काल कोडगू जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. ...

बंगळुरु : कर्नाटकमधील कोडगू जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या संरक्षण मंत्री निर्मला सितारामन आणि कोडगूच्या पालकमंत्र्यांमध्ये बाचाबाची झाल्याचे वृत्त आहे. मंत्री एस. आर. महेश यांनी सितारामन यांच्यावर वैयक्तीक टीका केल्याने हा प्रकार घडल्याचे समजते. 

 कर्नाटकमधून राज्यसभेवर निवडून गेलेल्या निर्मला सितारामन या काल कोडगू जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. यावेळी त्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच खराब झालेले रस्ते लवकरात लवकर लष्कराकडून तयार करून देण्यात आश्वासनही त्यांनी पूरग्रस्तांना दिले. यावेळी पालकमंत्री एस. आर. महेश ही त्यांच्या सोबत होते. 

यावेळी महेश आणि सितारामन यांच्यामध्ये बाचाबाची झाली. महेश यांनी त्यांच्यावर वैयक्तीक स्वरुपाची टीका केल्याने सितारामन चिडल्याचे वृत्त आहे. यावरून कर्नाटकमध्ये वाद निर्माणा झाला असून माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज संरक्षण मंत्र्यांना पूरग्रस्तांची पाहणी करण्यापेक्षा आमच्या मंत्र्यावरच वर्चस्व राखण्यात अधिक रस असल्याचा आरोप केला.  

 

 

सितारामन या माजी सैनिकांच्या गटाशी बोलत होत्या. यावेळी रमेश यांनी त्यांना अधिकारी मदतकार्यासाठीच्या बैठकीची वाट पाहत असल्याचा निरोप दिला. मात्र, सितारामन या माजी सैनिकांशी बोलत राहिल्या व त्यांनी हा आमचा परिवार असल्याचे म्हटले. यानंतर महेश यानी सितारामन यांच्याकडे निधी वाढवून देण्याची मागणी केली. त्यावेळीही संरक्षण मंत्रालयाला आपला परिवार महत्वाचा आहे. त्यांच्याशी चर्चा करण्याचा कार्यक्रम आखला आहे, असे महेश यांना सांगितले. यावर महेश यांनी तुम्ही राज्यसभेवर निवडणून गेला आहात, तुम्हाला सामान्य जनतेचे महत्व नाही अशी टीका केली. 

हा सर्व प्रकार जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी आणि प्रसारमाध्यमांसमोर घडला. यावर संरक्षण मंत्रालयाने आक्षेप घेतला असून मंत्र्यांनी परिवार हा शब्द संरक्षण मंत्रालयाच्या चार पैकी एक असलेल्या माजी सैनिकांच्या खात्याबद्दल वापरल्याचा खुलासा केला आहे. तसेच पालकमंत्री महेश यांचे बोलणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.  

राजशिष्टाचारानुसार जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्री आपत्तीवेळी केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्याची आखणी करतात. केंद्रीय मंत्र्यांना त्यानुसार आखलेल्या कार्यक्रमांचे पालन करावे लागते. 

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनKarnatakकर्नाटकfloodपूरDefenceसंरक्षण विभाग