शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

मान्सूनच्या विलंबामुळे खरीप पेरणीचे क्षेत्र घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 5:16 AM

२३४.२२ लाख हेक्टर्स : येत्या दिवसांत वेग येण्याची शक्यता

नवी दिल्ली : गेल्या महिन्यात मान्सून अपुरा पडल्यामुळे खरीपासाठीच्या पेरणीचे क्षेत्र २७ टक्क्यांनी कमी होऊन २३४.२२ लाख हेक्टर्स झाले आहे, असे सरकारने दिलेल्या ताज्या आकडेवारीत म्हटले आहे. भारतीय हवामान खात्याने जुलै आणि आॅगस्ट महिन्यात चांगल्या पावसाचे भाकित केल्यामुळे येत्या दिवसांत पेरणीला चांगला वेग येईल अशी अपेक्षा आहे. शिवाय केंद्र सरकारने १४ खरीप पिकांच्या किमान हमी भावात लक्षणीय वाढही जाहीर केल्याचाही सकारात्मक परिणाम होणार आहे.

नैर्ऋत्य मान्सूनचे आगमन होताच खरिपाच्या पेरणीला प्रारंभ होतो, परंतु यंदा पावसाला उशिरा सुरुवात झाल्यामुळे पेरणीलाही विलंब झाला व पाऊसही ३३ टक्क्यांनी कमी झाला, असे हवामान खात्याची आकडेवारी सांगते.छत्तीसगड, उत्तर प्रदेश, हरियाणा, ओदिशा, मध्य प्रदेश, कर्नाटक, अरुणाचल प्रदेश, बिहार, आसाम, पश्चिम बंगाल आणि हिमाचल प्रदेशमध्ये व इतर काही राज्यांत ही खरिपाची कमी पेरणी झाल्याचे वृत्त आहे. तूर डाळ, उडद आणि मूग यांची पेरणी अवघ्या ७.९४ लाख हेक्टर्सच्याही खाली यंदा झालेली आहे.

गेल्या वर्षी ती २७.९१ लाख हेक्टर्सवर झालेली होती. भरड धान्याची ३७.३७ लाख हेक्टर्सवर पेरणी झाली असून, ती गेल्या वर्षी ५०.६५ लाख हेक्टर्सवर झालेली होती. कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगण, तमिळनाडू राज्यांत डाळींची लागवड कमी झालेली आहे.

तेलबियांचा विचार केला तर भुईमूग, सूर्यफूल आणि सोयाबीनची लागवड गेल्या आठवड्यापर्यंत ३४.०२ लाख हेक्टर्सवर झाली होती. तीगेल्या वर्षी ५९.३७ लाख हेक्टर्सवर झालेली होती. रोख पैसे देणाऱ्या पिकांत उसाची लागवड ५० लाख हेक्टर्सवर (गेल्या वर्षी ५१.४१ लाख हेक्टर्स) गेल्या आठवड्यापर्यंत झालेली आहे.भात लागवडही घटलीकृषी मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या आठवड्यापर्यंत २०१९-२०२० वर्षात खरीप हंगामात (जुलै ते जून) २३४.३३ लाख हेक्टर्सची पेरणी झालेली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ३१९.६८ लाख हेक्टर्सवर पेरणी झाली होती. खरिपातील मुख्य पीक भाताची लागवड गेल्या आठवड्यापर्यंत ५२.४७ लाख हेक्टर्सवर झाली होती. ती गेल्या वर्षी ती ६८.६० लाख हेक्टर्सवर झालेली होती.