शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरेंची विटंबना, तुम्हाला जबर किंमत मोजावी लागेल; संजय राऊतांचा हल्लाबोल
2
सिंगापूरमधील एका हॉटेलमध्ये दोन सेक्स वर्करना बोलावले, रुममध्ये येताच दागिने, पैसे चोरले; दोन भारतीयांना शिक्षा सुनावली
3
या राज्यात धोकादायक कफ सिरपवरही बंदी; मुलांच्या मृत्यूनंतर लगेच कारवाई
4
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
5
शिंदेसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर हल्ला; एक आरोपी ताब्यात
6
टॅलेंट नाही, खरी समस्या 'इकडे' आहे... चीनपेक्षा इथे भारत पाच पट मागे का? पै यांनी सांगितलं खरं कारण
7
फाटलेले कपडे, चेहऱ्यावर भीती...अभिनेत्री डिंपलच्या पतीनं मोलकरणीसोबत फ्लॅटमध्ये असं काय केले?
8
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि ज्यू सैन्यावरही परिणाम
9
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
10
कोजागरी पौर्णिमा २०२५: कोजागरी ते लक्ष्मीपूजन, आर्थिक वृद्धीसाठी सलग १५ दिवस म्हणा 'हे' लक्ष्मी मंत्र!
11
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
12
कॅश ऑन डिलिव्हरीवर एक्स्ट्रा चार्ज मागितला तर कारवाई होणार, बंपर सेलदरम्यान सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये
13
Tarot Card: येत्या आठवड्यात प्रवास योग आणि आप्तेष्टांच्या भेटी सुखावतील; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
14
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
15
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
16
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
17
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
18
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
19
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
20
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा

'डॉ. बाबासाहेब आंबेडकर इस्लाम स्वीकारणार होते, पण...', काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने नवा वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 17:24 IST

Karnataka Leader Controversial Remark : या वक्तव्याविरोधात भाजप नेत्यांनी जोरदार टीका केली.

Sayed Azeempeer Khadri :कर्नाटकातील तीन विधानसभांच्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे, त्यामुळे या तिन्ही ठिकाणी जोरदार प्रचार सुरू आहे. या दरम्यान, काँग्रेस नेते आणि शिगगावचे माजी आमदार सय्यद अजीमपीर खद्री (Sayed Azeempeer Khadri) यांनी सोमवारी (11 नोव्हेंबर) राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाने नवा वाद निर्माण झाला आहे. 

काँग्रेसचे उमेदवार यासिर अहमद खान पठाण यांच्या शिगगाव विधानसभा पोटनिवडणुकीच्या मेळाव्यात बोलताना सय्यद अजमपीर खद्री यांनी दावा केला की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इस्लाम धर्म स्वीकारणार होते, पण शेवटी त्यांनी बौद्ध धर्माची निवड केली. त्यांनी इस्लाम स्वीकारला असता, तर संपूर्ण दलित समाजाने त्यांचे अनुसरण केले असते. दलित समाजातील अनेक प्रमुख व्यक्तींची नावेही बदलली गेली असती. आरबी थिम्मापूर रहिम खान बनले असते, डॉ. जी परमेश्वर पीर साहेब बनले असते, एल हनुमंथय्या हसन साहेब बनले असते, असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले. 

खद्री यांच्या वक्तव्यापासून काँग्रेसने दुरावलेयावेळी खद्रींनी दलित आणि मुस्लिम समाजातील ऐतिहासिक संबंधांवर प्रकाश टाकला आणि दलित वस्त्यांजवळ मुस्लिम दर्ग्यांच्या उपस्थितीचाही उल्लेख केला. त्यांची टिप्पणी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने या विधानांपासून स्वतःला दूर केले. खद्रींच्या विधानाच्या वेळी आमदार नागराज यादव मंचावर होते. मीडियाशी बोलताना त्यांनी याला अयोग्य विधान म्हटले. दरम्यान, यावर भाजपनेही तीव्र प्रतिक्रिया दिली. 

भाजप नेत्यांची टीका

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू म्हणाले की, 'बाबासाहेब आंबेडकर इस्लाम स्वीकारणार होते, पण शेवटी बौद्ध झाले, हे काँग्रेस नेते सय्यद अजीमपूर यांचे विधान चुकीचे आहे. बाबासाहेबांनी त्यांचे विचार त्यांच्या स्वत:च्या पुस्तकात चांगल्या प्रकारे नोंदवलेले आहेत. कृपया दिशाभूल करून बाबासाहेबांचा वारसा नष्ट करू नका, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

याशिवाय, भाजप नेते आमित मालविय यांनीदेखील या विधानाचा निषेध केला. बाबासाहेबांनी इस्लामचा विरोध केला आहे. त्यांनी इस्लामला बंदिस्त समाज किंवा केवळ मुस्लिमांसाठी मुस्लिमांचे बंधुत्व म्हटले आहे. भारताची फाळणी या पुस्तकात त्यांचे शब्द उत्तम प्रकारे नोंदवले गेले आहेत. दलित आणि मुस्लिमांमध्ये युती करण्याचा विरोधकांचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही. 

टॅग्स :congressकाँग्रेसKarnatakकर्नाटकDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरBJPभाजपा