शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

'राफेल'मुळे बदनाम झालं छत्तीसगडमधलं एक गाव, सगळे उडवतात खिल्ली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 15:48 IST

छत्तीसगडच्या महासमुंदपासून १३५ किमी अंतरावर दुर्गम परिसरात असणाऱ्या या गावाचं नाव 'राफेल' असं आहे. देशात राफेल मुद्दा निवडणुकीतील प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दा बनल्याने राफेल हे नाव गावकऱ्यांसाठी समस्येचे कारण बनलं आहे. 

नवी दिल्ली - सध्या देशभरात आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलेला असताना निवडणुकीच्या रिंगणात सर्वात चर्चेत मुद्दा आहे तो म्हणजे राफेल. राफेल विमान खरेदी प्रकरणावरुन भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसमध्ये राजकीय वातावरण तापू लागलंय. काँग्रेसनेराफेल मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट केलं असून अनिल अंबानी यांना फायदा होण्यासाठीच हा करार करण्यात आल्याचा आरोप केला आहे. इतकचं नाही तर राफेलवरुन चौकीदार चोर है अशी मोहीमही काँग्रेसकडून सोशल मिडीयात उभारण्यात आली. 

मात्र हा राफेल मुद्दा छत्तीसगडमधील एका गावासाठी मोठी समस्या बनला आहे. छत्तीसगडच्या महासमुंदपासून १३५ किमी अंतरावर दुर्गम परिसरात असणाऱ्या या गावाचं नाव 'राफेल' असं आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून देशात राफेल मुद्दा निवडणुकीतील प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दा बनल्याने राफेल हे नाव गावकऱ्यांसाठी समस्येचे कारण बनलं आहे. 

राफेल गावातील ग्रामस्थांचे म्हणणं आहे की, जेव्हापासून राफेल प्रकरणावरुन राजकीय वातावरण तापू लागलंय तेव्हापासून राफेल नावावरुन असलेल्या या गावाची आजूबाजूच्या गावांकडून खिल्ली उडविण्यात येत आहे. जर समजा भविष्यात काँग्रेस पक्ष सत्तेत आला आणि त्यांनी राफेलची चौकशी केली तर या गावावरही कारवाई केली जाईल असा विनोद शेजारील गावातील गावकरी करत आहेत. याचं कारणं काय तर काही दिवसांपूर्वीच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाषणात म्हटलं की, काँग्रेस सत्तेत आल्यावर लगेच राफेलची चौकशी करु. अन् नेमकं या गावाचं नावचं राफेल आहे. त्यामुळे राफेलची चौकशी होणार म्हणजे या गावावर कारवाई केली जाणार अशाप्रकारे खिल्ली इतर ग्रामस्थ उडवत आहेत. राफेल हे गाव छत्तीसगड राज्यातील दुर्गम भागात आहेत त्यामुळे या गावाकडे अद्याप कोणाचंही लक्ष गेलं नाही. मात्र देशात सध्या लोकसभा निवडणुकीचं वारं वाहतंय त्यामुळे राफेल गाव सोशल माध्यमांमध्ये चर्चेत आलं आहे. 

१९९८ च्या पूर्वी राफेल गाव छत्तीसगडच्या रायपूर जिल्ह्यात समाविष्ट होतं मात्र त्यानंतर महासमुंद या जिल्ह्यामध्ये गावाचा समावेश करण्यात आला. अतिशय दुर्गम भागात हे गाव असल्याने आत्तापर्यंत गावचा विकासच झाला नाही. राफेल ग्रामस्थ शेतीवर निर्भर असल्याने शेती पण पावसावर अवलंबून आहे. पंतप्रधान कोणीही बनो मात्र या गावात सिंचनाची व्यवस्था आली पाहिजे असं गावकऱ्यांचे म्हणणं आहे. निवडणूक मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात राफेल ग्रामस्थ मतदानासाठी जाणार आहेत. देशभरात राफेलवरुन भाजपा आणि काँग्रेसमध्ये रणकंदन माजलं असताना अद्यापपर्यंत या गावात ना भाजपाचा कोणी नेता आला ना काँग्रेसचा नेता प्रचारासाठी आला. जवळपास २०० कुटुंब या गावात वास्तव्यास आहे. 

काँग्रेस सत्तेत आल्यावर राफेल गावावर कारवाई होणार असल्याचं शेजारील गावातील लोकं आमची खिल्ली उडवतात. आम्ही गावाचं नाव बदलण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे गेलो मात्र आम्हाला त्यांची भेट झाली नाही असं या गावातील ग्रामस्थ धरम सिंग यांनी सांगितले. तसेच राफेल प्रकरणामुळे या गावाची नकारात्मक प्रसिद्धी झाली पण आमच्या गावाची चिंता कोणालाच नाही असंही ते बोलले. 

महासमुंद विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपाचे चांदुल शाहू हे विद्यमान आमदार आहेत. त्यांच्याच मतदारसंघात राफेल गावाचा समावेश होतो. राफेलवरुन भाजपा-काँग्रेसमध्ये दावे-प्रतिदावे होत असले तरी राफेल गाव मात्र विकास, जलसिंचन आणि मूलभूत सुविधांपासून वंचितच राहिलं हे सत्य कोणी नाकारु शकणार नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRafale Dealराफेल डीलChhattisgarhछत्तीसगडmahasamund-pcमहासमंदChhattisgarh Lok Sabha Election 2019छत्तीसगढ लोकसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसBJPभाजपा