भूसंपादन विधेयकामुळे शेतकऱ्यांमध्ये धास्ती

By Admin | Updated: June 10, 2015 23:23 IST2015-06-10T23:23:01+5:302015-06-10T23:23:01+5:30

केंद्रातील मोदी सरकारने कृषी क्षेत्राकडे चालवलेले दुर्लक्ष चिंताजनक आहे. कृषी क्षेत्रावरील खर्चात सरकारने प्रचंड कपात केली आहे. भू- संपादन विधेयकामुळे आपल्या

Due to land acquisition bill farmers are scared | भूसंपादन विधेयकामुळे शेतकऱ्यांमध्ये धास्ती

भूसंपादन विधेयकामुळे शेतकऱ्यांमध्ये धास्ती

एस.पी. सिन्हा, पाटणा
केंद्रातील मोदी सरकारने कृषी क्षेत्राकडे चालवलेले दुर्लक्ष चिंताजनक आहे. कृषी क्षेत्रावरील खर्चात सरकारने प्रचंड कपात केली आहे. भू- संपादन विधेयकामुळे आपल्या जमीन बळकावल्या जातील की काय, म्हणून शेतकरी धास्तावला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या १६ व्या वर्धापनदिनानिमित्त पाटण्यामध्ये पक्षाचे सहावे राष्ट्रीय अधिवेशन बोलवण्यात आले आहे. श्रीकृष्ण मेमोरियल हॉलमध्ये बुधवारपासून सुरू झालेल्या या दोन दिवसीय अधिवेशनात पवार बोलत होते. आपल्या भाषणात पवारांनी मोदी सरकारला जोरदार लक्ष्य केले. भाजपाप्रणीत रालोआ सरकारच्या गत वर्षभरातील कार्यकाळात सामाजिक सद्भाव घटल्याचा आरोप केला.


 

Web Title: Due to land acquisition bill farmers are scared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.