शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

राहुल गांधींना आणखी एक धक्का; बसपा, सपानंतर आपचा काँग्रेसविरोधी सूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 21:54 IST

मोदींना पराभूत करायचं असल्यास काँग्रेसला मत देऊ नका, असं केजरीवाल म्हणाले.

नवी दिल्ली: बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष या उत्तर प्रदेशातील पक्षांनंतर आता दिल्लीतल्या आम आदमी पक्षानं काँग्रेसला धक्का दिला आहे. नरेंद्र मोदींचा पराभव करायचा असल्यास काँग्रेसला मत देऊ नका, असं दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी उत्तर दिल्लीतील एका भाषणात म्हटलं. याआधी बहुजन पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी काँग्रेसपासून चार हात लांब राहण्याची भूमिका घेतली आहे. पंतप्रधान कोणही होऊ दे. दिल्लीत आम आदमी पक्षाचेच खासदार निवडून द्या, असं आवाहन केजरीवाल यांनी केलं. 'चार वर्षांपूर्वी लोकसभेची निवडणूक झाली. त्यावेळी जनतेनं दिल्लीतून भाजपाच्या 7 उमेदवारांना विजयी केलं. मात्र त्यानंतर वर्षभरात झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेनं 67 जागा देऊन आमचं सरकार स्थापन केलं. आता जास्त काम कोणी केलं? भाजपानं की आपनं? याचं उत्तर जनतेनं द्यावं,' असं केजरीवाल म्हणाले. दिल्लीत आपचे 7 खासदार निवडून आले असते, तर कामांचा वेग दहापटींनी वाढला असता. आम्ही संसदेचं कामकाज ठप्प केलं असतं. मात्र मेट्रोच्या तिकीटाचा दर वाढू दिला नसता, असं केजरीवाल यांनी म्हटलं. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. 'मागील लोकसभा निवडणुकीत आम्ही चूक केली, असं अनेक दिल्लीकर सांगतात. आता आम आदमी पक्षालाच मतदान करु, अशी भावना अनेकजण बोलून दाखवतात. अनेकांना राहुल गांधींना मतदान करायचं नाही. पंतप्रधान कोणही होऊ दे. दिल्लीत आपचे खासदार निवडून यायला हवेत. दिल्लीत आप हाच पर्याय आहे,' असं त्यांनी म्हटलं. ज्यांना मोदींना हरवायचं आहे, त्यांनी काँग्रेसला मतदान करु नये. भाजपाचा पराभव करायचा असल्यास आपला मत द्या, असं आवाहन केजरीवालांनी केलं.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीArvind Kejriwalअरविंद केजरीवालcongressकाँग्रेसAAPआपNew Delhiनवी दिल्लीdelhiदिल्लीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९