दुष्काळग्रस्त शेतक:यांना डिङोल सबसिडी मिळणार
By Admin | Updated: August 8, 2014 01:23 IST2014-08-08T01:19:32+5:302014-08-08T01:23:38+5:30
सरकारने 5क् टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या राज्यांमध्ये खरीप पिके वाचविण्यासाठी कृषीपंपाकरिता वापरल्या जाणा:या डिङोलवर सबसिडीची घोषणा केली आहे.

दुष्काळग्रस्त शेतक:यांना डिङोल सबसिडी मिळणार
सोलापूर : नूतनीकरणामध्ये बदलण्यात आलेल्या हुतात्मा स्मृती मंदिरातील खुर्च्या निकृष्ट दर्जाच्या असल्याचा आरोप करून बसपा व मनसेच्या कार्यकर्त्यांनी खुर्च्या सभागृहाबाहेर आणून फेकल्या. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.
बसपाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता काही कार्यकर्त्यांनी हुतात्मा स्मृती मंदिरात प्रवेश केला. विरोध करूनही त्याच खुर्च्या बसविण्यात येत असल्याचे लक्षात येताच कार्यकर्त्यांनी काही खुर्च्या उचलून बाहेर आणून फेकल्या व महापौरांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. खुर्च्या तातडीने न बदलल्यास जाळून टाकण्याचा इशारा नगरसेवक चंदनशिवे यांनी दिला. या आंदोलनात अभिजीत कापुरे, रोहन लोंढे, अमित माने, आतिश कांबळे, रमेश रणदिवे, ईश्वर भुताळे, श्रीमंत जाधव, संजय इंगळे आदी सहभागी झाले होते.
याच दरम्यान हुतात्मासमोर मनसेचे शहराध्यक्ष युवराज चुंबळकर, प्रशांत इंगळे, सीमा सकट, नमिता थिटे, गोविंद बंदपट्टे, संतोष क्षीरसागर आदी आले होते. यापूर्वीच आम्ही हुतात्माच्या कामाबाबत महापौरांकडे तक्रार केली होती. आम्ही केलेल्या सूचनेप्रमाणे सुधारणा झाली की नाही, हे पाहण्यासाठी आलो आहोत. पॉवरग्रीडचे अधिकारीही येत आहेत, असे सांगितले. बसपाचे आंदोलन संपल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते हुतात्मा सभागृहात गेले. त्यांनीही खुर्च्या उचलल्या व सर्वजण थेट महापालिकेत घुसले. घोषणा देत मनसेचे कार्यकर्ते महापौरांच्या कार्यालयासमोर आले व त्यांनी प्रवेशद्वारावर खुर्च्या फेकून मोडतोड केली. घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. हुतात्माच्या नूतनीकरणात मनसेला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सुधारणा न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा चुंबळकर यांनी दिला.
-------------------
महापालिकेचे कर्मचारी हतबल
आंदोलनकर्त्यांनी हुतात्मा सभागृहात बसविण्यात येत असलेल्या खुर्च्या उचलून बाहेर आणल्या. याची माहिती मिळताच उपअभियंता आवताडे, जोशी तेथे आले; पण आंदोलनकर्त्यांपुढे ते हतबल होते. आंदोलनानंतर फेकलेल्या खुर्च्या त्यांनी सभागृहात परत नेऊन ठेवल्या. पोलिसांना या आंदोलनाची काहीच कल्पना नव्हती. आंदोलन संपताना पोलीस धावतपळत आले व माहिती घेऊन परतले.