शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कोडगू पूर पाहणीवेळी संरक्षणमंत्री आणि पालकमंत्र्यांमध्ये बाचाबाची; कर्नाटकात राजकीय वातावरण तापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 17:32 IST

बंगळुरु : कर्नाटकमधील कोडगू जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या संरक्षण मंत्री निर्मला सितारामन आणि कोडगूच्या पालकमंत्र्यांमध्ये बाचाबाची झाल्याचे वृत्त आहे. मंत्री एस. आर. महेश यांनी सितारामन यांच्यावर वैयक्तीक टीका केल्याने हा प्रकार घडल्याचे समजते.   कर्नाटकमधून राज्यसभेवर निवडून गेलेल्या निर्मला सितारामन या काल कोडगू जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. ...

बंगळुरु : कर्नाटकमधील कोडगू जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या संरक्षण मंत्री निर्मला सितारामन आणि कोडगूच्या पालकमंत्र्यांमध्ये बाचाबाची झाल्याचे वृत्त आहे. मंत्री एस. आर. महेश यांनी सितारामन यांच्यावर वैयक्तीक टीका केल्याने हा प्रकार घडल्याचे समजते. 

 कर्नाटकमधून राज्यसभेवर निवडून गेलेल्या निर्मला सितारामन या काल कोडगू जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. यावेळी त्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच खराब झालेले रस्ते लवकरात लवकर लष्कराकडून तयार करून देण्यात आश्वासनही त्यांनी पूरग्रस्तांना दिले. यावेळी पालकमंत्री एस. आर. महेश ही त्यांच्या सोबत होते. 

यावेळी महेश आणि सितारामन यांच्यामध्ये बाचाबाची झाली. महेश यांनी त्यांच्यावर वैयक्तीक स्वरुपाची टीका केल्याने सितारामन चिडल्याचे वृत्त आहे. यावरून कर्नाटकमध्ये वाद निर्माणा झाला असून माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज संरक्षण मंत्र्यांना पूरग्रस्तांची पाहणी करण्यापेक्षा आमच्या मंत्र्यावरच वर्चस्व राखण्यात अधिक रस असल्याचा आरोप केला.  

 

 

सितारामन या माजी सैनिकांच्या गटाशी बोलत होत्या. यावेळी रमेश यांनी त्यांना अधिकारी मदतकार्यासाठीच्या बैठकीची वाट पाहत असल्याचा निरोप दिला. मात्र, सितारामन या माजी सैनिकांशी बोलत राहिल्या व त्यांनी हा आमचा परिवार असल्याचे म्हटले. यानंतर महेश यानी सितारामन यांच्याकडे निधी वाढवून देण्याची मागणी केली. त्यावेळीही संरक्षण मंत्रालयाला आपला परिवार महत्वाचा आहे. त्यांच्याशी चर्चा करण्याचा कार्यक्रम आखला आहे, असे महेश यांना सांगितले. यावर महेश यांनी तुम्ही राज्यसभेवर निवडणून गेला आहात, तुम्हाला सामान्य जनतेचे महत्व नाही अशी टीका केली. 

हा सर्व प्रकार जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी आणि प्रसारमाध्यमांसमोर घडला. यावर संरक्षण मंत्रालयाने आक्षेप घेतला असून मंत्र्यांनी परिवार हा शब्द संरक्षण मंत्रालयाच्या चार पैकी एक असलेल्या माजी सैनिकांच्या खात्याबद्दल वापरल्याचा खुलासा केला आहे. तसेच पालकमंत्री महेश यांचे बोलणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.  

राजशिष्टाचारानुसार जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्री आपत्तीवेळी केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्याची आखणी करतात. केंद्रीय मंत्र्यांना त्यानुसार आखलेल्या कार्यक्रमांचे पालन करावे लागते. 

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनKarnatakकर्नाटकfloodपूरDefenceसंरक्षण विभाग