शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

डॉ. मनमोहन सिंग यांना तामिळनाडूमधून राज्यसभेवर पाठविण्यास द्रमुकचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 04:17 IST

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना राज्यसभेवर निवडून आणण्यात काँग्रेससमोर खूपच अडचणी दिसत आहेत.

- हरिश गुप्ता नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना राज्यसभेवर निवडून आणण्यात काँग्रेससमोर खूपच अडचणी दिसत आहेत. डॉ. सिंग व काँग्रेसचेच सँटियस कुजुर यांची मुदत १४ जून रोजी संपत आहे. डॉ. सिंग यांना तामिळनाडूमधून राज्यसभेवर पाठवण्यास द्रमुकने नकार दिल्याचे समजते. तामिळनाडू व आसाममध्ये राज्यसभेच्या निवडणुका होत आहेत.तामिळनाडूमधून राज्यसभेसाठी निवडणूक होणार असून, त्यापैकी दोन जागांवर द्रमुकचे उमेदवार निवडून जाऊ शकतात. द्रमुकचे प्रमुख कणिमोळी या लोकसभेवर निवडून गेल्याने ती एक जागा रिकामी झाली आहे, तर दुसऱ्या जागेसाठी डी. राजा पुन्हा प्रयत्नशील असून, त्यांना पुन्हा उमेदवारी दिली जाईल, असे दिसते.कणिमोळी यांच्याऐवजी द्रमुकने डॉ. मनमोहन सिंग यांना उमेदवारी द्यावी, असे काँग्रेसचे प्रयत्न होते. पण टू-जी घोटाळा प्रकरण डॉ. सिंग यांनी नीट हाताळले नाही आणि त्यामुळे द्रमुकची बदनामी झाली, असे त्या पक्षाला वाटत आहे. टू-जी प्रकरण न्यायालयात बराच काळ चालले आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकांत आपला पराभव झाला, असे द्रमुक नेत्यांचे म्हणणे आहे. त्या साºयाला ते डॉ. सिंग यांनाच जबाबदार धरत आहेत. त्यामुळे त्यांनी माजी पंतप्रधानांना तामिळनाडूतून राज्यसभेवर पाठवण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येते.>आसाममधूनही पाठवणे अशक्यचगेल्या वेळी डॉ. मनमोहन सिंग आसाममधून राज्यसभेवर गेले होते. पण विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला आणि आता आसाममध्ये काँग्रेसचे केवळ २५ आमदार आहेत. एआययूडीएफच्या १३ आमदारांचा पाठिंबा मिळाला तरी डॉ. सिंग यांना निवडून आणण्यास ती संख्या कमी आहे. भाजपचे ८८ आमदार आहेत. त्याआधारे भाजपचे दोन्ही उमेदवार निवडून येऊ शकतात. त्यामुळे आसाममध्ये राज्यसभेसाठी एआययूडीएफला पाठिंबा देणे वा आपला उमेदवार उभाच न करणे, असे दोनच पर्याय आता काँग्रेसपुढे आहेत.

टॅग्स :Manmohan Singhमनमोहन सिंग