शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

काश्मीर खोऱ्यात भारतीय सैन्याकडून ५ दिवसांत १५ दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 14:59 IST

भारतीय सैन्याने काश्मीर खोऱ्यात गेल्या ५ दिवसांता एक डझनपेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. गेल्या ५ दिवसांत सीमारेषेवरुन घुसखोरी करण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांकडून होत होता

श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरच्या त्राल येथे सुरक्षा जवानांची दहशतवाद्यांसोबत चकमक झाली असून दोन आतंकवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. सध्या, या परिसरात सैन्यदलाकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. सुरुवातील सुरक्षा रक्षकांनी दहशतवाद्यांना शरणागती पत्कारण्यास सांगितले होते. मात्र, दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केल्यानंतर सुरक्षा जवानांनीही प्रत्युत्तरादाखल फायरिंग केलं. त्यामध्ये, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. 

भारतीय सैन्याने काश्मीर खोऱ्यात गेल्या ५ दिवसांता एक डझनपेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. गेल्या ५ दिवसांत सीमारेषेवरुन घुसखोरी करण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांकडून होत होता. त्यापैकी १३ दहशतवाद्यांचा खात्मा भारतीय सैन्याने केला होता, त्यानंतर आज आणखी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. त्यामुळे एकूण १५ दहशतवाद्यांचा खात्मा गेल्या ५ दिवसांत करण्यात आला आहे. त्यामध्ये मेंढर सेक्टरमध्ये १०, नौशेरा सेक्टरमध्ये ३ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. सैन्याने या दहशतवाद्यांकडून २ एके ४७, अमेरिका रायफल, चीनी पिस्टल आणि ग्रेनेड जप्त करण्यात आले आहे. 

सोमवारी मनकोट आणि मेंढर सेक्टरमधील चौकीवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आला. दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने कव्हर फायरिंग केले. मात्र, भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर देत दहशतवादी आणि पाकिस्तानच्या सैन्याचा प्रयत्न हाणून पाडला.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादDeathमृत्यूIndian Armyभारतीय जवान