शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

'डॉ. बाबासाहेब आंबेडकर इस्लाम स्वीकारणार होते, पण...', काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने नवा वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 17:24 IST

Karnataka Leader Controversial Remark : या वक्तव्याविरोधात भाजप नेत्यांनी जोरदार टीका केली.

Sayed Azeempeer Khadri :कर्नाटकातील तीन विधानसभांच्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे, त्यामुळे या तिन्ही ठिकाणी जोरदार प्रचार सुरू आहे. या दरम्यान, काँग्रेस नेते आणि शिगगावचे माजी आमदार सय्यद अजीमपीर खद्री (Sayed Azeempeer Khadri) यांनी सोमवारी (11 नोव्हेंबर) राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाने नवा वाद निर्माण झाला आहे. 

काँग्रेसचे उमेदवार यासिर अहमद खान पठाण यांच्या शिगगाव विधानसभा पोटनिवडणुकीच्या मेळाव्यात बोलताना सय्यद अजमपीर खद्री यांनी दावा केला की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इस्लाम धर्म स्वीकारणार होते, पण शेवटी त्यांनी बौद्ध धर्माची निवड केली. त्यांनी इस्लाम स्वीकारला असता, तर संपूर्ण दलित समाजाने त्यांचे अनुसरण केले असते. दलित समाजातील अनेक प्रमुख व्यक्तींची नावेही बदलली गेली असती. आरबी थिम्मापूर रहिम खान बनले असते, डॉ. जी परमेश्वर पीर साहेब बनले असते, एल हनुमंथय्या हसन साहेब बनले असते, असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले. 

खद्री यांच्या वक्तव्यापासून काँग्रेसने दुरावलेयावेळी खद्रींनी दलित आणि मुस्लिम समाजातील ऐतिहासिक संबंधांवर प्रकाश टाकला आणि दलित वस्त्यांजवळ मुस्लिम दर्ग्यांच्या उपस्थितीचाही उल्लेख केला. त्यांची टिप्पणी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने या विधानांपासून स्वतःला दूर केले. खद्रींच्या विधानाच्या वेळी आमदार नागराज यादव मंचावर होते. मीडियाशी बोलताना त्यांनी याला अयोग्य विधान म्हटले. दरम्यान, यावर भाजपनेही तीव्र प्रतिक्रिया दिली. 

भाजप नेत्यांची टीका

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू म्हणाले की, 'बाबासाहेब आंबेडकर इस्लाम स्वीकारणार होते, पण शेवटी बौद्ध झाले, हे काँग्रेस नेते सय्यद अजीमपूर यांचे विधान चुकीचे आहे. बाबासाहेबांनी त्यांचे विचार त्यांच्या स्वत:च्या पुस्तकात चांगल्या प्रकारे नोंदवलेले आहेत. कृपया दिशाभूल करून बाबासाहेबांचा वारसा नष्ट करू नका, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

याशिवाय, भाजप नेते आमित मालविय यांनीदेखील या विधानाचा निषेध केला. बाबासाहेबांनी इस्लामचा विरोध केला आहे. त्यांनी इस्लामला बंदिस्त समाज किंवा केवळ मुस्लिमांसाठी मुस्लिमांचे बंधुत्व म्हटले आहे. भारताची फाळणी या पुस्तकात त्यांचे शब्द उत्तम प्रकारे नोंदवले गेले आहेत. दलित आणि मुस्लिमांमध्ये युती करण्याचा विरोधकांचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही. 

टॅग्स :congressकाँग्रेसKarnatakकर्नाटकDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरBJPभाजपा