शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

निवडणुका जवळ आल्यामुळे लोकांच्या हाती पैसा वाढला? एसबीआयचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 02:13 IST

नोटाबंदी लागू करण्यापूर्वी जेवढ्या नोटा अर्थव्यवस्थेत होत्या, जवळपास तेवढ्याच नोटा आता पुन्हा चलनात आल्या आहेत. जवळ आलेल्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी रोख रकमा साठवून ठेवल्यामुळे ही स्थिती उद्भवली असावी, असे प्रतिपादन स्टेट बँक आॅफ इंडियाने (एसबीआय) केले आहे.

मुंबई - नोटाबंदी लागू करण्यापूर्वी जेवढ्या नोटा अर्थव्यवस्थेत होत्या, जवळपास तेवढ्याच नोटा आता पुन्हा चलनात आल्या आहेत. जवळ आलेल्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी रोख रकमा साठवून ठेवल्यामुळे ही स्थिती उद्भवली असावी, असे प्रतिपादन स्टेट बँक आॅफ इंडियाने (एसबीआय) केले आहे.निवडणुका जवळ आल्या की, लोकांकडील पैशांत वाढ होते, हे रिझर्व्ह बँकेचे तत्कालीन गव्हर्नर रघुराम राजन यांनी एप्रिल २0१६ मध्ये अधिकृतरीत्या मान्य केले होेते. निवडणुकांच्या तोंडावर लोकांकडील पैशांत साधरणत: वाढ दिसून येते. असे का होते, याचा अंदाज तुम्ही बांधा. आम्हीही अंदाज लावत आहोत, असे राजन यांनी म्हटले होते. ज्या राज्यांत निवडणुका असतात, त्या राज्यांतील रोख रकमेची मागणी वाढतेच, पण त्यांच्या आजूबाजूच्या राज्यांतही ही मागणी वाढते, असे राजन यांनी नमूद केले होते.एसबीआयचे मुख्य अर्थतज्ज्ञ सौम्यकांती घोष यांनी सांगितले की, दोन महिन्यांत चलनातील रोख रक्कम वेगाने वाढत आहे. जानेवारी व फेब्रुवारीत ही वाढ अनुक्रमे 0.४५ लाख कोटी आणि 0.५१ लाख कोटी रुपये होती. गेल्या वर्षी याच काळातील ही वाढ अनुक्रमे 0.१ लाख कोटी आणि 0.२ लाख कोटी रुपये होते.घोष म्हणाले की, २0१८ मध्ये अनेक राज्यांत निवडणुका होणार आहेत. त्यामुळे चलनातील नोटांचे प्रमाण असेच वाढत राहील. चलनातील रोख रक्कम वाढल्यामुळे बँकांच्या ठेवीत घट होईल. कारण हा पैसा बँकांमधूनच चलनात जात असतो. ठेवींच्या कमतरतेमुळे बँकांनी सरकारी रोख्यांच्या खरेदीकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे सरकारने रोख्यांची किंमत कमी करून परताव्यात वाढ केली आहे. भारतातील रोखे परतावा अमेरिकेच्या तुलनेत तिप्पट जास्त झाला आहे, असे घोष यांनी सांगितले.बँक ठेवी झाल्या कमीनोटाबंदीनंतर काही काळ बँकांतील ठेवींचे प्रमाण वाढले खरे, त्यानंतर मात्र ते घसरणीला लागले होते. नोव्हेंबर २0१७ मध्ये ठेवींमधील वृद्धी सर्वाधिक १५.६ टक्क्यांवर होती. १६ फेब्रुवारी २0१८ ला संपलेल्या पंधरवड्यात ठेवींचा वृद्धीदर घसरून ५.९ टक्क्यांवर आला होता.

टॅग्स :MONEYपैसाIndiaभारतEconomyअर्थव्यवस्था