शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

काश्मीर खोऱ्यात भारतीय सैन्याकडून ५ दिवसांत १५ दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 14:59 IST

भारतीय सैन्याने काश्मीर खोऱ्यात गेल्या ५ दिवसांता एक डझनपेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. गेल्या ५ दिवसांत सीमारेषेवरुन घुसखोरी करण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांकडून होत होता

श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरच्या त्राल येथे सुरक्षा जवानांची दहशतवाद्यांसोबत चकमक झाली असून दोन आतंकवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. सध्या, या परिसरात सैन्यदलाकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. सुरुवातील सुरक्षा रक्षकांनी दहशतवाद्यांना शरणागती पत्कारण्यास सांगितले होते. मात्र, दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केल्यानंतर सुरक्षा जवानांनीही प्रत्युत्तरादाखल फायरिंग केलं. त्यामध्ये, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. 

भारतीय सैन्याने काश्मीर खोऱ्यात गेल्या ५ दिवसांता एक डझनपेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. गेल्या ५ दिवसांत सीमारेषेवरुन घुसखोरी करण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांकडून होत होता. त्यापैकी १३ दहशतवाद्यांचा खात्मा भारतीय सैन्याने केला होता, त्यानंतर आज आणखी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. त्यामुळे एकूण १५ दहशतवाद्यांचा खात्मा गेल्या ५ दिवसांत करण्यात आला आहे. त्यामध्ये मेंढर सेक्टरमध्ये १०, नौशेरा सेक्टरमध्ये ३ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. सैन्याने या दहशतवाद्यांकडून २ एके ४७, अमेरिका रायफल, चीनी पिस्टल आणि ग्रेनेड जप्त करण्यात आले आहे. 

सोमवारी मनकोट आणि मेंढर सेक्टरमधील चौकीवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आला. दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने कव्हर फायरिंग केले. मात्र, भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर देत दहशतवादी आणि पाकिस्तानच्या सैन्याचा प्रयत्न हाणून पाडला.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादDeathमृत्यूIndian Armyभारतीय जवान