शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

डॉ. मनमोहन सिंग यांना तामिळनाडूमधून राज्यसभेवर पाठविण्यास द्रमुकचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 04:17 IST

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना राज्यसभेवर निवडून आणण्यात काँग्रेससमोर खूपच अडचणी दिसत आहेत.

- हरिश गुप्ता नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना राज्यसभेवर निवडून आणण्यात काँग्रेससमोर खूपच अडचणी दिसत आहेत. डॉ. सिंग व काँग्रेसचेच सँटियस कुजुर यांची मुदत १४ जून रोजी संपत आहे. डॉ. सिंग यांना तामिळनाडूमधून राज्यसभेवर पाठवण्यास द्रमुकने नकार दिल्याचे समजते. तामिळनाडू व आसाममध्ये राज्यसभेच्या निवडणुका होत आहेत.तामिळनाडूमधून राज्यसभेसाठी निवडणूक होणार असून, त्यापैकी दोन जागांवर द्रमुकचे उमेदवार निवडून जाऊ शकतात. द्रमुकचे प्रमुख कणिमोळी या लोकसभेवर निवडून गेल्याने ती एक जागा रिकामी झाली आहे, तर दुसऱ्या जागेसाठी डी. राजा पुन्हा प्रयत्नशील असून, त्यांना पुन्हा उमेदवारी दिली जाईल, असे दिसते.कणिमोळी यांच्याऐवजी द्रमुकने डॉ. मनमोहन सिंग यांना उमेदवारी द्यावी, असे काँग्रेसचे प्रयत्न होते. पण टू-जी घोटाळा प्रकरण डॉ. सिंग यांनी नीट हाताळले नाही आणि त्यामुळे द्रमुकची बदनामी झाली, असे त्या पक्षाला वाटत आहे. टू-जी प्रकरण न्यायालयात बराच काळ चालले आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकांत आपला पराभव झाला, असे द्रमुक नेत्यांचे म्हणणे आहे. त्या साºयाला ते डॉ. सिंग यांनाच जबाबदार धरत आहेत. त्यामुळे त्यांनी माजी पंतप्रधानांना तामिळनाडूतून राज्यसभेवर पाठवण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येते.>आसाममधूनही पाठवणे अशक्यचगेल्या वेळी डॉ. मनमोहन सिंग आसाममधून राज्यसभेवर गेले होते. पण विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला आणि आता आसाममध्ये काँग्रेसचे केवळ २५ आमदार आहेत. एआययूडीएफच्या १३ आमदारांचा पाठिंबा मिळाला तरी डॉ. सिंग यांना निवडून आणण्यास ती संख्या कमी आहे. भाजपचे ८८ आमदार आहेत. त्याआधारे भाजपचे दोन्ही उमेदवार निवडून येऊ शकतात. त्यामुळे आसाममध्ये राज्यसभेसाठी एआययूडीएफला पाठिंबा देणे वा आपला उमेदवार उभाच न करणे, असे दोनच पर्याय आता काँग्रेसपुढे आहेत.

टॅग्स :Manmohan Singhमनमोहन सिंग