शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

फक्त दोन रसगुल्ल्यांमुळे भर मंडपात मोडलं लग्न

By admin | Updated: April 19, 2017 15:33 IST

फक्त रसगुल्ल्यामुळे भर मंडपात लग्न मोडण्यात आल्याची धक्कादायक आणि विचित्र घटना समोर आली आहे

ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 19 - ठरलेलं लग्न ऐनवेळी मोडण्यात आल्याचं आपण अनेकदा ऐकलं असेल. हुंडा मिळाला नाही म्हणून तर कधी लग्नात आईस्क्रीम मिळालं नाही म्हणून, तर चिकनऐवजी मटण वाढलं म्हणून लग्न मोडण्यात आल्याच्या घटना आजपर्यं
त समोर आल्या आहेत. पण या सर्वांवर कहर करणारी घटना समोर आली असून फक्त रसगुल्ल्यामुळे भर मंडपात लग्न मोडण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशात ही विचित्र घटना घडली आहे. 
 
लखनऊपासून 70 किमी अंतरावर असलेल्या उन्नाओ जिल्ह्यातील कुरमापूर गावात ही घटना घडली आहे. नवरामुलगा वरात घेऊन मुलीच्या दारात पोहोचला असता सर्व विधी पार पाडत त्यांचं स्वागत करण्यात आलं. लग्नाचा मुहूर्त जरा उशिराचा असल्याने नवरदेवाच्या वडिलांनी कार्यक्रम संपताच पाहुणे मंडळींना जेवण वाढावं अशी विनंती केली होती. 
 
दुसरीकडे नवरीमुलीच्या नातेवाईकांनी जेवणात एकच रसगुल्ला वाढावा असा आदेश दिला होता. आणि इथेच खरी समस्या सुरु झाली. नव-यामुलाच्या चुलत भावाने दोन रसगुल्ले घेतले आणि मुलीच्या नातेवाईकांना मधुमेहच झाला. रसगुल्ल्यामुळे भर मंडपात तिस-या महायुद्दालाच सुरुवात झाली होती. लग्न मंडपाचं रुपांतर युद्धभूमीत झालं होतं. 
 
लग्न राहिलं बाजूला इथे अक्षरक्ष: मारामारी सुरु होती. नवरीमुलगी हे सगळं आपल्या बाल्कनीतून पाहत होती. आपल्या वडिलांवरही हात उचलले जात असल्याचं पाहून तिचा संताप झाला आणि तिने लग्न मोडून टाकलं. मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलीस सध्या तपास करत आहेत.