शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मत वाया घालवू नका, विचार करून मतदान करा; पंतप्रधान मोदींचे सभेत आवाहन, विरोधकांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 14:44 IST

‘अपमान मंत्रालय’ स्थापन करा, वेळ वाचेल; प्रियांका गांधींचा टोला

सहरसा/ कटिहार : बिहारच्या विकासासाठी एनडीएच्या नेतृत्वाखाली डबल इंजिन सरकारची गरज असल्याचे नमूद करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (दि. ३) राष्ट्रीय जनता दल (राजद) - काँग्रेस आघाडी भ्रष्टाचार आणि तुष्टीकरणाच्या राजकारणाने व्यापली असल्याची टीका केली. नवतरुण मतदारांना मतदानाचे महत्त्व सांगताना मोदी म्हणाले, ‘मी पहिल्यांदा मतदान केले तेव्हा माझे मत वाया जाऊ नये, अशी इच्छा होती. तुमचेही पहिले मत वाया जाणार नाही हा विचार करून मतदान करा. तुमचे पहिले मत सरकार स्थापन करणारे असावे.’

एनडीएपूर्वी १५ वर्षे बिहारवर राज्य करणारा राजद आणि केंद्रात सहा दशके अखंडपणे राज्य करणाऱ्या काँग्रेसवर त्यांनी हल्ला चढवला. आरजेडीच्या ‘जंगल राज’मध्ये पोलिसही सुरक्षित नव्हते, असे ते म्हणाले. राजदने राज्यात काँग्रेस नेत्यांना खुजे केले आहे. राजदच्या पोस्टरवर काँग्रेस नेत्यांची छायाचित्रेच नाहीत, असे ते म्हणाले. २००५च्या निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी राजदने केंद्रात काँग्रेसशी हातमिळवणी करून बिहारचे प्रकल्प अडवले होते, असा आरोप त्यांनी केला. विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले, ‘एक राज्यातील सर्वात भ्रष्ट कुटुंब आणि दुसरे देशातील सर्वात भ्रष्ट कुटुंब आहे. दोघे मिळून गरिबांसाठी येणारा पैसा लुटतात.’

‘अपमान मंत्रालय’ स्थापन करा, वेळ वाचेल : प्रियांका गांधी

सहरसा / लखीसराय (बिहार) : काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी सोमवारी येथे आयोजित जाहीर सभांतून एनडीए सरकार व पंतप्रधानांना लक्ष्य करून सरकारने एक वेगळे ‘अपमान मंत्रालय’ स्थापन करायला हवे, अशी उपहासात्मक टीका केली. वारंवार अपमानाचे आरोप करण्यात वेळ वाया घालवू नका, असे त्या म्हणाल्या. प. बंगाल, कर्नाटक असो अथवा बिहार, प्रत्येक ठिकाणी नेते अपमानाचाच मुद्दा मांडत असल्याची टीका त्यांनी केली.

तेजस्वी-तेजप्रताप परस्परांविरुद्ध

पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) सर्वेसर्वा लालुप्रसाद यादव यांचे दोन्ही पुत्र तेजस्वी आणि तेजप्रताव यादव यांनी निवडणुकीच्या रणांगणात परस्परांविरुद्ध रणशिंग फुंकले असून या दोन्ही भावांच्या आव्हानांमुळे महुआ आणि राघोपूर या मतदारसंघांतील लढती अधिक रंगतदार झाल्या आहेत. महुआमधून तेजप्रताप निवडणूक लढवणार आहेत. तर राघोपूरमधून तेजस्वी यादव मैदानात आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Vote wisely, don't waste it: PM Modi slams opposition in Bihar

Web Summary : PM Modi urged first-time voters in Bihar to vote thoughtfully, criticizing the RJD-Congress alliance for corruption. Priyanka Gandhi sarcastically suggested an 'Insult Ministry'. Lalu Yadav's sons, Tejashwi and Tej Pratap, are contesting from Raghopur and Mahua respectively, adding intrigue to the elections.
टॅग्स :BiharबिहारBihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५