शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे तुकडे होऊन बनणार 'सिंधुदेश'?; लोक रस्त्यावर उतरले, संघर्ष पेटला, ४५ जण अटकेत
2
शेवटचा सत्यशोधक, स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलेल्या या माणसाने मग अनेकदा अंधारून येतानाही पाहिले
3
Cryptocurrency मधून सरकारची बक्कळ कमाई; वसूल केला ५१२ कोटी रुपयांचा टॅक्स, महाराष्ट्रातून सर्वाधिक योगदान
4
वाघाचा हल्ला, बिबट्याची झडप, भटक्या कुत्र्यांचा चावा विधानसभेत गाजला; मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांची उपाययोजनेसाठी बैठक
5
वाघांना माणूस खाऊ घालणारी ही कसली वनपर्यटनाची क्रूर नीती?
6
अबब! धान्यराशीसारखी आमदाराकडे नोटांची बंडले; अंबादास दानवेंनी पोस्ट केलेल्या व्हिडीओने राजकीय वातावरण तापले
7
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १० डिसेंबर २०२५: दागिने, वाहन प्राप्ती होणार, वादामुळे हानी होण्याची शक्यता
8
दरमहिना ११ लाख पगार असेल तरच 'या' देशात मिळणार दारू; दुकानावर दाखवावा लागणार पुरावा
9
एअर इंडियाला हवेत ‘ए-३२०’साठी वैमानिक; वैमानिकांची पळवापळवी मोठ्या प्रमाणावर होताना दिसेल
10
विधानभवन परिसरात फिरणाऱ्या दलालांवर ‘वॉच’ बिनकामाच्या लोकांना चाप, घेतली जात आहे गुप्त माहिती
11
महापालिकेत युती; वाद विसरून एकोपा, देवेंद्र फडणवीस- एकनाथ शिंदे यांचा बैठकीत निर्णय; मुख्यमंत्र्यांसमोर शिंदे-रवींद्र चव्हाण यांच्यात रुसवेफुगवे
12
‘गारगाई’च्या बांधकामाला १० वर्षांनी मिळाला मुहूर्त; वाढीव पाण्याची गरज प्रकल्पामुळे भागणार
13
अनिल अंबानींचा पुत्र जय अनमोलवर गुन्हा; बँकेला २२८ कोटींना फसवल्याचा आरोप सीबीआयने घेतली झडती
14
महाराष्ट्रात पीक नुकसानीची पाहणी करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे; कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची संसदेत ग्वाही
15
गुटखा विक्रीप्रकरणी मकोका लावणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा : कायद्यात सुधारणा करणार
16
महिला डाॅक्टरच्या आत्महत्याप्रकरणी ‘एसआयटी’सह न्यायालयीन चौकशी; फलटण येथील प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची माहिती
17
तुकाराम मुंढेंवर कारवाईसाठी सत्ताधारी विधानसभेत आक्रमक; आ. खोपडेंना धमकी देणाऱ्यावर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
18
IND vs SA 1st T20I : पांड्याची 'फिफ्टी' अन् बुमराहची 'सेंच्युरी'; टीम इंडियासमोर द.आफ्रिकेच्या संघानं टेकले गुडघे
19
“संविधान सोप्या भाषेत समजावून सांगणारा देशात दुसरा CM नाही”; शिंदेंनी केले फडणवीसांचे कौतुक
20
IND vs SA : सूर्यानं दुसऱ्यावरच दाखवला भरवसा; पांड्या म्हणाला, "मला काहीच फरक पडत नाही!"
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकात सत्तांतरासाठी बंडखोर आमदार नव्हे, तर काँग्रेसला 'ही' चूक नडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 16:50 IST

एचडी देवेगौडा यांनी राहुल यांच्याशी चर्चा करून खरगेंना मुख्यमंत्री करण्याचे सुचवले होते. त्यावर राहुल यांनी कुमारस्वामी यांनाच मुख्यमंत्री करा, असं सांगितले होते. त्यानंतर आपण कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले होते. याची माहिती खुद्द देवेगौडा यांनीच दिली होती.

मुंबई - कर्नाटकमध्ये बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचा अखेर शेवट झाला. सत्तेच्या चाव्या आता पुन्हा एकदा भाजपनेते माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्याकडे आल्या आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील मोदी लाटेनंतर आणि राहुल गांधीकाँग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच काँग्रेसला कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली होती. काँग्रेसने जनता दल सेक्युलरसोबत सरकारही स्थापन केले. मात्र हे सरकार अखेर कोसळले. याला काँग्रेसची कर्नाटकमध्ये चांगले यश मिळविल्यानंतर केलेली चूकच कारणीभूत ठरली.

देवेगौडा यांना जेडीएस-काँग्रेसची युती व्हावी अशी इच्छा नव्हती. ते आजही त्यांच्या मतांवर ठाम आहेत. खुद्द काँग्रेसने त्यांच्याकडे जाऊन तुमचा मुलगा मुख्यमंत्री होणार, काहीही होवो, असं सांगितले. परंतु, काँग्रेसच्या नेत्यांमध्ये ताळमेळ नव्हता, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी. कुमारस्वामी यांचे वडील एचडी देवेगौडा यांनी म्हटले होते.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर माजी मुख्यमंत्री सिद्धरमया, मुल्लिकार्जुन खरगे, मुनियप्पा आणि परमेश्वर देवेगौडा यांच्याकडे गेले होते. त्यावेळी खरगेंना मुख्यमंत्री करा. त्यावर खरगे म्हणाले होते की, काँग्रेस हायकमानने सांगितल्यास आपण तयार आहोत. त्यानंतर देवेगौडा यांनी राहुल यांच्याशी चर्चा करून खरगेंना मुख्यमंत्री करण्याचे सुचवले होते. त्यावर राहुल यांनी कुमारस्वामी यांनाच मुख्यमंत्री करा, असं सांगितले होते. त्यानंतर आपण कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले होते. याची माहिती खुद्द देवेगौडा यांनीच दिली होती.

दरम्यान बंडखोरांमध्ये सर्वाधिक आमदार काँग्रेसचे आहेत. परंतु, खरगे किंवा सिद्धरमया यांच्यापैकी कुणी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले असते, तर बऱ्याच प्रमाणात काँग्रेसमधील बंडखोरीला वेसन घालता आली असती. परंतु, काँग्रेसने मुख्यमंत्रीपद स्वत:हून नाकारल्याने कर्नाटकच्या सत्ताकारणातील समिकरणे चुकत गेली. त्याचा अखेर कुमारस्वामी यांचे सरकार कोसळल्यानंतरच झाला.