शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

राष्ट्रवाद नको! त्यामध्ये हिटलर, नाझीवादाचा अर्थ; मोहन भागवतांनी कान टोचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 12:41 IST

मोहन भागवत हे स्पष्टवक्ते म्हणून ओळखले जातात. बऱ्याचदा त्यांनी भाषणांमधून भाजपाच्या भूमिकांविरोधात मते मांडलेली आहेत.

ठळक मुद्देआरएसएसचा विस्तार देशासाठी आहे कारण आमचे लक्ष्य भारताला विश्वगुरु बनविण्याचे आहेविकसित देश त्यांचा व्यापार प्रत्येक देशामध्ये वाढविण्याचे काम करतात

रांची: देशात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या राष्ट्रवादावरील वादावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रमुखमोहन भागवत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. झारखंडची राजधानी रांचीमध्ये एका कार्यक्रमात त्यांनी राष्ट्रवाद हा शब्द वापरू नका त्यामध्ये हिटलर आणि नाझीवादाची झलक पहायला मिळते, असे म्हटले आहे. याद्वारे त्यांनी एकप्रकारे भाजपाच्याच नेत्यांचे कान पिळल्याची चर्चा होत आहे. 

मोहन भागवत हे स्पष्टवक्ते म्हणून ओळखले जातात. बऱ्याचदा त्यांनी भाषणांमधून भाजपाच्या भूमिकांविरोधात मते मांडलेली आहेत. गेल्या काही काळापासून देशात राष्ट्रवादावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीका होत होती. यावर भागवत यांनी मत मांडले आहे. आरएसएसचा विस्तार देशासाठी आहे कारण आमचे लक्ष्य भारताला विश्वगुरु बनविण्याचे आहे, असे ते म्हणाले. 

याचबरोबर भागवत यांनी सांगितले की, राष्ट्रवादासारख्या शब्दाचा वापर करू नये. कारण याचा अर्थ नाझी किंवा हिटलरशी संबंधित काढले जाऊ शकते. अशावेळी देश, राष्ट्रीय अशा शब्दांचाच प्रामुख्याने वापर करावा. जगासमोर सध्या आयएसआयएस, कट्टरपंथी आणि जलवायू परिवर्तन यासारख्या समस्या आहेत.

विकसित देश त्यांचा व्यापार प्रत्येक देशामध्ये वाढविण्याचे काम करतात. या द्वारे ते त्यांच्या अटी मान्य करायला भाग पाडतात. जगासमोर ज्या समस्या आहेत त्यांच्यापासून भारतच दिलासा देऊ शकतो. अशात हिंदुस्थानला जगाचे नेतृत्व करण्याचा विचार करायला हवा. देशाची एकताच आपली मोठी ताकद आहे, असेही भागवत म्हणाले.  

 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपा