शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
3
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
4
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
5
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
6
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
7
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
8
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
10
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
11
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
12
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
13
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
14
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
16
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
17
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
18
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
19
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
20
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपतींचा शपथविधी २५ जुलैलाच का होतो? ‘हे’ राष्ट्रपती याच दिवशी झाले शपथबद्ध; पाहा, कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 12:52 IST

देशाच्या इतिहासात आतापर्यंत अनेक राष्ट्रपतींनी २५ जुलै रोजी शपथ घेतली आहे. जाणून घ्या...

नवी दिल्ली:द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनी देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथ गेतली. सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा यांनी त्यांना राष्ट्रपतीपदाची शपथ दिली. राष्ट्रपती निवडणुकीमध्ये एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांन ऐतिहासिक विजय मिळवला. मुर्मू यांनी विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा यांना पराभूत केले. मात्र, २५ जुलै याच दिवशी राष्ट्रपतीपदी विराजमान होणाऱ्या व्यक्तीचा शपथविधी का होतो. आतापर्यंत अनेक राष्ट्रपतींनी याच दिवशी शपथ घेतली आहे. 

राष्ट्रपती म्हणजे, देशाचा पहिला नागरिक असतो. देशाच्या इतिहासात आतापर्यंत अनेक राष्ट्रपतींनी २५ जुलै रोजी शपथ घेतली आहे. देशाच्या सहाव्या राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनी २५ जुलै रोजी राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. त्यानंतर ज्या राष्ट्रपतींचा कार्यकाळ पूर्ण झाला, त्या सर्वांनी याच तारखेला पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. नीलम संजीव रेड्डी यांच्यानंतर देशातील एकूण ८ राष्ट्रपतींनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. २४ जुलै रोजी राम नाथ कोविंद यांचा कार्यकाळही पूर्ण झाला असून, २५ जुलै रोजी देशाच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार आहेत. 

‘हे’ राष्ट्रपती याच दिवशी झाले शपथबद्ध

इंदिया गांधी सरकारने देशात जेव्हा आणीबाणी लागू केली होती, त्यानंतर पहिल्यांदा ज्यावेळी राष्ट्रपती पदाच्या निवडणुका पार पडल्या. त्यावेळी जनता पक्षाच्या माजी नेत्या नीलम संजीव रेड्डी यांनी विजय मिळवला होता. नीलम संजीव रेड्डी यांनी २५ जुलै, १९७७ रोजी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. त्यानंतर दर पाच वर्षांनी २५ जुलै रोजीच देशाचे नवनिर्वाचित राष्ट्रपती शपथ घेतात. आतापर्यंत, नीलम संजीव रेड्डी यांच्यानंतर ज्ञानी जैल सिंह (२५ जुलै १९८२ ते २५ जुलै १९८७), रामास्वामी वेंकटरमन (२५ जुलै १९८७ ते २५ जुलै १९९२), शंकरदयाल शर्मा (२५ जुलै १९९२ ते २५ जुलै १९९७), केआर नारायनन (२५ जुलै १९९७ ते २५ जुलै २००२), एपीजे अब्दुल कलाम (२५ जुलै २००२ ते २५ जुलै २००७), प्रतिभा पाटील (२५ जुलै २००७ ते २५ जुलै २०१२), प्रणब मुखर्जी (२५ जुलै २०१२ ते २५ जुलै २०१७), रामनाथ कोविंद (२५ जुलै २०१७ ते २५ जुलै २०२२).

दरम्यान, ज्याचा जन्म स्वतंत्र भारतात झाला अशी देशाची पहिली राष्ट्रपती आहे. स्वतंत्र भारताच्या नागरिकांसोबतच आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या आपल्या प्रयत्नांमध्ये आपल्याला तेजी आणायला हवी. माझा जन्म ओडिशातील एका आदिवासी गावात झाला. परंतु लोकशाहीच्या ताकदीने मला इथवर पोहोचवले. एका महत्त्वपूर्ण कालखंडात देशाने माझी निवड राष्ट्रपती म्हणून केली आहे. आपण देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत मोहोत्सव साजरा करत आहोत. जेव्हा माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात झाली होती तेव्हा आपण स्वातंत्र्याची ५० व्या वर्षाचं पर्व साजरे करत होतो. आता ७५ वर्षे पूर्ण होताना मला नवी जबाबदारी मिळाली आहे, अशा भावना द्रौपदी मुर्मू यांनी यावेळी व्यक्त केल्या. 

टॅग्स :President Election 2022राष्ट्रपती निवडणूक 2022Draupadi Murmuद्रौपदी मुर्मूRamnath Kovindरामनाथ कोविंद