शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

सोशल मीडिया कंपन्यांनी भारताला स्वातंत्र्य आणि लोकशाहीचे धडे देऊ नयेत, रविशंकर प्रसाद कडाडले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2021 15:01 IST

केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सोशल मीडिया कंपन्यांना खडेबोल सुनावले आहेत.

केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सोशल मीडिया कंपन्यांना खडेबोल सुनावले आहेत. सोशल मीडिया कंपन्यांनी भारताला लोकशाही आणि स्वातंत्र्याचे धडे देण्याचं काम करू नये, जर या कंपन्यांना भारतात राहून नफा कमवायचा असेल तर त्यांना भारतीय संविधान आणि कायदे पाळावेच लागतील, असे खडेबोल रविशंकर प्रसाद यांनी कंपन्यांना सुनावेल आहेत. 

सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीद्वारे सिम्बॉयसिस सुवर्ण जयंती व्याख्यानमालेचं आयोजिन करण्यात आलं होतं. यात सोशल मीडिया आणि सामाजिक सुरक्षा व गुन्हे प्रणालीतील सुधारणा एक अपूर्ण अजेंडा या विषयावर बोलताना रविशंकर प्रसाद यांनी सोशल मीडिया कंपन्यांना काही स्पष्ट सूचना दिल्या. नवे नियम हे काही सोशल मीडियाच्या वापरासंबंधिचे नव्हे, तर या व्यासपीठाच्या चुकीच्या वापराबद्दलचे आहेत, असं रविशंकर प्रसाद म्हणाले. 

"नवे नियमांचं पालन करावंच लागेल ही अतिशय पायाभूत गरज आहे. मला पुन्हा एकदा आवर्जुन सांगायचं आहे की नफा कमावणाऱ्या कंपन्या ज्या अमेरिकेत बसल्या आहेत. त्यांनी भारताला स्वातंत्र्य आणि लोकशाहीचे धडे देण्याची अजिबात गरज नाही. भारतात स्वातंत्र्यासोबतच निष्पक्ष पद्धतीनं निवडणुका होतात. आमच्या इथं न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे. मीडिया, सिवील सोसायटीलाही स्वातंत्र्य आहे. मी इथं विद्यार्थ्यांसोबत संवाद साधतोय आणि त्याच वेळी त्यांच्या प्रश्नांची देखील उत्तरं देत आहे. हीच खऱ्या अर्थानं लोकशाही आहे. त्यामुळे कंपन्यांनी आम्हाला लोकशाहीवर धडे देऊ नये", असं रविशंकर प्रसाद म्हणाले. 

"जेव्हा भारतीय कंपन्या अमेरिकेत व्यापार करण्यासाठी जातात तेव्हा त्या अमेरिकेतील कायदे आणि नियम पाळत नाहीत का? भारत एक डिजिटल मार्केट आहे आणि तुम्ही इथं खूप पैसा कमावता. यात आम्हाला काहीच अडचण नाही. पंतप्रधानांवर टीका करा, माझ्यावर टीका करा, प्रश्न विचारा पण तुम्ही भारताचे कायदे का पाळणार नाही? याचं उत्तर द्या. जर तुम्हाला भारतात व्यवसाय करायचा आहे, तर भारतीय संविधान आणि कायदे पाळावेच लागतील", असं रोखठोक विधान रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केलं.  

टॅग्स :Ravi Shankar Prasadरविशंकर प्रसादSocial Mediaसोशल मीडिया