शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

काश्मिरात तालिबान्यांच्या फैलावाची चिंता नको, शस्त्र हाती घेणाऱ्यास परिणाम भोगावे लागतील - पांडेय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 12:24 IST

काहीही संबंध नसलेल्या घटनांबाबत अनेकदा मला प्रश्न विचारण्यात आला. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर पुन्हा हेच देईन, तुम्ही का चिंतीत आहात. तुम्ही सुरक्षित आहात आणि आणि तुम्हांला सुरक्षित ठेवले जाईल.

श्रीगनर :  जम्मू-काश्मिरमध्ये तालिबानी अतिरेक्यांचा फैलाव होण्याच्या शक्यतेबाबत काळजी करण्याची गरज नाही. जम्मू-काश्मीरच्या जनतेला सुरक्षित ठेवले जाणार असल्याने या शक्यतेबाबत चिंता बाळगण्याची गरज नाही, असे श्रीनगरस्थित  लष्कराच्या १५ व्या दलाचे जनरल ऑफिसर कमांडिंग लेफ्ट. जनरल डी. पी. पांडेेय यांनी स्पष्ट केले.काहीही संबंध नसलेल्या घटनांबाबत अनेकदा मला प्रश्न विचारण्यात आला. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर पुन्हा हेच देईन, तुम्ही का चिंतीत आहात. तुम्ही सुरक्षित आहात आणि आणि तुम्हांला सुरक्षित ठेवले जाईल. कोणी शस्त्रे हाती उचलले, तर त्याला त्याचे  परिणाम भोगावे लागतील.  त्याचा खात्मा केला जाईल किंवा जेरबंद केले जाईल किंवा त्याला शरणागती पत्करावी लागेल, असे लेफ्ट. जनरल पांडेय यांनी सांगितले. आजच्या सुरक्षा स्थितीतून स्पष्ट होते की, काश्मिरी युवकांना रस्त्यांवर उतरणे बंद केले आहे. त्यांनाही हा खेळ समजला आहे. काश्मिरी  युवकांनाही देशभरात स्पर्धेसाठीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांंनी देशाबाहेर जावे आणि जबाबदार आणि प्रगल्भ माणूस व्हावे, यासाठी त्यांच्यासाठी असे उपक्रम चालूच ठेवले जातील, असेही त्यांनी सांगितले.

काश्मिरी जनतेची मानसिकता बदललीपोलिसांच्या माहितीनुसार काश्मीर खोऱ्यांतील विदेशी अतिरेक्यांची संख्या ६० ते ७० असावी. जे मूळचे पाकिस्तानी आहेत. स्थानिक युवकांना चिथावणी देत त्यांच्या हाती शस्त्रे देणे, ही या विदेशी अतिरेक्यांची रणनीती आहे. काश्मिरी जनतेची मानसिकता बदलली आहे. आपल्याच समुदायातील काही चुकीच्या मार्गाने घेऊन जात होते, हे त्यांना कळून चुकले आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवानTalibanतालिबानterroristदहशतवादी