शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली हिंसाचार प्रकरणावर मोदी सरकारची पहिली प्रतिक्रिया; मराठमोळ्या मंत्र्यांचं मोठं विधान

By कुणाल गवाणकर | Updated: January 27, 2021 15:39 IST

दिल्लीत शेतकरी आंदोलनात हिंसाचार झाल्याच्या २४ तासांनंतर सरकारचं भाष्य

नवी दिल्ली: गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीतल्या वेशीवर केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी काल ट्रॅक्टर मोर्चा काढला. या मोर्चाला हिंसक वळण लागलं. लाल किल्ल्यासह अनेक भागांमध्ये आंदोलक आणि पोलीस एकमेकांना भिडले. या चकमकीत अनेक जण जखमी झाले. त्यामुळे गृह मंत्रालय हिंसाचाराला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलक शेतकरी आणि सरकारमधील संवाद संपून प्रश्न आणखी चिघळ्याची शक्यता निर्माण झाली. मात्र केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी एक दिलासादायक विधान केलं आहे.अमित शहा इन ऍक्शन! गृह मंत्रालय मोठी कारवाई करण्याच्या तयारीत; पुढील काही तास महत्त्वाचेचर्चेचे दरवाजे बंद झाल्याचं आम्ही कधीही म्हटलेलं नाही, असं जावडेकर यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मार्च आणि त्यात झालेला हिंसाचार याबद्दल गेल्या २४ तासांत मोदी सरकारकडून प्रतिक्रिया आलेली नव्हती. या पार्श्वभूमीवर जावडेकर यांनी केलेलं विधान महत्त्वाचं मानलं जात आहे. आजच्या कॅबिनेट बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांना दिल्लीत झालेल्या हिंसाचाराबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी चर्चेचे दरवाजे बंद झाल्याचं तुम्ही ऐकलंत का? जेव्हा काही होईल, तेव्हा तुम्हाला सांगू, असं उत्तर जावडेकर यांनी दिलं.शेतकऱ्यांबद्दलचं विधान भोवलं; ६ दिग्गज ब्रँण्ड्सकडून कंगना रणौतसोबतचे करार रद्दचर्चेच्या ११ फेऱ्या निष्फळकृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत सरकारनं ११ वेळा बैठक घेतल्या आहेत. मात्र या सगळ्या बैठका निष्फळ ठरल्या. दीड वर्षांसाठी कृषी कायद्यांना स्थगिती देईल, अशी भूमिका केंद्र सरकारनं घेतली. मात्र ही ऑफर शेतकरी संघटनांनी अमान्य केली. तिन्ही कायदे रद्द करा या मागणीवर शेतकरी संघटना ठाम आहेत. तर कायदे मागे घेणार नसल्याची भूमिका केंद्रानं घेतली आहे. त्यामुळे ११ बैठकांनंतरही तोडगा निघालेला नाही.खळबळजनक! "काठ्या घेऊन रॅलीत या"; शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा व्हिडिओ व्हायरलगृह मंत्रालय ऍक्शनमध्येप्रजासत्ताक दिनी हिंसाचार घडवून आणणाऱ्या, त्यात सहभाग असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश गृह मंत्रालयाकडून दिल्ली पोलिसांसह शेजारील राज्यांच्या पोलिसांना देण्यात आले आहेत. काल झालेल्या हिंसाचाराची चौकशी दिल्ली पोलिसांची गुन्हे शाखा करेल. यासाठी आज संध्याकाळपर्यंत एक विशेष तपास पथक स्थापन करण्यात येईल. हिंसाचाराआधी झालेल्या घडामोडी, त्यानंतर झालेला हिंसाचार या संपूर्ण घटनाक्रमाची चौकशी पथकाकडून केली जाईल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPrakash Javadekarप्रकाश जावडेकरFarmerशेतकरी