शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
2
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
3
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
4
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकली; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
5
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
6
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
7
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
8
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
9
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
10
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
11
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
12
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
13
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
14
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
15
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
16
नवऱ्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगवर भडकली ऐश्वर्या; म्हणाली, "साखरपुड्यापासूनच..."
17
Hyundai Creta चं टेन्शन वाढणार, येतायेत दोन 'धाकड' SUV; जाणून घ्या फीचर्स, काय असेल खास?
18
शेख हसीना यांना शिक्षा सुनावल्यानंतर ढाक्यामध्ये हिंसाचार उसळला, युनूस सरकार 'अ‍ॅक्शन'मोडवर; परिस्थिती बिघडली
19
आता तरी घ्या रे! ऋतुराज गायकवाडचा मोठा पराक्रम; पुजाराला मागे टाकत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
20
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 17:59 IST

Dr. S. Jaishankar on India-Pakistan : भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मोठे विधान केले आहे.

Dr. S. Jaishankar on India-Pakistan : भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मोठे विधान केले आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, यापुढे पाकिस्तानशी चर्चा होणार असेल, तर ती फक्त दहशतवाद आणि पीओकेवरच होईल. दोन्ही देशांमधील अंतर्गत मुद्द्यांमध्ये तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही.

दिल्लीतील होंडुरास दूतावासाच्या उद्घाटनप्रसंगी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देताना परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर म्हणाले की, दोन्ही देशांमध्ये असा करार आहे की, आमचे संबंध आणि व्यवहार पूर्णपणे द्विपक्षीय असतील. यामध्ये अजिबात बदल झालेला नाही. आमचे मुद्दे आम्ही सोडवू, यात तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही. 

जयशंकर पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले आहे की, पाकिस्तानशी चर्चा फक्त दहशतवादावर आणि पीओकेवरच होईल. पाकिस्तानने दहशतवादी पायाभूत सुविधा बंद केल्या पाहिजेत. आम्ही त्यांच्याशी फक्त दहशतवादावर चर्चा करण्यास तयार आहोत. काश्मीरवर चर्चेसाठी एकमेव मुद्दा म्हणजे पाकिस्तानने बेकायदेशीरपणे व्यापलेल्या काश्मीरमधील भारतीय भूभाग रिकामा करावा, असेही त्यांनी स्पष्टपणे म्हटले.

सिंधू पाणी करार स्थगितच राहणारपरराष्ट्रमंत्र्यांनी सिंधू करारवरही प्रतिक्रिया दिली. पाकिस्तानसोबतच्या तणावपूर्ण परिस्थितीत आम्हाला आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळाला आहे. आमच्याकडे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा ठराव होता की, गुन्हेगारांना जबाबदार धरले पाहिजे आणि 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूरद्वारे त्यांना जबाबदार धरण्यात आले. पाकिस्तानसोबतच्या सिंधू पाणी कराराशी संबंधित एका प्रश्नावर परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर म्हणाले की, सिंधू पाणी करार स्थगित आहे आणि जोपर्यंत पाकिस्तान सीमापार दहशतवाद थांबवत नाही, तोपर्यंत तो स्थगितच राहील.

भारत-अमेरिका व्यापार संबंध...भारत आणि अमेरिकेत व्यापार कराराबाबत सध्या चर्चा सुरू आहे, येत्या काही दिवसांत यावर अंतिम निर्णय होण्याची अपेक्षा आहे. यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा दावा केला आहे. भारताने अमेरिकेला झिरो टॅरिफची ऑफर दिल्याचे ट्रम्प यांचे म्हणने आहे. त्यांच्या या दाव्यानंतर जयशंकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार चर्चा सुरू आहेत. या गुंतागुंतीच्या चर्चा आहेत. सर्वकाही अंतिम होईपर्यंत काहीही सांगणे कठीण आहे. कोणताही व्यापार करार परस्पर फायदेशीर असला पाहिजे; तो दोन्ही देशांसाठी कार्य करणारा असावा. व्यापार करारातून आपण हीच अपेक्षा करू शकतो. जोपर्यंत हे होत नाही, तोपर्यंत यावर कोणताही निर्णय घेणे घाईचे ठरेल, असे ते म्हणाले.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरS. Jaishankarएस. जयशंकरPakistanपाकिस्तान