शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
3
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
4
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
5
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
6
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
7
मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सम-विषम योजना लागू करा : वॉचडॉग फाउंडेशन
8
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
9
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"
11
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
12
Astro Tips: गृहलक्ष्मीला सुखी ठेवा, भाग्यलक्ष्मी आपसुख होईल प्रसन्न; जाणून घ्या परस्परसंबंध!
13
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
14
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
15
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
16
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
17
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
18
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
19
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
20
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!

'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 17:59 IST

Dr. S. Jaishankar on India-Pakistan : भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मोठे विधान केले आहे.

Dr. S. Jaishankar on India-Pakistan : भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मोठे विधान केले आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, यापुढे पाकिस्तानशी चर्चा होणार असेल, तर ती फक्त दहशतवाद आणि पीओकेवरच होईल. दोन्ही देशांमधील अंतर्गत मुद्द्यांमध्ये तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही.

दिल्लीतील होंडुरास दूतावासाच्या उद्घाटनप्रसंगी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देताना परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर म्हणाले की, दोन्ही देशांमध्ये असा करार आहे की, आमचे संबंध आणि व्यवहार पूर्णपणे द्विपक्षीय असतील. यामध्ये अजिबात बदल झालेला नाही. आमचे मुद्दे आम्ही सोडवू, यात तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही. 

जयशंकर पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले आहे की, पाकिस्तानशी चर्चा फक्त दहशतवादावर आणि पीओकेवरच होईल. पाकिस्तानने दहशतवादी पायाभूत सुविधा बंद केल्या पाहिजेत. आम्ही त्यांच्याशी फक्त दहशतवादावर चर्चा करण्यास तयार आहोत. काश्मीरवर चर्चेसाठी एकमेव मुद्दा म्हणजे पाकिस्तानने बेकायदेशीरपणे व्यापलेल्या काश्मीरमधील भारतीय भूभाग रिकामा करावा, असेही त्यांनी स्पष्टपणे म्हटले.

सिंधू पाणी करार स्थगितच राहणारपरराष्ट्रमंत्र्यांनी सिंधू करारवरही प्रतिक्रिया दिली. पाकिस्तानसोबतच्या तणावपूर्ण परिस्थितीत आम्हाला आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळाला आहे. आमच्याकडे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा ठराव होता की, गुन्हेगारांना जबाबदार धरले पाहिजे आणि 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूरद्वारे त्यांना जबाबदार धरण्यात आले. पाकिस्तानसोबतच्या सिंधू पाणी कराराशी संबंधित एका प्रश्नावर परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर म्हणाले की, सिंधू पाणी करार स्थगित आहे आणि जोपर्यंत पाकिस्तान सीमापार दहशतवाद थांबवत नाही, तोपर्यंत तो स्थगितच राहील.

भारत-अमेरिका व्यापार संबंध...भारत आणि अमेरिकेत व्यापार कराराबाबत सध्या चर्चा सुरू आहे, येत्या काही दिवसांत यावर अंतिम निर्णय होण्याची अपेक्षा आहे. यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा दावा केला आहे. भारताने अमेरिकेला झिरो टॅरिफची ऑफर दिल्याचे ट्रम्प यांचे म्हणने आहे. त्यांच्या या दाव्यानंतर जयशंकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार चर्चा सुरू आहेत. या गुंतागुंतीच्या चर्चा आहेत. सर्वकाही अंतिम होईपर्यंत काहीही सांगणे कठीण आहे. कोणताही व्यापार करार परस्पर फायदेशीर असला पाहिजे; तो दोन्ही देशांसाठी कार्य करणारा असावा. व्यापार करारातून आपण हीच अपेक्षा करू शकतो. जोपर्यंत हे होत नाही, तोपर्यंत यावर कोणताही निर्णय घेणे घाईचे ठरेल, असे ते म्हणाले.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरS. Jaishankarएस. जयशंकरPakistanपाकिस्तान