शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

दुर्लक्ष नको, कोरोनाशी युद्ध सुरूच; पंतप्रधान मोदींचे देशवासीयांना आवाहन, सांगितले ५ महत्वाचे मुद्दे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2020 07:14 IST

मंगळवारी मोदी यांनी सायंकाळी सहा वाजता देशाला उद्देशून भाषण केले. कोरोना विषाणूची साथ आल्यापासून त्यांचे हे सातवे भाषण होते. मोदी यांच्या भाषणात पाच ठळक गोष्टींवर भर होता.

ठळक मुद्देकोरोना विषाणूचे संकट संपलेले नाही.कोरोनाकडे थोडेसेही दुर्लक्ष झाले तर त्याची मोठी किंमत मोजावी लागेल.लॉकडाउन संपला असला तरी कोरोना संपलेला नाही.

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचे संकट संपलेले नाही. त्याकडे थोडेसेही दुर्लक्ष झाले तर त्याची मोठी किंमत मोजावी लागेल व सणासुदींच्या उत्साहावर पाणी पडेल, असा इशारा पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी दिला. लॉकडाउन संपला असला तरी कोरोना संपलेला नाही. त्यामुळे काळजी घ्यावी लागणार असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले.

मंगळवारी मोदी यांनी सायंकाळी सहा वाजता देशाला उद्देशून भाषण केले. कोरोना विषाणूची साथ आल्यापासून त्यांचे हे सातवे भाषण होते. मोदी यांच्या भाषणात पाच ठळक गोष्टींवर भर होता.

मोदींच्या भाषणातील ५ महत्वाचे मुद्दे -विनंती - जोखीम घेऊ नका - कोरोना रोखण्यासाठी जी काळजी घ्यायची आहे तीच थांबवली गेल्याचे अनेक व्हिडीओज बघायला मिळत आहेत. तुम्ही मास्क न वापरता इकडेतिकडे फिरणार असाल तर तुम्ही स्वत:सह, तुमची मुले, घरातील ज्येष्ठ अशा अनेकांना जोखीम निर्माण करत आहात.

दक्षता - अन्यथा वाढतील रुग्ण -युरोप, अमेरिका आणि इतर देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या घटल्याचे पाहण्यात आल्यानंतर पुन्हा तेथे रुग्णांचे प्रमाण वाढल्याचे दिसते. आपण सतत दक्ष राहिले पाहिजे व लस येईपर्यंत कठोरपणे नियमांचे पालन केले पाहिजे.

इशारा - किंमत मोजावी लागेल -कोरोना विषाणूचे संकट संपलेले नाही. त्याकडे थोडेसेही दुर्लक्ष झाले तर त्याची मोठी किंमत मोजावी लागेल व सणासुदींच्या उत्साहावर पाणी पडेल. भलेही लॉकडाऊन आज नाही. परंतु, विषाणू अजूनही आहे याचा विसर आम्ही पडू देऊ नये. कोरोनाकडे दुर्लक्ष करण्याची ही वेळ नाही.

काळजी - प्रत्येकाला लस -लस जेव्हा केव्हा उपलब्ध होईल तेव्हा ती प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचेल यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. गेल्या सात-आठ महिन्यांत प्रत्येक भारतीयाने केलेल्या प्रयत्नांमुळे देशात परिस्थिती स्थिर आहे. आपण ती बिघडू द्यायला नको. त्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे.

विश्वास - टेस्ट हीच ताकद -कोविड रुग्णांसाठी देशात ९० लाख खाटांची व्यवस्था, १२ हजार क्वारंटाईन केंद्रे व दोन हजार विषाणू चाचणी प्रयोगशाळा उपलब्ध आहेत. १० कोटींच्या वर चाचण्या झाल्या. कोरोनाच्या विरोधातील लढाईत आमची ताकद ही चाचण्यांची वाढलेली संख्येत आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याprime ministerपंतप्रधानBJPभाजपाIndiaभारत