शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

निवडणुका जवळ आल्यामुळे लोकांच्या हाती पैसा वाढला? एसबीआयचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 02:13 IST

नोटाबंदी लागू करण्यापूर्वी जेवढ्या नोटा अर्थव्यवस्थेत होत्या, जवळपास तेवढ्याच नोटा आता पुन्हा चलनात आल्या आहेत. जवळ आलेल्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी रोख रकमा साठवून ठेवल्यामुळे ही स्थिती उद्भवली असावी, असे प्रतिपादन स्टेट बँक आॅफ इंडियाने (एसबीआय) केले आहे.

मुंबई - नोटाबंदी लागू करण्यापूर्वी जेवढ्या नोटा अर्थव्यवस्थेत होत्या, जवळपास तेवढ्याच नोटा आता पुन्हा चलनात आल्या आहेत. जवळ आलेल्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी रोख रकमा साठवून ठेवल्यामुळे ही स्थिती उद्भवली असावी, असे प्रतिपादन स्टेट बँक आॅफ इंडियाने (एसबीआय) केले आहे.निवडणुका जवळ आल्या की, लोकांकडील पैशांत वाढ होते, हे रिझर्व्ह बँकेचे तत्कालीन गव्हर्नर रघुराम राजन यांनी एप्रिल २0१६ मध्ये अधिकृतरीत्या मान्य केले होेते. निवडणुकांच्या तोंडावर लोकांकडील पैशांत साधरणत: वाढ दिसून येते. असे का होते, याचा अंदाज तुम्ही बांधा. आम्हीही अंदाज लावत आहोत, असे राजन यांनी म्हटले होते. ज्या राज्यांत निवडणुका असतात, त्या राज्यांतील रोख रकमेची मागणी वाढतेच, पण त्यांच्या आजूबाजूच्या राज्यांतही ही मागणी वाढते, असे राजन यांनी नमूद केले होते.एसबीआयचे मुख्य अर्थतज्ज्ञ सौम्यकांती घोष यांनी सांगितले की, दोन महिन्यांत चलनातील रोख रक्कम वेगाने वाढत आहे. जानेवारी व फेब्रुवारीत ही वाढ अनुक्रमे 0.४५ लाख कोटी आणि 0.५१ लाख कोटी रुपये होती. गेल्या वर्षी याच काळातील ही वाढ अनुक्रमे 0.१ लाख कोटी आणि 0.२ लाख कोटी रुपये होते.घोष म्हणाले की, २0१८ मध्ये अनेक राज्यांत निवडणुका होणार आहेत. त्यामुळे चलनातील नोटांचे प्रमाण असेच वाढत राहील. चलनातील रोख रक्कम वाढल्यामुळे बँकांच्या ठेवीत घट होईल. कारण हा पैसा बँकांमधूनच चलनात जात असतो. ठेवींच्या कमतरतेमुळे बँकांनी सरकारी रोख्यांच्या खरेदीकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे सरकारने रोख्यांची किंमत कमी करून परताव्यात वाढ केली आहे. भारतातील रोखे परतावा अमेरिकेच्या तुलनेत तिप्पट जास्त झाला आहे, असे घोष यांनी सांगितले.बँक ठेवी झाल्या कमीनोटाबंदीनंतर काही काळ बँकांतील ठेवींचे प्रमाण वाढले खरे, त्यानंतर मात्र ते घसरणीला लागले होते. नोव्हेंबर २0१७ मध्ये ठेवींमधील वृद्धी सर्वाधिक १५.६ टक्क्यांवर होती. १६ फेब्रुवारी २0१८ ला संपलेल्या पंधरवड्यात ठेवींचा वृद्धीदर घसरून ५.९ टक्क्यांवर आला होता.

टॅग्स :MONEYपैसाIndiaभारतEconomyअर्थव्यवस्था