शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

'डॉ. बाबासाहेब आंबेडकर इस्लाम स्वीकारणार होते, पण...', काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने नवा वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 17:24 IST

Karnataka Leader Controversial Remark : या वक्तव्याविरोधात भाजप नेत्यांनी जोरदार टीका केली.

Sayed Azeempeer Khadri :कर्नाटकातील तीन विधानसभांच्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे, त्यामुळे या तिन्ही ठिकाणी जोरदार प्रचार सुरू आहे. या दरम्यान, काँग्रेस नेते आणि शिगगावचे माजी आमदार सय्यद अजीमपीर खद्री (Sayed Azeempeer Khadri) यांनी सोमवारी (11 नोव्हेंबर) राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाने नवा वाद निर्माण झाला आहे. 

काँग्रेसचे उमेदवार यासिर अहमद खान पठाण यांच्या शिगगाव विधानसभा पोटनिवडणुकीच्या मेळाव्यात बोलताना सय्यद अजमपीर खद्री यांनी दावा केला की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इस्लाम धर्म स्वीकारणार होते, पण शेवटी त्यांनी बौद्ध धर्माची निवड केली. त्यांनी इस्लाम स्वीकारला असता, तर संपूर्ण दलित समाजाने त्यांचे अनुसरण केले असते. दलित समाजातील अनेक प्रमुख व्यक्तींची नावेही बदलली गेली असती. आरबी थिम्मापूर रहिम खान बनले असते, डॉ. जी परमेश्वर पीर साहेब बनले असते, एल हनुमंथय्या हसन साहेब बनले असते, असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले. 

खद्री यांच्या वक्तव्यापासून काँग्रेसने दुरावलेयावेळी खद्रींनी दलित आणि मुस्लिम समाजातील ऐतिहासिक संबंधांवर प्रकाश टाकला आणि दलित वस्त्यांजवळ मुस्लिम दर्ग्यांच्या उपस्थितीचाही उल्लेख केला. त्यांची टिप्पणी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने या विधानांपासून स्वतःला दूर केले. खद्रींच्या विधानाच्या वेळी आमदार नागराज यादव मंचावर होते. मीडियाशी बोलताना त्यांनी याला अयोग्य विधान म्हटले. दरम्यान, यावर भाजपनेही तीव्र प्रतिक्रिया दिली. 

भाजप नेत्यांची टीका

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू म्हणाले की, 'बाबासाहेब आंबेडकर इस्लाम स्वीकारणार होते, पण शेवटी बौद्ध झाले, हे काँग्रेस नेते सय्यद अजीमपूर यांचे विधान चुकीचे आहे. बाबासाहेबांनी त्यांचे विचार त्यांच्या स्वत:च्या पुस्तकात चांगल्या प्रकारे नोंदवलेले आहेत. कृपया दिशाभूल करून बाबासाहेबांचा वारसा नष्ट करू नका, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

याशिवाय, भाजप नेते आमित मालविय यांनीदेखील या विधानाचा निषेध केला. बाबासाहेबांनी इस्लामचा विरोध केला आहे. त्यांनी इस्लामला बंदिस्त समाज किंवा केवळ मुस्लिमांसाठी मुस्लिमांचे बंधुत्व म्हटले आहे. भारताची फाळणी या पुस्तकात त्यांचे शब्द उत्तम प्रकारे नोंदवले गेले आहेत. दलित आणि मुस्लिमांमध्ये युती करण्याचा विरोधकांचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही. 

टॅग्स :congressकाँग्रेसKarnatakकर्नाटकDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरBJPभाजपा