शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
3
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
4
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
5
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
6
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
7
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
8
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
9
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
10
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
11
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
12
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
13
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
14
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
15
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
16
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
17
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
18
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
19
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
20
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले

मत वाया घालवू नका, विचार करून मतदान करा; पंतप्रधान मोदींचे सभेत आवाहन, विरोधकांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 14:44 IST

‘अपमान मंत्रालय’ स्थापन करा, वेळ वाचेल; प्रियांका गांधींचा टोला

सहरसा/ कटिहार : बिहारच्या विकासासाठी एनडीएच्या नेतृत्वाखाली डबल इंजिन सरकारची गरज असल्याचे नमूद करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (दि. ३) राष्ट्रीय जनता दल (राजद) - काँग्रेस आघाडी भ्रष्टाचार आणि तुष्टीकरणाच्या राजकारणाने व्यापली असल्याची टीका केली. नवतरुण मतदारांना मतदानाचे महत्त्व सांगताना मोदी म्हणाले, ‘मी पहिल्यांदा मतदान केले तेव्हा माझे मत वाया जाऊ नये, अशी इच्छा होती. तुमचेही पहिले मत वाया जाणार नाही हा विचार करून मतदान करा. तुमचे पहिले मत सरकार स्थापन करणारे असावे.’

एनडीएपूर्वी १५ वर्षे बिहारवर राज्य करणारा राजद आणि केंद्रात सहा दशके अखंडपणे राज्य करणाऱ्या काँग्रेसवर त्यांनी हल्ला चढवला. आरजेडीच्या ‘जंगल राज’मध्ये पोलिसही सुरक्षित नव्हते, असे ते म्हणाले. राजदने राज्यात काँग्रेस नेत्यांना खुजे केले आहे. राजदच्या पोस्टरवर काँग्रेस नेत्यांची छायाचित्रेच नाहीत, असे ते म्हणाले. २००५च्या निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी राजदने केंद्रात काँग्रेसशी हातमिळवणी करून बिहारचे प्रकल्प अडवले होते, असा आरोप त्यांनी केला. विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले, ‘एक राज्यातील सर्वात भ्रष्ट कुटुंब आणि दुसरे देशातील सर्वात भ्रष्ट कुटुंब आहे. दोघे मिळून गरिबांसाठी येणारा पैसा लुटतात.’

‘अपमान मंत्रालय’ स्थापन करा, वेळ वाचेल : प्रियांका गांधी

सहरसा / लखीसराय (बिहार) : काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी सोमवारी येथे आयोजित जाहीर सभांतून एनडीए सरकार व पंतप्रधानांना लक्ष्य करून सरकारने एक वेगळे ‘अपमान मंत्रालय’ स्थापन करायला हवे, अशी उपहासात्मक टीका केली. वारंवार अपमानाचे आरोप करण्यात वेळ वाया घालवू नका, असे त्या म्हणाल्या. प. बंगाल, कर्नाटक असो अथवा बिहार, प्रत्येक ठिकाणी नेते अपमानाचाच मुद्दा मांडत असल्याची टीका त्यांनी केली.

तेजस्वी-तेजप्रताप परस्परांविरुद्ध

पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) सर्वेसर्वा लालुप्रसाद यादव यांचे दोन्ही पुत्र तेजस्वी आणि तेजप्रताव यादव यांनी निवडणुकीच्या रणांगणात परस्परांविरुद्ध रणशिंग फुंकले असून या दोन्ही भावांच्या आव्हानांमुळे महुआ आणि राघोपूर या मतदारसंघांतील लढती अधिक रंगतदार झाल्या आहेत. महुआमधून तेजप्रताप निवडणूक लढवणार आहेत. तर राघोपूरमधून तेजस्वी यादव मैदानात आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Vote wisely, don't waste it: PM Modi slams opposition in Bihar

Web Summary : PM Modi urged first-time voters in Bihar to vote thoughtfully, criticizing the RJD-Congress alliance for corruption. Priyanka Gandhi sarcastically suggested an 'Insult Ministry'. Lalu Yadav's sons, Tejashwi and Tej Pratap, are contesting from Raghopur and Mahua respectively, adding intrigue to the elections.
टॅग्स :BiharबिहारBihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५