शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

खोटारडेपणा काँग्रेसच्या डीएनएमध्ये : योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 18:40 IST

शेतकऱ्यांच्या खात्यात जाणारा सरकारी पैसा सुद्धा कॉंग्रेसने पचवले. भाजपने मात्र त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे टाकले. न्याय यात्रा काढणाऱ्या कॉंग्रेसने आयुष्यभर देशासोबत अन्याय केले.

मुंबई - काँग्रेस सरकारच्या काळात सरकारी निधी सामान्य व्यक्तीच्या हातात पडण्यापूर्वीच दलांच्या घश्यात जात असे. भाजप सरकारमध्ये येताच ही दलाली बंद झाली. आता प्रत्येक योजनेचे सर्व पैसे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले जातात. काँग्रेसच्या डीएनए मध्येच खोटेपणा आहे अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. उत्तर प्रदेशच्या धौरहरा लोकसभा मतदार संघातील सभेत ते बोलत होते.

शेतकऱ्यांच्या खात्यात जाणारा सरकारी पैसा सुद्धा कॉंग्रेसने पचवले. भाजपने मात्र त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे टाकले. न्याय यात्रा काढणाऱ्या कॉंग्रेसने आयुष्यभर देशासोबत अन्याय केले. काँग्रेसमुळे देशाचा विकास होऊ शकला नाही. ७० वर्षे गरिबांना बैंकेत खाते उघडू दिले नाही आणि आज गरीबाला न्याय देण्याची भाषा करतात. देशाला कॉंग्रेसच्या पापातून मुक्त करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. काँग्रेस बरोबरच  बसपा आणि सपावर सुद्धा योगी आदित्यनाथ यांनी टीका केली.

कॉंग्रेसने दहशतवाद्यांना बिर्याणी खाऊ घातली पण आम्ही त्यांना बंदुकाच्या गोळ्या  खाऊ घालू. देशात विकासकामांचा धडका मोदींनी लावला आहे. दहशतवाद आणि नक्षलवाद पूर्णपणे संपवण्याच काम पुढील काळात भाजप करेल, असा दावा योगी आदित्यनाथ यांनी केला.

उत्तर प्रदेशमधील धौरहरा लोकसभा मतदार संघातील भाजप उमेदवार रेखा वर्मा यांच्या प्रचारार्थ योगी आदित्यनाथ बोलत होते. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत रेखा वर्मा यांनी ३ लाख ६० हजारच्या फरकाने विजय मिळवला होता. भाजपने २०१९ मध्ये वर्मा यांना पुन्हा संधी दिली आहे.

 

 

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकyogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019congressकाँग्रेस