शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

चालकाने मारलेला शॉर्टकट घेऊन गेला मृत्यूच्या दारात! ४७ जणांचा बुडून झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 05:48 IST

Accident : मृतांमध्ये बहुसंख्य विद्यार्थी असून सर्व जण एका परीक्षेसाठी सतना येथे जात होते.अपघातग्रस्त बस सिधी येथून सतना येथे जात होती.

सिधी (मध्य प्रदेश) : प्रवाशांनी भरलेली बस कालव्यात कोसळून झालेल्या अपघातात ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. सिधी जिल्ह्यात रामपूर नैकीन पोलीस ठाण्याजवळ सकाळी ८ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.  मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहे. मृतांमध्ये बहुसंख्य विद्यार्थी असून सर्व जण एका परीक्षेसाठी सतना येथे जात होते.अपघातग्रस्त बस सिधी येथून सतना येथे जात होती. बसमध्ये ५४ प्रवासी होते. त्यातील बहुसंख्या विद्यार्थी होते. ते ‘एएनएम’ची परीक्षा देण्यासाठी निघाले होते. अपघात घडला त्या ठिकाणी कच्चा आणि अरुंद रस्ता आहे. तेथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस कालव्यात काेसळली. मुख्य मार्गावर वाहतूक कोंडी झाल्यामुळे बसचालकाने हा शॉर्टकट घेतला. तोच त्यांना मृत्यूच्या दारी घेऊन गेला. अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधानांनी मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये तर राज्य सरकारने पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे.

शिवरानीने दोघांना वाचविलेबस कालव्यात कोसळल्यानंतर काही स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यापैकी शिवरानी नावाच्या मुलीने प्राणाची चिंता न करता कालव्यात उडी टाकून दोघांना सुखरूप बाहेर काढले. मुख्यमंत्री चौहान यांनी तिच्या शौर्याचे कौतुक केले आहे. तिचा अभिमान असल्याचे ट्विट केले आहे. बस कालव्यात कोसळली त्यावेळी शिवरानी तिच्या भावासोबत जवळच उभी होती.

अमित शहा यांचे कार्यक्रम रद्दअपघातानंतर राज्य सरकारने सर्व महत्त्वाचे कार्यक्रम रद्द केले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या व्हर्च्युअल उपस्थितीत पंतप्रधान आवास योजनेसंबंधीचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला.

टॅग्स :AccidentअपघातMadhya Pradeshमध्य प्रदेश