शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
5
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
6
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
7
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
8
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
9
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
10
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
11
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
12
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
13
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
14
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
15
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
16
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
17
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
18
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
19
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
20
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...

फक्त दोन रसगुल्ल्यांमुळे भर मंडपात मोडलं लग्न

By admin | Updated: April 19, 2017 15:33 IST

फक्त रसगुल्ल्यामुळे भर मंडपात लग्न मोडण्यात आल्याची धक्कादायक आणि विचित्र घटना समोर आली आहे

ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 19 - ठरलेलं लग्न ऐनवेळी मोडण्यात आल्याचं आपण अनेकदा ऐकलं असेल. हुंडा मिळाला नाही म्हणून तर कधी लग्नात आईस्क्रीम मिळालं नाही म्हणून, तर चिकनऐवजी मटण वाढलं म्हणून लग्न मोडण्यात आल्याच्या घटना आजपर्यं
त समोर आल्या आहेत. पण या सर्वांवर कहर करणारी घटना समोर आली असून फक्त रसगुल्ल्यामुळे भर मंडपात लग्न मोडण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशात ही विचित्र घटना घडली आहे. 
 
लखनऊपासून 70 किमी अंतरावर असलेल्या उन्नाओ जिल्ह्यातील कुरमापूर गावात ही घटना घडली आहे. नवरामुलगा वरात घेऊन मुलीच्या दारात पोहोचला असता सर्व विधी पार पाडत त्यांचं स्वागत करण्यात आलं. लग्नाचा मुहूर्त जरा उशिराचा असल्याने नवरदेवाच्या वडिलांनी कार्यक्रम संपताच पाहुणे मंडळींना जेवण वाढावं अशी विनंती केली होती. 
 
दुसरीकडे नवरीमुलीच्या नातेवाईकांनी जेवणात एकच रसगुल्ला वाढावा असा आदेश दिला होता. आणि इथेच खरी समस्या सुरु झाली. नव-यामुलाच्या चुलत भावाने दोन रसगुल्ले घेतले आणि मुलीच्या नातेवाईकांना मधुमेहच झाला. रसगुल्ल्यामुळे भर मंडपात तिस-या महायुद्दालाच सुरुवात झाली होती. लग्न मंडपाचं रुपांतर युद्धभूमीत झालं होतं. 
 
लग्न राहिलं बाजूला इथे अक्षरक्ष: मारामारी सुरु होती. नवरीमुलगी हे सगळं आपल्या बाल्कनीतून पाहत होती. आपल्या वडिलांवरही हात उचलले जात असल्याचं पाहून तिचा संताप झाला आणि तिने लग्न मोडून टाकलं. मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलीस सध्या तपास करत आहेत.